शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
2
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
3
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
4
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
5
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
6
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
7
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
8
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
9
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
10
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
11
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
12
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
13
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
14
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
15
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
16
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
17
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
18
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
20
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 

मार्ग खडतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2017 00:43 IST

मणिपूरच्या रूपाने आणखी एक राज्य येनकेन प्रकारेण खिशात घालून, कॉँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने भाजपाने आणखी एक पाऊल टाकले

मणिपूरच्या रूपाने आणखी एक राज्य येनकेन प्रकारेण खिशात घालून, कॉँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने भाजपाने आणखी एक पाऊल टाकले. या चिमुकल्या राज्यात कमळ फुलविल्याचा जो काही आनंद भाजपाला मिळायचा तो मिळो; पण त्या निमित्ताने किमान मणिपूरची आर्थिक नाकेबंदीची भळभळती जखम बरी झाल्यास संपूर्ण देशाला आनंद होईल. तीस लाखापेक्षाही थोडी कमीच लोकसंख्या असलेले मणिपूर सर्वार्थाने चिमुकले राज्य आहे. मध्यभागी खोरे आणि त्याला सर्व बाजूंनी वेढा घातलेला पर्वतीय प्रदेश अशी मणिपूरची भौगोलिक रचना आहे. मणिपूरमधील नागाबहुल पर्वतीय प्रदेश, तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम आणि म्यानमार या शेजारी देशातीलही काही भूभागाचा समावेश करून बृहन नागालॅँडची निर्मिती करावी, ही नागांची जुनी मागणी आहे. तिच्या पूर्ततेच्या मागणीसाठी ते वेळोवेळी मणिपूरच्या आर्थिक नाकेबंदीचे हत्यार उपसत असतात. सात नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याच्या तत्कालीन कॉँग्रेस सरकारच्या निर्णयाच्या विरोधात गत १ नोव्हेंबरपासून बेमुदत आर्थिक नाकेबंदी पुकारण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत. आपला पक्ष सत्तेवर आल्यास ४८ तासांच्या आत आर्थिक नाकेबंदी संपुष्टात आणण्याचे आश्वासन भाजपा नेत्यांनी प्रचारादरम्यान दिले होते. तीच आपली सर्वोच्च प्राथमिकता असेल, असे नूतन मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी शपथ ग्रहण केल्यानंतर लगेच बोलून दाखविले. नागांचे प्रतिनिधित्व करणारा नागा पीपल्स फ्रंट हा पक्ष आघाडी सरकारमध्ये सहभागी असल्यामुळे ते काम वरकरणी सोपे वाटत असले तरी, नाकेबंदी घोषित करणारी युनाएटेड नागा कौन्सिल ही संघटना काही माघारीच्या मन:स्थितीत दिसत नाही. त्यामुळे एन. बिरेन सिंग यांचा मार्ग खडतरच दिसतो. नाकेबंदी उठवली जाण्यासाठी एखाद्या वेळी नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीचा निर्णयदेखील मागे घ्यावा लागू शकेल. नाकेबंदीचा फटका प्रामुख्याने खोऱ्यातील मैतेईबहुल लोकसंख्येला बसला आहे. त्यामुळे खोऱ्यात भाजपाला थारा मिळणार नाही, असा काँग्रेसचा होरा होता; मात्र तो चुकीचा ठरला. हिंदू धर्माचे आचरण करणाऱ्या मैतेर्इंनी भाजपाला साथ दिल्याचे निकालांमधून स्पष्ट झाले आहे. आता भाजपा सरकार नागांसमोर झुकले तर मैतेर्इंमध्ये चुकीचा संदेश जाण्याची भीती आहे. त्यामुळे मैतेर्इंना न दुखवता नागांचा अहं जोपासणे, ही मणिपूर सरकारसाठी अग्निपरीक्षाच असणार आहे. मुख्यमंत्री बिरेन सिंग त्यामधून कसे पार पडतात, यावरच त्या राज्यातील पहिल्या भाजपा सरकारचे यश सुनिश्चित होणार आहे.