शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

मार्ग खडतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2016 04:14 IST

‘सबके लिए आनंद लाएंगे सर्वानंद!’ आसामचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या शपथविधी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चारलेले हे वाक्य कितीही श्रवणीय

‘सबके लिए आनंद लाएंगे सर्वानंद!’ आसामचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या शपथविधी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चारलेले हे वाक्य कितीही श्रवणीय असले तरी, सगळ्यांसाठी आनंद आणणे, सर्वानंद सोनोवाल यांच्यासाठी सोपे नाही. प्रचाराची राळ उठवत निवडणुकीत विजय संपादन करणे जेवढे सोपे, तेवढेच प्रचारादरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करणे कठीण, याचा प्रत्यय नरेंद्र मोदींना दोन वर्षात आला आहे. मोदींच्या तुलनेत सोनोवाल यांचे मैदान खूप छोटे असले तरी, त्यांच्या समोरची आव्हाने मोदींच्या तुलनेत अजिबात छोटी नाहीत. आसाममध्ये भारतीय जनता पक्षाची वाढ आणि सत्ता संपादनामध्ये सर्वात प्रमुख भूमिका कोणत्या मुद्याने निभावली असेल, तर ती बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्याने! सत्ता मिळाल्यास दोन वर्षात बांगलादेशी घुसखोरांना परत धाडण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीदरम्यान दिले होते. मोदी सरकारची दोन वर्षे पूर्ण झाली; पण घुसखोर आहेत तिथेच आहेत. बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याच्या आव्हानाशिवाय सोनोवाल यांच्या समोर मोठे आव्हान असेल, ते स्वपक्षीय हेमंत बिश्वास सर्मा यांना शांत ठेवण्याचे! सोनोवाल आणि सर्मा हे दोघेही भाजपामध्ये उपरेच!! मुख्यमंत्री पद ही दोघांचीही महत्त्वाकांक्षा होती. त्यामध्ये सोनोवाल यांनी बाजी मारली खरी; पण त्यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून सहभागी झालेले सर्मा त्यांना सहयोग करतात, की अडचणी निर्माण करतात, यावरच सोनोवाल यांची पुढील वाटचाल निर्भर असणार आहे. सर्मा यांच्याशिवाय, भाजपाचे मित्र पक्ष असलेल्या आसाम गण संग्राम परिषद, बोडोलँड पीपल्स फ्रंट व इतर तीन पक्षांची मर्जी राखणे हेदेखील सोनोवाल यांच्या समोरचे मोठे आव्हान असेल. सध्याच्या घडीला सोनोवाल मंत्रिमंडळात भाजपाचे दहा, आसाम गण संग्राम परिषदेचे तीन, बोडोलँड पीपल्स फ्रंटचे दोन आणि गण शक्ती पक्षाचा एक मंत्री असेल, असे निश्चित झाले आहे; पण मित्र पक्षांद्वारा सत्तेत आणखी मोठ्या वाट्याची मागणी होण्याची शक्यता आहे आणि ती सोनोवाल यांची मोठी डोकेदुखी ठरू शकते. ही सगळी डोकेदुखी सांभाळून, आसामच्या जनतेला ‘अच्छे दिन’ दाखविण्याचे आव्हान सोनोवाल यांना पेलावे लागणार आहे. थोडक्यात, स्पष्ट बहुमत पाठीशी असले तरी सोनोवाल यांंंचा मार्ग खडतरच म्हणावा लागेल!