शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

बलिदान वाया जाऊ नये

By admin | Updated: June 24, 2017 02:35 IST

पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीम (बॅट) च्या गोळीबाराला तोंड देऊन घुसखोरी हाणून पाडताना महाराष्ट्रातील दोन जवानांना आलेले वीरमरण आणि श्रीनगरमधील मशिदीबाहेर

पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीम (बॅट) च्या गोळीबाराला तोंड देऊन घुसखोरी हाणून पाडताना महाराष्ट्रातील दोन जवानांना आलेले वीरमरण आणि श्रीनगरमधील मशिदीबाहेर जमावाच्या हल्ल्यात उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा झालेला मृत्यू या दोन्ही घटना अतिशय दुर्दैवी असून, त्याचा करावा तितका निषेध कमीच आहे. औरंगाबादमधील संदीप जाधव आणि कोल्हापूरचे सावन माने या दोन जवानांनी तर देशासाठी शत्रूशी लढताना दिलेल्या बलिदानाचे दु:ख सर्वांना आहे. दोन देशांतील तणाव व पाकच्या कागाळ्या यामुळे वीरमरण येणाऱ्या जवानांची संख्या काही महिन्यांमध्ये वाढली आहे. पाकिस्तानचे मनसुबे हाणून पाडताना जवानांना हौतात्म्य आल्यानंतर सरकारपासून सर्व पातळीवर दु:ख होते, निषेधाचे सूर उमटतात आणि मदतीच्या घोषणाही होतात. पण काही काळ लोटल्यावर सारेच जण हे वीरमरण विसरून जातात. सरकारी यंत्रणा बेदरकारपणे त्यांच्या नातेवाईकांशी वागते. या दोन जवानांच्या नातेवाईकांच्या बाबतीत असे होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. पोलीस उपअधीक्षक मोहमद अयुब पंडित यांचा जमावाच्या मारहाणीत झालेला मृत्यूही निषेधार्ह आहे. त्यांना तर आपल्या देशातील नागरिकांनीच मारले आहे. काश्मीरमध्ये गेली तीन वर्षे तणावाचे वातावरण असून, तणाव संपविण्यात वा कमी करण्यात केंद्र व राज्य सरकार दोघांना अपयश आले आहे. काश्मीरमध्ये स्थानिक व पाकिस्तानी दहशतवाद्यांनी संख्या वाढते आहे. स्थानिक जनता त्यांना सक्रिय मदत करताना दिसत आहे. हे का होत आहे आणि ते कसे थांबवता येईल, याचा विचारच होताना दिसत नाही. सुरक्षा दले व पोलीस यांच्या आधारे काश्मीरच्या प्रश्नांवर तोडगा निघू शकत नाही. त्यासाठी सर्व संबंधितांशी चर्चा करणे आवश्यक आहे आणि नेमकी तीच बंद झाली आहे. तेथील सारेच नागरिक पाकिस्तानधार्जिणे नाहीत, त्यांना जे चालले आहे, ते मान्यही नाही. पण रोजगार नाहीत, उद्योग नाहीत, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई यांमुळे काश्मिरींमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. ती दूर व्हायला हवी. ते काम सुरक्षा दले करू शकत नाहीत. गोळीबार व पेलेट गन्सचा वापर यामुळे सरकारी यंत्रणांविषयी अविश्वास व संताप आहे. त्यामुळे तणावात भर पडत आहे. पाकिस्तान त्याला खतपाणी घालत आहे. उपअधीक्षकाचा मारहाणीत झालेल्या मृत्यूचे हेही एक कारण आहे. त्याचा निषेध करतानाच काश्मिरी जनतेच्या मूळ प्रश्नांना हात घालणे गरजेचे आहे. या जनतेला फुटीरवादी व पाकधार्जिण्या शक्तींपासून दूर नेण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. या तिघांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे नसेल तर आता तरी ती सुरुवात व्हावी.