शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

बलिदान वाया जाऊ नये

By admin | Updated: June 24, 2017 02:35 IST

पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीम (बॅट) च्या गोळीबाराला तोंड देऊन घुसखोरी हाणून पाडताना महाराष्ट्रातील दोन जवानांना आलेले वीरमरण आणि श्रीनगरमधील मशिदीबाहेर

पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीम (बॅट) च्या गोळीबाराला तोंड देऊन घुसखोरी हाणून पाडताना महाराष्ट्रातील दोन जवानांना आलेले वीरमरण आणि श्रीनगरमधील मशिदीबाहेर जमावाच्या हल्ल्यात उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा झालेला मृत्यू या दोन्ही घटना अतिशय दुर्दैवी असून, त्याचा करावा तितका निषेध कमीच आहे. औरंगाबादमधील संदीप जाधव आणि कोल्हापूरचे सावन माने या दोन जवानांनी तर देशासाठी शत्रूशी लढताना दिलेल्या बलिदानाचे दु:ख सर्वांना आहे. दोन देशांतील तणाव व पाकच्या कागाळ्या यामुळे वीरमरण येणाऱ्या जवानांची संख्या काही महिन्यांमध्ये वाढली आहे. पाकिस्तानचे मनसुबे हाणून पाडताना जवानांना हौतात्म्य आल्यानंतर सरकारपासून सर्व पातळीवर दु:ख होते, निषेधाचे सूर उमटतात आणि मदतीच्या घोषणाही होतात. पण काही काळ लोटल्यावर सारेच जण हे वीरमरण विसरून जातात. सरकारी यंत्रणा बेदरकारपणे त्यांच्या नातेवाईकांशी वागते. या दोन जवानांच्या नातेवाईकांच्या बाबतीत असे होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. पोलीस उपअधीक्षक मोहमद अयुब पंडित यांचा जमावाच्या मारहाणीत झालेला मृत्यूही निषेधार्ह आहे. त्यांना तर आपल्या देशातील नागरिकांनीच मारले आहे. काश्मीरमध्ये गेली तीन वर्षे तणावाचे वातावरण असून, तणाव संपविण्यात वा कमी करण्यात केंद्र व राज्य सरकार दोघांना अपयश आले आहे. काश्मीरमध्ये स्थानिक व पाकिस्तानी दहशतवाद्यांनी संख्या वाढते आहे. स्थानिक जनता त्यांना सक्रिय मदत करताना दिसत आहे. हे का होत आहे आणि ते कसे थांबवता येईल, याचा विचारच होताना दिसत नाही. सुरक्षा दले व पोलीस यांच्या आधारे काश्मीरच्या प्रश्नांवर तोडगा निघू शकत नाही. त्यासाठी सर्व संबंधितांशी चर्चा करणे आवश्यक आहे आणि नेमकी तीच बंद झाली आहे. तेथील सारेच नागरिक पाकिस्तानधार्जिणे नाहीत, त्यांना जे चालले आहे, ते मान्यही नाही. पण रोजगार नाहीत, उद्योग नाहीत, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई यांमुळे काश्मिरींमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. ती दूर व्हायला हवी. ते काम सुरक्षा दले करू शकत नाहीत. गोळीबार व पेलेट गन्सचा वापर यामुळे सरकारी यंत्रणांविषयी अविश्वास व संताप आहे. त्यामुळे तणावात भर पडत आहे. पाकिस्तान त्याला खतपाणी घालत आहे. उपअधीक्षकाचा मारहाणीत झालेल्या मृत्यूचे हेही एक कारण आहे. त्याचा निषेध करतानाच काश्मिरी जनतेच्या मूळ प्रश्नांना हात घालणे गरजेचे आहे. या जनतेला फुटीरवादी व पाकधार्जिण्या शक्तींपासून दूर नेण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. या तिघांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे नसेल तर आता तरी ती सुरुवात व्हावी.