शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

महालांचे भग्नावशेष आणि वंशजांचे दावे

By सुधीर महाजन | Updated: January 20, 2018 04:32 IST

मराठवाडा प्रदीर्घ काळ मोगल आणि निजाम राजवटीचा भाग होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्षभराने मराठवाडा स्वतंत्र झाला. तरी मोगल निजामाचे वंशज म्हणवणारी मंडळी इकडे येऊन येथील ऐतिहासिक वास्तूंवर मालकी हक्काचा दावा करतात.

मराठवाडा प्रदीर्घ काळ मोगल आणि निजाम राजवटीचा भाग होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्षभराने मराठवाडा स्वतंत्र झाला. तरी मोगल निजामाचे वंशज म्हणवणारी मंडळी इकडे येऊन येथील ऐतिहासिक वास्तूंवर मालकी हक्काचा दावा करतात.जगात सर्वात मोठा लोकशाही असलेला देश, त्यात ७० वर्षांची लोकशाही झाली तरी सरंजामशाहीचा सोस कमी होत नाही. तसेही ही सरंजामशाही वृत्ती सगळीकडेच म्हणजे राजकारणी, नोकरशहांमधून नेहमीच प्रकट होत असतेच. तर निजामाच्या चार वंशजांनी येऊन नवखंडा, हिमायतबाग अशा मालमत्ता आमच्या मालकीच्या आहेत असा दावा केला. तो नुसताच सरकार दरबारी केला असता तर वेगळे पण त्यांनी प्रसारमाध्यमांकडेही तो केल्यामुळे त्याची चर्चा सुरू झाली. हे वंशज एवढ्यावरच थांबले नाहीत तर थेट भोकरदन मुक्कामी जाऊन त्यांनी खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचीही भेट घेतली. त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे काही बाहेर आलेले नसले तरी निजामांच्या वंशजांची चर्चा मात्र शहरभर झाली.मोगल आणि निजामांचे वंशज म्हणवणारी मंडळी वर्षा-दोन वर्षात या शहरात येतात. कुणी पाणचक्की, मकबºयावर हक्क सांगतो तर कुणी किल्लेअर्कच्या मालकीचा दावा करतो. सालारजंग नावाचे निजामाचे पंतप्रधान होते. त्यांच्या मालकीचा काही भाग हा सालारजंग इस्टेट नावाने ओळखला जातो. त्यावरील होणारे दावे ऐकू येतात. बागशेरगंज हे सुद्धा एक दाव्यासाठी प्रसिद्ध नाव कारण काय तर ऐतिहासिक शहर मोगल, निजामाची दीर्घकाळ राजवट असल्याने शहर किती सुधारले, आधुनिकतेचा शेला पांघरला तरी सरंजामीवृत्ती टिकून आहे. म्हणून चर्चा होते. सालारजंगचा किस्साही मोठा रंजक आहे. या सालारजंगांनी ३०० बिघे जमीन एका कुंभाराच्या नावे करून दिली. त्याच्या आधारावर ५० वर्षापूर्वी शहरात वसाहत उभी राहिली. भूखंड पाडून विक्री झाली; पण कोणताही मूळ दस्तावेज नाही. अशी अनेक प्रकरणे घडली. नवखेडा किंवा हिमायत बाग ही निजामाची खासगी नव्हे तर ती निजाम सरकारची, राज्याची मालमत्ता होती. सरकार बदलल्यानंतर ती नव्या सरकारकडे आली. पुढे संस्थानिकांच्या ‘प्रिव्ही पर्स’ बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता त्यावेळी कोणतीही एक मालमत्ता तुमच्याकडे ठेवा असा नियम घातला गेला. कारण संस्थानिकांच्या सर्व मालमत्ता या जनतेच्या पैशातूनच उभ्या राहिलेल्या असल्याने लोकशाही, समाजवादी राज्यात त्या सरकारच्या मालकीच्या होणे अपरिहार्य होते म्हणून हा निर्णय झाला आणि सरकारकडे उरलेल्या मालमत्ता यात जमिनी, महाल आले. निजामी राजवट १९४९ मध्ये संपली त्यावेळी त्याच्या सर्व नोंदी झाल्या. निजामाने आपल्या मालमत्तेचे सात ट्रस्ट केले होते. त्यातून त्याची मुले, नातू यांना उत्पन्न मिळण्याची सोय केली होती. म्हणजे आपल्या वारसांची व्यवस्था निजामाने तेव्हाच करून ठेवली. अगदी अलीकडे हैदराबादेत काही लोकांनी आम्ही निजामाचे अनौरस वारस आहोत असा दावा करत मालमत्तेसाठी उपोषणही केले होते. असे दावे औरंगाबादेतच होत नाहीत तर हैदराबाद, लखनौ, भोपाळ अशा ठिकाणीही होतात; पण कुणाकडेही त्या दाव्यांचा आधार असणारी वैध कागदपत्रे नसतात म्हणून अशा घटनांची केवळ चर्चा होते. मोगलांच्या वंशजांनी औरंगाबादेत येऊन मकबºयावर दावा केला आणि पुरातत्त्व विभागात गेले पण तेथील अधिकाºयांनी या वंशजांना भेटही नाकारली होती. सरकारी पातळीवर हे पाळले जाते; पण सार्वजनिक जीवनात वावरणारी मंडळी अशा वंशजांना हाताशी घेऊन वेगळेच काही साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात. राजे-महाराजे, सुभेदार, जहागिरदारांचा जमाना इतिहासजमा झाला. महाल, कोठ्यांचे भग्नावशेष झाले तरी पीळ कायम आहे. नुसता सुंभ जळून उपयोग नाही.- सुधीर महाजन