शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मार्ग खडतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2016 04:14 IST

‘सबके लिए आनंद लाएंगे सर्वानंद!’ आसामचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या शपथविधी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चारलेले हे वाक्य कितीही श्रवणीय

‘सबके लिए आनंद लाएंगे सर्वानंद!’ आसामचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या शपथविधी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चारलेले हे वाक्य कितीही श्रवणीय असले तरी, सगळ्यांसाठी आनंद आणणे, सर्वानंद सोनोवाल यांच्यासाठी सोपे नाही. प्रचाराची राळ उठवत निवडणुकीत विजय संपादन करणे जेवढे सोपे, तेवढेच प्रचारादरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करणे कठीण, याचा प्रत्यय नरेंद्र मोदींना दोन वर्षात आला आहे. मोदींच्या तुलनेत सोनोवाल यांचे मैदान खूप छोटे असले तरी, त्यांच्या समोरची आव्हाने मोदींच्या तुलनेत अजिबात छोटी नाहीत. आसाममध्ये भारतीय जनता पक्षाची वाढ आणि सत्ता संपादनामध्ये सर्वात प्रमुख भूमिका कोणत्या मुद्याने निभावली असेल, तर ती बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्याने! सत्ता मिळाल्यास दोन वर्षात बांगलादेशी घुसखोरांना परत धाडण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीदरम्यान दिले होते. मोदी सरकारची दोन वर्षे पूर्ण झाली; पण घुसखोर आहेत तिथेच आहेत. बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याच्या आव्हानाशिवाय सोनोवाल यांच्या समोर मोठे आव्हान असेल, ते स्वपक्षीय हेमंत बिश्वास सर्मा यांना शांत ठेवण्याचे! सोनोवाल आणि सर्मा हे दोघेही भाजपामध्ये उपरेच!! मुख्यमंत्री पद ही दोघांचीही महत्त्वाकांक्षा होती. त्यामध्ये सोनोवाल यांनी बाजी मारली खरी; पण त्यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून सहभागी झालेले सर्मा त्यांना सहयोग करतात, की अडचणी निर्माण करतात, यावरच सोनोवाल यांची पुढील वाटचाल निर्भर असणार आहे. सर्मा यांच्याशिवाय, भाजपाचे मित्र पक्ष असलेल्या आसाम गण संग्राम परिषद, बोडोलँड पीपल्स फ्रंट व इतर तीन पक्षांची मर्जी राखणे हेदेखील सोनोवाल यांच्या समोरचे मोठे आव्हान असेल. सध्याच्या घडीला सोनोवाल मंत्रिमंडळात भाजपाचे दहा, आसाम गण संग्राम परिषदेचे तीन, बोडोलँड पीपल्स फ्रंटचे दोन आणि गण शक्ती पक्षाचा एक मंत्री असेल, असे निश्चित झाले आहे; पण मित्र पक्षांद्वारा सत्तेत आणखी मोठ्या वाट्याची मागणी होण्याची शक्यता आहे आणि ती सोनोवाल यांची मोठी डोकेदुखी ठरू शकते. ही सगळी डोकेदुखी सांभाळून, आसामच्या जनतेला ‘अच्छे दिन’ दाखविण्याचे आव्हान सोनोवाल यांना पेलावे लागणार आहे. थोडक्यात, स्पष्ट बहुमत पाठीशी असले तरी सोनोवाल यांंंचा मार्ग खडतरच म्हणावा लागेल!