शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

मितभाषी ‘एटी’

By admin | Updated: May 11, 2017 00:22 IST

एरवी एखादे पद माणसाच्या पदरात पडले की, त्याचे राहणीमान, वागणे-बोलणे बदलल्याची आणि समाजापासून तो काहीसे अंतर ठेवून वावरू लागल्याची उदाहरणे कमी नाहीत.

एरवी एखादे पद माणसाच्या पदरात पडले की, त्याचे राहणीमान, वागणे-बोलणे बदलल्याची आणि समाजापासून तो काहीसे अंतर ठेवून वावरू लागल्याची उदाहरणे कमी नाहीत. परंतु तब्बल आठवेळा आमदारकी व चार वेळा मंत्रिपद भूषवूनही आपल्या वागण्या-बोलण्यात अथवा राहणीमानात कसलाही बदल न करणारी व्यक्ती विरळच ठरावी. अर्जुन तुळशिराम तथा ‘एटी’ पवार हे त्यापैकीच एक. नाशिक जिल्ह्यातील दळवट या आदिवासी गावाच्या सरपंचपदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. भारतीय क्रांती दल ते राष्ट्रवादी कॉँग्रेस व्हाया कॉँग्रेस व भाजपा अशा सुमारे चार दशकांहून अधिकच्या आपल्या राजकीय प्रवासात एटींनी कसलाही राजकीय वाद ओढवून घेतला नाही, त्यामागील कारणही त्यांच्या शांत व अबोल स्वभावात दडले होते. आक्रमकता व आक्रस्ताळेपणातून प्रसिद्धी जरूर मिळते, परंतु कामे होतातच असे नाही त्यासाठी दोन हात सदा जोडलेले असणेच उपयोगी ठरते. ‘एटी’ याच कार्यशैलीसाठी परिचित होते. दोन हात व एक मस्तक हेच त्यांचे भांडवल. त्याच बळावर त्यांनी विकासापासून दूर राहिलेल्या कळवण तालुक्यातील जनतेसाठी अनेकविध प्रकल्प राबविले. जमीन मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांना दगड मारून पळवून लावण्याची प्रथा असणाऱ्या आदिवासी भागात ‘अर्जुनसागर’सारखा प्रकल्प उभारून परिसरातील पाणी समस्या दूर करण्याचे श्रेय तर त्यांना जातेच पण आदिवासींच्या विकासासाठी स्वतंत्र खाते व अर्थसंकल्पात विशिष्ट निधी राखीव ठेवण्याच्या निर्णयाचे सूत्रपातकर्ते म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, तापी महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. या सर्व पदांना न्याय देताना त्यांनी कळवण व आदिवासी बांधवांकडे कधी दुर्लक्ष होऊ दिले नाही. म्हणूनच कळवण म्हणजे एटी आणि एटी म्हणजे कळवण असे एक सूत्रच होऊन बसले होते. पक्ष बदलला तरी कळवणच्या मतदारांनी एटींची पाठ कधी सोडली नाही. २०१४च्या निवडणुकीत मतदारसंघ पुनर्रचनेचा फटका त्यांना बसला; पण त्यांच्या साधेपणाने हात जोडून वावरण्यात अखेरपर्यंत बदल झाला नाही. अखेर जनतेला काय हवे असते? आपला नेता आपल्या सोबत आहे, याचेच त्यांना कौतुक असते. त्यामुळेच एटींचे जाणे सर्वांसाठी चटका लावणारे आहे.