शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
3
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
4
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
5
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
6
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
7
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
8
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
9
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
10
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
11
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
12
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
13
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
14
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
15
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
16
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न
17
Kangana Ranaut : "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
18
पुणे : बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश
19
Video - संतापजनक! राजस्थानमध्ये उद्घाटनापूर्वीच वाहून गेला नवा रस्ता; पावसाने केली पोलखोल
20
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात

उज्जैनमध्येही तेच

By admin | Updated: December 31, 2015 03:04 IST

नाशिक- त्र्यंबकेश्वरी भरलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने दाखल झालेल्या तथाकथित सर्वसंगपरित्यागी साधू महंतांनी ज्या आदळआपट हट्टयोगाचे दर्शन घडविले होते

नाशिक- त्र्यंबकेश्वरी भरलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने दाखल झालेल्या तथाकथित सर्वसंगपरित्यागी साधू महंतांनी ज्या आदळआपट हट्टयोगाचे दर्शन घडविले होते त्याच प्रयोगाचे सादरीकरण आता मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये सुरु झाले आहे. तेथील कुंभमेळा जरी येत्या एप्रिल-मे दरम्यान भरणार असला तरी कथित साधू-संत येत्या मकर संक्रांतीपासूनच डेरेदाखल होणार आहेत. परंतु त्यांच्या आगमनाची दखल घेऊन तेथील प्रशासनाने जी चपळाई दाखविणे त्यांना अपेक्षित होते ती दाखवली जात नसल्याने त्यांनी चक्क पंतप्रधान मोदी यांच्याचकडे धाव घेतली घेतली आहे. नाशिक कुंभाच्या वेळी ज्यांना आपल्या हवाई वैभवाचे सादरीकरण करायचे होते पण ज्याला सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारली गेली त्या ‘पायलट बाबां’चा यात पुढाकार आहे, कारण ते षट्दर्शन आखाड्याचे म्हणे प्रमुख आहेत. नाशकातील वास्तव्यात त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आपले कसे परमभक्त आहेत याच्या कहाण्या कथन केल्या होत्या आणि आता त्याच चौहानांच्या विरोधात बाबांनी मोदींना गाठले आहे. नाशिकचा कुंभमेळा सुरु असतानाच शिवराजसिंह चौहान सपत्निक नाशकात आले होते आणि त्यांनी प्रत्येक महंतास व्यक्तिगत निमंत्रण देऊन उज्जैनमध्ये त्यांचे स्वागत करण्यास आपण उत्सुक आहोत असे सांगितले होते. आता त्याच मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनातील स्थानिक लोकाना हटवून मोदींनी त्यांच्या खास विश्वासातल्या लोकांवर आमच्या सोयी सुविधा पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवावी असा हट्ट पायलट बाबांनी धरला आहे. त्यासाठी त्यांनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली असून ती मिळताच तब्बल १०१ साधू मोदींना भेटायला जाणार आहेत. षट्दर्शन आखाड्याचे राज्य सचिव नरसिंहदास महाराज यांनी तर राज्य सरकार जाणीवपूर्वक साधू-संतांचा अपमान करीत असल्याचा आरोप केला आहे. पण त्यांनी केलेला दुसरा आरोप त्याहूनही गंभीर आहे. राज्य सरकार पायलट बाबांवर ‘नजर’ ठेऊन आहे आणि त्यांचे फोनदेखील म्हणे टॅप केला जातो आहे. खरे तर संसाराला असार मानणाऱ्या या साधू-संतांना अत्याधुनिक ‘गॅजेट्स’ची गरजच का पडावी हा एक प्रश्न आणि स्वत:स पारदर्शी मानणाऱ्या या लोकांवर कोणी नजर ठेवली काय आणि न ठेवली काय, त्याने फरक पडायचे तरी कारण काय?