शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

सलाम पाडगावकर!

By admin | Updated: December 29, 2016 03:35 IST

जगण्यावर समरसून प्रेम करणाऱ्या मंगेश पाडगावकर या प्रतिभावंत भावकवीच्या सिद्धहस्त लेखणीने पूर्णविराम घेतला त्याला उद्या, ३० डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे...

- विजय बाविस्करजगण्यावर समरसून प्रेम करणाऱ्या मंगेश पाडगावकर या प्रतिभावंत भावकवीच्या सिद्धहस्त लेखणीने पूर्णविराम घेतला त्याला उद्या, ३० डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे...जगण्यावर शतदा प्रेम करायला सांगणारे महाराष्ट्रभूषण मंगेश पाडगावकर हे जीवनगाणे शिकवणारे थोर आनंदयात्री होते. तब्बल सात दशकांहून अधिक काळ त्यांच्या लेखणीवर सरस्वतीचा वरदहस्त कायम होता. जगण्यावर समरसून प्रेम करणाऱ्या या प्रतिभावंत भावकवीच्या सिद्धहस्त लेखणीने पूर्णविराम घेतला त्याला उद्या, शुक्रवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. आधुनिक कवितांचा प्रवाह सुरू झाला केशवसुत, मर्ढेकरांपासून. पण सर्वाधिक लोकप्रियता वाट्याला आली ती पाडगावकरांच्याच. मराठी कविता ज्या परंपरेच्या समृद्ध वेलीवर विकसित होत गेली, त्याच परंपरेचा आधारही त्यांच्या कवितेत दिसून येत होता. म्हणूनच ‘कवी म्हणून आकार घेताना, बोरकर-कुसुमाग्रजांच्या कवितेचे खोल संस्कार माझ्यावर झाले,’ असे ते अभिमानाने सांगत. आधुनिक कवितेमध्ये मानवतावादाचा जो नवा सूर आला, त्याचा प्रभावी आविष्कार पाडगावकरांच्या कवितेतून अभिव्यक्त होऊ लागला. त्यातूनच त्यांच्या कवितेने पंरपरा व आधुनिकतेची दुहेरी शाल खुबीने पांघरली. मराठी कविता लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी विंदा करंदीकर आणि वसंत बापट यांच्यासोबत त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरात कवितांचे कार्यक्रम केले. यातून दोन गोष्टी झाल्या, कविता रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचली आणि कवीलाही प्रतिष्ठेचे वलय लाभले. या साऱ्याचे श्रेय नि:संशयपणे पाडगावकरांना द्यावे लागेल. पाडगावकरांच्या कवितेने ‘जगण्यावर‘ प्रेम करण्याचा मंत्र दिला. ‘झोपाळ्यावर झुलायला ‘शिकविले, प्रेमातला चातुर्वर्ण्य मोडून काढताना ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं’ असे प्रेमाचे नवे बोलगाणे देऊन हा कवी प्रेमवीरांच्याही हृदयात घर करून बसला. पाडगावकरांची कविता पुस्तकी-अकॅडेमिक नव्हती. त्यामुळे मराठी कवितेच्या अस्सल परंपरेचा धागा पकडून ती वाढू शकली. त्यामुळे मराठी कवितेवर प्रेम करणारा रसिक वाचक त्यांच्यापासून कधीच दूर गेला नाही. ‘श्रावणात घन निळा बरसला...’सारखं गीत असो किंवा अंतर्मुख करायला लावणारी ‘सलाम’सारखी कविता असो, रसिकांनी त्यांना ‘सलाम’ केला. पुस्तकी प्रयोगशीलतेच्या कोलांटउड्या न मारताही चांगली कविता लिहिता येते, असे ते नेहमी म्हणत. ‘धारानृत्य,’ ‘जिप्सी’पासून कवितांचा प्रवास पाहिला, तर प्रामुख्याने भावकवी ही पाडगावकरांची ठळक ओळख बनली. कवितेपलीकडे पाडगावकरांना लोकप्रिय बनविले ते त्यांच्या भावगीतांनी. श्रीनिवास खळे, यशवंत देव, हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारखे संगीतकार तर अरुण दाते यांच्यासारख्या ‘शुक्रतारा’ गायकांमुळे पाडगावकर दूरदूरपर्यंत पाहोचले. मराठी भावविश्वात पाडगावकरांचे योगदान अनन्यसाधारण आहे. रसिकप्रिय असले तरी त्यांच्या कवितेत आणि व्यक्तिमत्त्वात बंडखोरीही होती. अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या सशक्त उद्गारांचे प्रकटीकरणही त्यांच्या काव्यातून झाले. वृत्तबद्ध काव्यापासून नादवंत बोलगाण्यांपर्यंत कवितेच्या विविध रंगरूपांतून प्रकटणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. मोहक शब्दकळा, प्रेमाची तरल, भावार्त अनुभूती आणि गेयता या गुणांमुळे पाडगावकरांची कविता वाचकांच्या मनाला भुरळ घालत राहिली. गझल, विदूषक, सलाम या काव्यसंग्रहांतून राजकीय आशयाची व उपरोधिकपणा असलेली समाजातील विसंगतीवर टोकदार प्रहार करणारी कविता रचणारे पाडगावकर, अवीट गोडीची भावगीते लिहिणारे पाडगावकर, कबीर, मीरेच्या काव्यानुवादापर्यंत मुक्त संचार करणारे पाडगावकर ‘सांग सांग भोलानाथ’ असे निरागस बालगीतसुद्धा लिहून जातात आणि त्याच सहजतेने ‘शुक्रतारा मंदवारा, चांदणे पाण्यातुनी’ हेदेखील अलगदपणे सांगतात. ही सहजता, तरलता आणि सरलता हे त्यांचे मोठे बलस्थान होते. माणूस म्हणून जगण्यातली त्यांची उत्कटताही विलक्षण होती. आंतरिक स्वभावमूल्यांना त्यांच्या लेखनातही स्थान असल्याने कवितेइतकेच ते स्वत:वरही प्रेम करणारे आनंदयात्री होते. जन्माला आलेला प्रत्येक जीव एक दिवस जातो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे तरी भूतलावर काही ‘जिप्सी’ असे असतात, की जे ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असा आंतरिक मौलिक सल्ला देतात. मंगेश पाडगावकर हे नक्षत्रांचे देणे लाभलेले प्रतिभेचे लेणे होते. या विलक्षण सारस्वताला त्रिवार सलाम!