शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

उज्जैनमध्येही तेच

By admin | Updated: December 31, 2015 03:04 IST

नाशिक- त्र्यंबकेश्वरी भरलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने दाखल झालेल्या तथाकथित सर्वसंगपरित्यागी साधू महंतांनी ज्या आदळआपट हट्टयोगाचे दर्शन घडविले होते

नाशिक- त्र्यंबकेश्वरी भरलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने दाखल झालेल्या तथाकथित सर्वसंगपरित्यागी साधू महंतांनी ज्या आदळआपट हट्टयोगाचे दर्शन घडविले होते त्याच प्रयोगाचे सादरीकरण आता मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये सुरु झाले आहे. तेथील कुंभमेळा जरी येत्या एप्रिल-मे दरम्यान भरणार असला तरी कथित साधू-संत येत्या मकर संक्रांतीपासूनच डेरेदाखल होणार आहेत. परंतु त्यांच्या आगमनाची दखल घेऊन तेथील प्रशासनाने जी चपळाई दाखविणे त्यांना अपेक्षित होते ती दाखवली जात नसल्याने त्यांनी चक्क पंतप्रधान मोदी यांच्याचकडे धाव घेतली घेतली आहे. नाशिक कुंभाच्या वेळी ज्यांना आपल्या हवाई वैभवाचे सादरीकरण करायचे होते पण ज्याला सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारली गेली त्या ‘पायलट बाबां’चा यात पुढाकार आहे, कारण ते षट्दर्शन आखाड्याचे म्हणे प्रमुख आहेत. नाशकातील वास्तव्यात त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आपले कसे परमभक्त आहेत याच्या कहाण्या कथन केल्या होत्या आणि आता त्याच चौहानांच्या विरोधात बाबांनी मोदींना गाठले आहे. नाशिकचा कुंभमेळा सुरु असतानाच शिवराजसिंह चौहान सपत्निक नाशकात आले होते आणि त्यांनी प्रत्येक महंतास व्यक्तिगत निमंत्रण देऊन उज्जैनमध्ये त्यांचे स्वागत करण्यास आपण उत्सुक आहोत असे सांगितले होते. आता त्याच मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनातील स्थानिक लोकाना हटवून मोदींनी त्यांच्या खास विश्वासातल्या लोकांवर आमच्या सोयी सुविधा पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवावी असा हट्ट पायलट बाबांनी धरला आहे. त्यासाठी त्यांनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली असून ती मिळताच तब्बल १०१ साधू मोदींना भेटायला जाणार आहेत. षट्दर्शन आखाड्याचे राज्य सचिव नरसिंहदास महाराज यांनी तर राज्य सरकार जाणीवपूर्वक साधू-संतांचा अपमान करीत असल्याचा आरोप केला आहे. पण त्यांनी केलेला दुसरा आरोप त्याहूनही गंभीर आहे. राज्य सरकार पायलट बाबांवर ‘नजर’ ठेऊन आहे आणि त्यांचे फोनदेखील म्हणे टॅप केला जातो आहे. खरे तर संसाराला असार मानणाऱ्या या साधू-संतांना अत्याधुनिक ‘गॅजेट्स’ची गरजच का पडावी हा एक प्रश्न आणि स्वत:स पारदर्शी मानणाऱ्या या लोकांवर कोणी नजर ठेवली काय आणि न ठेवली काय, त्याने फरक पडायचे तरी कारण काय?