शहरं
Join us  
Trending Stories
1
उंदराला मांजर साक्ष! ससूनच्या डॉक्टरांची चौकशी करणारे डॉक्टर गंभीर प्रकरणांत अडकलेले; माजी सनदी अधिकाऱ्यांचा आक्षेप
2
मिझोराममध्ये दगडाच्या खाणीत भूस्खलन; 10 मजुरांचा मृत्यू, अन्य ढिगाऱ्याखाली अडकले
3
जूनपासून मान्सून बरसणार, पण या 7 राज्यांत कमी पाऊस पडणार - IMD ची भविष्यवाणी!
4
Yogi Adityanath : "हा विरोधकांचा प्रोपगंडा, तसंही मी एक..."; मुख्यमंत्री पदावरुन हटवण्याबाबत योगींची पहिली प्रतिक्रिया
5
अयोध्येतील आणखी १२५ मंदिरांचा जीर्णोद्धार केला जाणार; राम मंदिराचे कामही लवकरच पूर्णत्वाकडे
6
Panchayat 3 : 'पंचायत 3'च्या मेकर्सला मोठा झटका! वेब सीरीज रिलीज होताच ऑनलाईन झाली Leaked
7
Gold Silver Price: सोनं खरेदी करणार आहात? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण!
8
Team India Head Coach : ३००० अर्ज... मुख्य प्रशिक्षकपदासाठी मोदी, शाह, धोनी, सचिन अशीही नावं; BCCI ची डोकेदुखी वाढली
9
'लाल' बादशाह फ्रेंच ओपनमधून बाहेर; हा शेवटचा सामना असेल तर..., राफेल नदाल भावूक
10
Dharavi fire: धारावीत अग्नितांडव, फर्निचर गोदाम खाक; ६ जण जखमी!
11
Mukesh Ambaniच्या 'या' कंपनीचा येणार IPO? मेटा, गुगलचीही आहे भागीदारी; किती असेल किंमत?
12
“अशा प्रकारचे धुके निर्माण करण्याचे काही कारण नाही”; भाजपा नेत्याचा भुजबळांवर पलटवार
13
मी डिप्रेशनमध्ये गेलेलो! सेक्स स्कँडलनंतर पहिल्यांदाच प्रज्वल रेवन्ना समोर आले; हजर होण्याची तारीख दिली...
14
इंडिया आघाडीत मानापमान नाट्य? बैठकीला जाण्यास ममता बॅनर्जींचा ठाम नकार; कारण काय दिले?
15
हृदयद्रावक! मुलीसाठी मुलगा पाहायला जात होतं कुटुंब; काळाने घातला घाला, 5 जणांचा मृत्यू
16
संतापजनक! भाजपा आमदाराने पेनने खोदला नवीन बांधलेला रस्ता; ठेकेदाराला धरलं धारेवर
17
ICICI आणि Yes Bank ला रिझर्व्ह बँकेनं ठोठावला १.९१ कोटींचा दंड, कारण काय?
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; हिंदाल्कोमध्ये तेजी, मारुतीचे शेअर्स घसरले
19
“त्यांची मनापासून इच्छा आहे की मी मरुन जावे”; अरविंद केजरीवाल यांचा रोख कुणाकडे?
20
शाहरुख खानपेक्षा चौपट श्रीमंत आहे सनरायझर्सची मालक, काय करते काम, Kavya Maranची नेटवर्थ किती?

नगरचे हे ‘संतमहात्मे’ सेनेनेही मोठे केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:49 AM

अहमदनगरच्या भूमीत कोतकर-जगताप-कर्डिले हे ‘संतमहात्मे’ आले कुठून ? असा प्रश्न शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून उपस्थित केला आहे.

