शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

रस्त्यांनाच गतिरोध

By admin | Updated: January 25, 2017 23:28 IST

औरंगाबादेत आकाराला येणारे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉर (डीएमआयसी), जालन्याचा ड्रायपोर्ट हे प्रकल्प भविष्याच्या दृष्टीने मराठवाड्यासाठी महत्त्वाकांक्षी आहेत.

औरंगाबादेत आकाराला येणारे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉर (डीएमआयसी), जालन्याचा ड्रायपोर्ट हे प्रकल्प भविष्याच्या दृष्टीने मराठवाड्यासाठी महत्त्वाकांक्षी आहेत. यांच्या जोरावरच विकासाची गती पुढची पाच-पन्नाच वर्षे वाढती राहील. डीएमआयसीच्या माध्यमातून उद्योगासाठी १० हजार एकर जागा देशभरात फक्त मराठवाड्यात उपलब्ध आहे. तर ड्रायपोर्टमुळे येथून थेट बंदरापर्यंत माल पोहोचविण्याची सुविधा होणार असल्याने निर्यात सोपी होईल आणि निर्यातक्षम उद्योग इकडे वळतील. विकासाकडे ही वाटचाल गेल्या पाच वर्षात योग्य दिशेने चालू होती यात कमतरता होती ती रस्त्यांची. वाढती वाहतूक लक्षात घेऊन येथील रस्ते रुंद चौपदरी करणे आवश्यक होते. म्हणून गेल्या वर्षी रस्ते विकासासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी १८ हजार कोटी रुपयांच्या रुंदीकरण, विकासकामाची घोषणा करून गती देण्याचा प्रयत्न केला. गडकरींच्या म्हणण्यानुसार हे रस्ते बनले असते तर मराठवाडा हा गतिमान प्रदेश बनला असता; पण येथेही वर्षभरानंतर माशी शिंकली आणि गडकरींचे सारे चौपदरीकरणाचे प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय झाला. म्हणजे रस्ते आहे तसेच राहतील. वर्षभरात वाहनसंख्या कमी होणारा मराठवाडा हा एकमेव प्रदेश जगाच्या पाठीवर असावा. या निर्णयामुळे पैठण, जळगाव, शिर्डी, नांदेड या शहरांना जोडणारे रस्ते आहे तसेच राहणार आहेत. वर्दळ वाढली आहे. अपघातांसोबत बळींची संख्याही वाढते आहे. चौपदरी करणाचा निर्णय बदलल्याने रस्त्यासाठी मिळणाऱ्या १८ हजार कोटी रुपयांऐवजी फक्त १२ हजार कोटी रुपये मिळतील. तब्बल ६ हजार कोटी रुपयाला मराठवाडा मुकणार असून, रस्त्यांचा अनुशेष ३५०० कोटी झाला आहे. एवढा मोठा निधी पुन्हा भविष्यात मिळण्याची शक्यता नाही आणि पुढची पाच-दहा वर्षे तरी रस्ते हा विषय मराठवाड्यासाठी निकाली निघाला आहे. चौपदरीकरण करता येणार नसल्याने तीन पदरी रस्त्यांचा नवाच प्रकार पुढे येण्याचा प्रयत्न आहे यामुळे अपघात वाढतील. चांगले रस्तेच नसतील तर विकासाची गती खुंटणार त्याचे दूरगामी परिणाम रोजगार निर्मितीवर होणार. या दुष्टचक्रात आजवर अडकलेला मराठवाडा बाहेर पडण्याची शक्यता नाही; ही उपेक्षा कधी थांबणार?