शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

उज्जैनमध्येही तेच

By admin | Updated: December 31, 2015 03:04 IST

नाशिक- त्र्यंबकेश्वरी भरलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने दाखल झालेल्या तथाकथित सर्वसंगपरित्यागी साधू महंतांनी ज्या आदळआपट हट्टयोगाचे दर्शन घडविले होते

नाशिक- त्र्यंबकेश्वरी भरलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने दाखल झालेल्या तथाकथित सर्वसंगपरित्यागी साधू महंतांनी ज्या आदळआपट हट्टयोगाचे दर्शन घडविले होते त्याच प्रयोगाचे सादरीकरण आता मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये सुरु झाले आहे. तेथील कुंभमेळा जरी येत्या एप्रिल-मे दरम्यान भरणार असला तरी कथित साधू-संत येत्या मकर संक्रांतीपासूनच डेरेदाखल होणार आहेत. परंतु त्यांच्या आगमनाची दखल घेऊन तेथील प्रशासनाने जी चपळाई दाखविणे त्यांना अपेक्षित होते ती दाखवली जात नसल्याने त्यांनी चक्क पंतप्रधान मोदी यांच्याचकडे धाव घेतली घेतली आहे. नाशिक कुंभाच्या वेळी ज्यांना आपल्या हवाई वैभवाचे सादरीकरण करायचे होते पण ज्याला सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारली गेली त्या ‘पायलट बाबां’चा यात पुढाकार आहे, कारण ते षट्दर्शन आखाड्याचे म्हणे प्रमुख आहेत. नाशकातील वास्तव्यात त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आपले कसे परमभक्त आहेत याच्या कहाण्या कथन केल्या होत्या आणि आता त्याच चौहानांच्या विरोधात बाबांनी मोदींना गाठले आहे. नाशिकचा कुंभमेळा सुरु असतानाच शिवराजसिंह चौहान सपत्निक नाशकात आले होते आणि त्यांनी प्रत्येक महंतास व्यक्तिगत निमंत्रण देऊन उज्जैनमध्ये त्यांचे स्वागत करण्यास आपण उत्सुक आहोत असे सांगितले होते. आता त्याच मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनातील स्थानिक लोकाना हटवून मोदींनी त्यांच्या खास विश्वासातल्या लोकांवर आमच्या सोयी सुविधा पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवावी असा हट्ट पायलट बाबांनी धरला आहे. त्यासाठी त्यांनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली असून ती मिळताच तब्बल १०१ साधू मोदींना भेटायला जाणार आहेत. षट्दर्शन आखाड्याचे राज्य सचिव नरसिंहदास महाराज यांनी तर राज्य सरकार जाणीवपूर्वक साधू-संतांचा अपमान करीत असल्याचा आरोप केला आहे. पण त्यांनी केलेला दुसरा आरोप त्याहूनही गंभीर आहे. राज्य सरकार पायलट बाबांवर ‘नजर’ ठेऊन आहे आणि त्यांचे फोनदेखील म्हणे टॅप केला जातो आहे. खरे तर संसाराला असार मानणाऱ्या या साधू-संतांना अत्याधुनिक ‘गॅजेट्स’ची गरजच का पडावी हा एक प्रश्न आणि स्वत:स पारदर्शी मानणाऱ्या या लोकांवर कोणी नजर ठेवली काय आणि न ठेवली काय, त्याने फरक पडायचे तरी कारण काय?