शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

संस्काराचा प्लॅटफॉर्म

By admin | Updated: May 9, 2016 02:49 IST

आधी ती मुले शिव्या द्यायची, आता ओव्या गातात. नागपूरच्या प्लॅटफॉर्म शाळेतील मुलांची ही गोष्ट. परवा शासकीय बालसुधारगृहातील ३० मुले कर्मचाऱ्यांना मारहाण करून पळून गेली

आधी ती मुले शिव्या द्यायची, आता ओव्या गातात. नागपूरच्या प्लॅटफॉर्म शाळेतील मुलांची ही गोष्ट. परवा शासकीय बालसुधारगृहातील ३० मुले कर्मचाऱ्यांना मारहाण करून पळून गेली, त्याक्षणी प्लॅटफॉर्मच्या मुलांची आठवण झाली. मनात एक विचार आला, सरकारची कुठलीही मदत न घेता प्लॅटफॉर्म शाळेत या बिघडलेल्या मुलांना माणूस बनविण्यासाठी ज्या कळकळीतून प्रयत्न केले जातात तसेच शासकीय बालसुधारगृहातील मुलांबाबत असते तर कदाचित ती अशी पळून गेली नसती. अशा घटना आपल्यासमोर अस्वस्थ करणारे असंख्य प्रश्न उभ्या करतात. अनाथ, घरून पळून गेलेल्या, नकळत गुन्हेगारी प्रवृत्तींना बळी पडलेल्या या मुलांना ही शासकीय बालसुधारगृहे कोंडवाडे का वाटतात? या तुरुंगाच्या भिंतीत त्यांना कोंडून आपण त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करीत असतो. इथे त्यांचे संगोपन होत नाही, त्यांच्याकडे गुन्हेगार म्हणूनच बघितले जाते. पांढरपेशा समाज सुरक्षित राहावा यासाठी या बालगुन्हेगारांना बालसुधारगृहात ढकलले जाते. येथील कर्मचाऱ्यांचाही दृष्टिकोन संस्कार रुजविण्यापेक्षा मुलांवर ‘पाळत’ ठेवण्याकडेच अधिक असतो. त्यांना आई-बापाची माया मिळत नाही, त्यांच्या चुका कुणी समजून घेत नाही. म्हणूनच मोकळा श्वास घेण्यासाठी मग ती अशी पळून जातात.शासकीय बालसुधारगृहात दिसणारी अशीच ४५ मुले नागपूरच्या गांधीबागेतील प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिर निवासी शाळेत आहेत. ही मुलेसुद्धा कधीकाळी बालगुन्हेगार. सहा वर्षांपूर्वी बीअरबारमध्ये भांडी विसळणारा बिट्टू आता इंजिनिअरिंगला आहे. लाल मोहम्मद हा बिहारचा. सहा वर्षाचा असताना तो लखनौला पळून गेला. बांगड्याच्या दुकानात कामाला होता. तिथे मालक खूप मारायचा. लाल तिथूनही पळाला. नागपूरच्या रेल्वेस्टेशनवर भटकताना दिसला. शेवटी प्लॅटफॉर्म शाळेत आला. आता लाल मोहम्मद रोज शाळेत जातो. वर्गात तो सर्वांचा मॉनिटर आहे. मुंबईचा सलीम सावत्र आईच्या त्रासाला कंटाळून घरून निघाला. मुंबईत भीक मागायचा, दारू प्यायचा. तो इथे पाचवीत आहे. झारखंडच्या अर्जुनने १२ वर्षाचा असताना घर सोडले. दारूच्या नशेत त्याला इथे कुणीतरी आणून दिले. सहा वर्षे इथे राहिला. दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. मागच्या आठवड्यात त्याला नातेवाईक घरी घेऊन गेले. पूर्वी रेल्वेत चोऱ्या करणाऱ्या अजयची वही परवा सहज चाळली. वहीच्या मागच्या पानावर, ‘सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल’ ही सानेगुरुजींची प्रार्थना सापडली. जन्मापासूनच जगण्याची झुंज द्यावी लागलेल्या या मुलांच्या आयुष्यात झालेला हा आमूलाग्र बदल. दिवाळीत या मुलांनी भिकाऱ्यांना पोटभर खाऊ घातले. ज्या हातांनी भीक मागितली त्याच हातांनी दान केले. नागपूरला रेल्वे पोलीस अधीक्षक असताना रवींद्र सिंघल या भल्या माणसाला अशा निवासी शाळेची निकड वाटू लागली. विश्व हिंदू परिषद व नागपूर महापालिकेने ही जबाबदारी स्वीकारली. श्रीकांत आगलावे नावाचा बजरंग दलाचा कार्यकर्ता सर्व सोडून पुढे आला. श्रीकांत त्यांचा माय झाला आणि बापही...या मुलांना या शाळेतून आता पळून जावेसे वाटत नाही. सुरुवातीला काही गेली आणि लगेचच ती घरट्यातही परतली. विचारले तर म्हणाली, ‘हे जीवन सुंदर आहे.’ इथे रोज तुमच्या-आमच्या घरची मुले येतात. कुणी वाढदिवस साजरा करतात तर कुणी दिवाळी. अंतर्बाह्य विस्कटून गेलेली ही मुले त्यांच्यात आपले हरवलेले बालपण शोधतात. रेल्वेत भीक मागणारा मुलगा जवळ आला की आपण त्याला झिडकारून देतो. अशाच मुलांपैकी एखादा प्लॅटफॉर्म शाळेत कॉम्प्युटरवर दिसतो. लाथाडताना आपण त्याला ओळखत नाही, कारण आपल्या दृष्टीने तो गुन्हेगार आणि संस्कारशून्य. तीच मुले या शाळेत ‘इतनी शक्ती हमें दे ना दाता’चे मागणे घालतात तेव्हा स्वत:ची घृणा वाटू लागते. हा जाणिवेचा दोष आहे. रवींद्र सिंघल, श्रीकांत आगलावेंना ती आहे म्हणून ही मुले पुन्हा सावरली. शासकीय बालसुधारगृह चालविणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांकडे ही संवेदना नसल्यामुळेच इथली मुले पळून जातात.- गजानन जानभोर