-सुधीर लंकेअहमदनगरच्या भूमीत कोतकर-जगताप-कर्डिले हे ‘संतमहात्मे’ आले कुठून ? असा प्रश्न शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून उपस्थित केला आहे. पण, येथे हे संतमहात्मे सेनेनेही मोठे केले, हा इतिहास आहे. जगताप पिता-पुत्रांना सेनेने एकदा आपल्या पक्षात घेऊन पावन केले होते. नगरच्या गुंडगिरीला सर्वपक्षीय हातभार आहे. सेनाही त्याला अपवाद नाही.मुंबईतील टोळीयुद्ध गाजत नाहीत तेवढी प्रसिद्धी सध्या अहमदनगर या संतांच्या भूमीतील गुंडगिरीला मिळत आहे. एखाद्या गावाची संस्कृती ही पक्ष, राजकीय नेते आणि प्रशासन कशी नासवू शकतात याचे उदाहरण म्हणून नगरच्या हत्याकांडाकडे व त्यानंतर सुरू असलेल्या राजकारणाकडे पाहता येईल.नगर शहरात केडगावसारख्या उपनगरात एका वॉर्डाची पोटनिवडणूक होती. म्हटले तर ही अदखलपात्र निवडणूक. पण, दोन्ही काँग्रेस-आणि शिवसेना यांनी ती इतकी प्रतिष्ठेची केली की हा वॉर्ड संवेदनशील म्हणून जाहीर करावा लागला. निवडणूक काँग्रेसने जिंकली. त्यानंतर दोन शिवसैनिकांच्या हत्येची घटना घडली. राष्टÑवादीचे अरुण आणि संग्राम जगताप हे दोन आमदार पिता-पुत्र, संग्राम यांचे सासरे भाजप आमदार शिवाजी कर्डिले, त्यांचे व्याही काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर यांच्यासह ३० जणांनी हत्याकांड केल्याचा आरोप आहे. एकाच वेळी तीन आमदारांवर खुनाचा गुन्हा दाखल होण्याची कर्तबगारी नगरच्या नशिबी आली. या नेत्यांनीच हत्यांकाड घडविले का ? हे अजून निष्पन्न व्हायचे आहे.नगर शहरात कोतकर-जगताप-कर्डिले या तीन परिवारांवर सातत्याने दहशतीचे आरोप झाले. या तीन परिवारांची सोयरेशाही इतकी पक्की आहे की ते कुठल्याही पक्षात असले तरी आतून एकमेकाला भिडलेले असतात. सत्ता मिळविण्यासाठी सोबत असतात. अनेक चुकीचे कार्यकर्ते त्यांनी सोबत पाळले. या तीन परिवारांना आज दहशतखोर ठरविणारी नगरची शिवसेनाही फार संतसज्जन आहे, अशातला भाग नाही. या नेत्यांनी दहशत करायची व सेनेने त्याचे भांडवल करत जगायचे हा सेनेचाही राजकीय धंदा बनला आहे. सेनेचे अनिल राठोड हे रचनात्मक कामांपेक्षा या भांडवलावरच आमदार होत आले. सेनेने आपल्या मुखपत्रात जगताप पिता-पुत्रांना ‘संतमहात्मे’ म्हणून खिजविले. वाल्याचा वाल्मिकी करण्याचा जोडधंदा भाजपने २०१४ साली सुरू केला व त्यातून ‘संत’ शिवाजी कर्डिले जन्मले, असा टोला भाजपलाही लगावला. पण, राठोड यांनीच एकेकाळी जगताप पिता-पुत्रांना सेनेत पावन करून घेतले होते. जगताप विधान परिषदेवर सर्वप्रथम सेनेच्याच छुप्या मतांवर निवडून आले. कर्डिले हे युती सरकारच्या काळात सेनेसोबत होते. त्यामुळे हे ‘संतमहात्मे’ घडण्यात सेनेचाही वाटा आहे.नगर शहराचे राजकीय व सांस्कृतिक वाटोळे करण्यात सगळेच पक्ष जबाबदार आहेत. अगदी भाजपसुद्धा. शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर राष्टÑवादीने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केला, तर सेनेनेही केडगावात धुडगूस घातला. दोन जखमी शिवसैनिकांचे देह तब्बल सात तास पडून होते. तेथे कुणाला जाऊ दिले नाही. ते जिवंत आहेत की गतप्राण झाले? हेही तपासू दिले नाही. ही कुठली ‘संत’कृती? राष्टÑवादीवरचे गुन्हे कायम ठेवा आणि आमच्यावरचे मागे घ्या, अशी सेनेची मागणी आहे. सेनेकडे गृहराज्यमंत्रिपद असताना सेनाच पोलिसांवर आरोप करत आहे.नगरचे नागरिक या सर्वपक्षीय दहशतीला, घराणेशाहीच्या राजकारणाला विटले आहेत. सर्वच पक्षांनी हे शहर बदनाम केले. जगतापांच्या घरातच दोन आमदारक्या का? राठोड यांनी २५ वर्षांत भरीव काय केले? भाजप-काँग्रेसने काय दिवे लावले? हे प्रश्न आहेत. दहशत आणि गुंडगिरीचा निषेध म्हणून नगरला मंगळवारी सामान्य माणसांचा मोर्चा निघाला. त्याचा महामोर्चा होईल तेव्हा सर्वच पक्षांना हादरा बसेल.