शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उंदीरमामा नाथाभाऊंवर भडकले

By राजा माने | Updated: March 26, 2018 01:20 IST

इंद्रलोकीचा स्टार रिपोर्टर आपला यमके आज खूपच वैतागलेला होता. मराठी भूमीतील घडामोडींच्या रिपोर्टऐवजी चक्क उंदीर जातीवर अभ्यास करण्याची वेळ त्याच्यावर आली होती

इंद्रलोकीचा स्टार रिपोर्टर आपला यमके आज खूपच वैतागलेला होता. मराठी भूमीतील घडामोडींच्या रिपोर्टऐवजी चक्क उंदीर जातीवर अभ्यास करण्याची वेळ त्याच्यावर आली होती. महागुरू नारदांनी त्याच्याशी संपर्क साधून इंद्रदरबारात घडलेल्या आगळीकीची माहिती त्याला दिली होती. मराठी भूमीच्या राजदरबारात नाथाभाऊ नामक खानदेशपुत्राने गाजविलेल्या दरबाराची गूँज इंद्रदरबारापर्यंत पोहोचली. स्वर्गलोकातल्या सर्व महालांमधली ‘अखिल मराठी मूषक संघटना’ चवताळून उठली. अस्मिता अन् अस्तित्व काय फक्त मराठी नेत्यांनाच असते काय? आम्हा मराठी मूषकांच्या अस्तित्वाला धक्का लावाल तर आम्ही गप्प बसणार नाही ! गरज पडली तर भूतलावरील आमच्या मूषक बांधवांना आदेश देऊन राळेगणसूत अण्णांच्या मांडीला मांडी लावून रामलीला मैदानावर मूषकांची फौज बसवू! प्रसंगी यावर्षी गणरायाचे वाहक म्हणून सेवा देणारे मूषक संपावर जातील... मूषक ज्ञातीच्या या पवित्र्याने इंद्रदेव व्यथित झाले आणि नारदांना त्यांनी स्टार रिपोर्टर शिष्य यमकेशी मोबाईलवर संपर्क साधायला सांगितले...नारद : शिष्यवर नाथाभाऊंनी असे काय केले की, त्रिलोकातील मूषक ज्ञाती त्यांच्यावर रागावली?यमके : मूषक म्हणजे आमचे उंदीरमामाच ना! अहो, देवेंद्रभाऊंनी आपल्या अष्टरत्न मंडळातील वजनदार रत्न चंद्रकांतदादा यांच्या शिरावर ‘उंदीर मुक्ती’ मोहीम दिली होती. ३ लाख १९ हजार ४०० उंदरांची मुक्ती केल्याचा खलिता नाथाभाऊंच्या हाती पडला. त्यांनी त्या खलित्याची आणि देवेंद्रभाऊंच्या दरबाराची लक्तरे दरबारात टांगली...नारद : उद्धवराजे आणि त्यांचे सैन्य देवेंद्रभाऊंच्या कारभाराची लक्तरे जशी नेहमीच टांगायचा प्रयत्न करतात, तशी एकही संधी नाथाभाऊ सोडत नसतात हे सर्वज्ञात आहे. देवेंद्रभाऊंनी त्यांना अष्टरत्नातून वगळून खानदेशात धाडल्यामुळे त्यांचे तसे वागणे अपेक्षितच आहे. पण देवेंद्रभाऊंनी चिडण्याऐवजी स्वर्गलोकातील मराठी मूषक संघटना का बरे चिडली?यमके : महागुरू, नाथाभाऊंच्या आकडेवारीत झालेल्या घोळामुळे किंवा उंदीर मुक्तीला आता गती मिळेल म्हणून समस्त उंदीरमामा भडकले असतील...नारद : अरे, उलट स्वर्गलोकातील मूषक संघटनेने देवेंद्रभाऊंच्या समतावादी स्वभावाचे कौतुक केले आहे. संघटनेच्या बैठकीत अनेक वादग्रस्त मंत्र्यांना वाचवून कवचकुंडले व ‘स्वच्छता प्रमाणपत्रे’ बहाल करणाऱ्या देवेंद्रभाऊंच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. त्यात त्यांनी मराठी उंदरांच्या बाबतीतही तीच भूमिका घेऊन ‘उंदीर मुक्ती’ कागदावरच करून मूषक संघटनेला समतेने वागविल्याचा आवर्जून उल्लेख करण्यात आला...यमके : मग, नाथाभाऊंवर वैतागण्याचा मुद्दा येतोच कुठे?नारद : नाथाभाऊंनी मूषक विरोधक मांजरे किंवा बोके पाळण्याचा दिलेला सल्ला मूषक संघटनेला झोंबला! त्रिलोकाने तो सल्ला मानला तर आपली जमातच धोक्यात येईल म्हणून ते नाथाभाऊंवर खार खाऊन आहेत.- राजा माने

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसे