शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

साहेब, एकदा टोकाचं सांगा!

By अतुल कुलकर्णी | Updated: June 6, 2018 02:30 IST

आपण जाणते राजे. शेतकऱ्यांचे कैवारी, शेतीविषयीचे आपल्याला जेवढं ज्ञान तेवढं या देशात कुणाला असेल...? कधी, काय, कसं पेरलं की चांगलं उगवतं याचा आपल्या एवढा अभ्यास कुणाचाही नाही.

प्रिय शरद पवार साहेब,      आपण जाणते राजे. शेतकऱ्यांचे कैवारी, शेतीविषयीचे आपल्याला जेवढं ज्ञान तेवढं या देशात कुणाला असेल...? कधी, काय, कसं पेरलं की चांगलं उगवतं याचा आपल्या एवढा अभ्यास कुणाचाही नाही. कोणत्या मातीत काय रुजतं, आणि कुठून कशाचं पीक काढावं यातही आपला हातखंडा... यशवंत मनोहर यांनी ‘सदरहू पीक आम्ही आसवांवर काढलं आहे...’ असं जरी लिहिलं असलं तरी कोणतं पीक आसवांवर आणि कोणतं भावनेवर काढावं याचे क्लासेस सुरू झाले तर एका दिवसात बुकिंग फुल्ल होईल. असो, विषय तो नाही. आपण शेतकºयांना आवाहन केलं की तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हीच टोकाची भूमिका घ्या...! पण यामुळे काही प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरं काही केल्या मिळत नाहीत. म्हणून विचार केला, आपल्यालाच पत्र लिहून विचारावं. आम्ही शेतकरी विचारात पडलोय. शेतकºयांनी सुरू केलेला संघर्ष थांबवायचा की नाही याचा निर्णय शेतकºयांनीच घ्यावा, आणि स्वत:च्या प्रश्नासाठी टोेकाची भूमिका घ्यावी, असा आपला जाणता सल्ला आहे. म्हणजे आम्ही नेमकं काय करावं...? संघर्ष थांबवला तर टोकाची भूमिका घेता येत नाही आणि टोकाची भूमिका घेताना जीवाचं काही बरं-वाईट झालं तर परत तुम्हीच म्हणणार की संघर्ष थांबवायचा की नाही हे तुम्हीच ठरवायचं होतं. थोडक्यात काय दोन्हीकडून आमचाच कार्यक्रम...! आमचे दादासाहेब म्हणत होते, की आपल्या ज्ञानीपणावर विश्वास ठेवत एवढी वर्षे आम्ही आपल्याला मतदान करत आलोय. विश्वास दाखवत आलोय. याहीवेळी आम्ही आपल्याच पक्षाला मत दिलंं, आता मध्येच ते नरेंद्र-देवेंद्र आले त्यात आमचा काय दोष? पण आम्ही तुम्हाला निवडून दिलंय, तेव्हा तुम्ही आमच्यासाठी काय करताय, हे आम्ही कुणाला विचारायचं? आमच्या प्रश्नावर आपल्या पक्षानं हल्लाबोल केला, त्यातून काही पदरात पडलं नाही, म्हणून आम्हाला टोकाची भूमिका घ्यायला सांगताय का? असा त्यांचा सवाल! एक पत्रकार गंभीरपणानं सांगत होते, आपला पक्ष शिवसेनेला बाजूला सारून सत्तेत जायला निघाला होता. सगळं काही ठरलं होतं. अजितदादा, तटकरेंना बाजूला ठेवायचं, बाकीच्यांना मंत्रिमंडळात घ्यायचं. तारीखपण ठरली होती म्हणे, पण सुप्रियाताई मध्ये पडल्या, तुम्ही सगळे जा त्या भाजपात, मी नाही येणार, गरज पडली तर मी एकटीच राहीन राष्टÑवादीत... आणि मग कुठं सगळं गणित मोडलं, असं काहीबाही सांगत होते ते. हे खरंय का? की बिनकामाच्या पत्रकारांनी सोडलेली पुडी आहे...? साहेब, प्रश्न असाय की आपला पक्ष भाजपासोबत आहे की विरोधात हे काही केल्या कळत नाही. विरोधात आहे म्हणावं तर मध्येच कुणीतरी भाजपाबद्दल चांगलं बोलतं. सोबत आहे म्हणावं तर कुणीतरी विरोधात बोलतं. आपले जयंत पाटील भाजपात जाणार असं म्हणत होते तर तुम्ही त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं. तर आता सांगलीतले आपले ११ नगरसेवक भाजपात गेले. काय नाटक आहे तेच कळेनासं झालंय. तेव्हा एकदा आपण कुणाच्या विरोधात आहोत व कुणाच्या बाजूनं हे टोकाची भूमिका घेऊन सांगून टाकता का? 

(तिरकस)

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार