शहरं
Join us  
Trending Stories
1
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
2
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
5
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
6
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
7
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
8
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
9
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
10
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
11
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
12
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
13
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
14
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
15
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
16
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
17
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
18
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
19
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
20
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर

मितभाषी ‘एटी’

By admin | Updated: May 11, 2017 00:22 IST

एरवी एखादे पद माणसाच्या पदरात पडले की, त्याचे राहणीमान, वागणे-बोलणे बदलल्याची आणि समाजापासून तो काहीसे अंतर ठेवून वावरू लागल्याची उदाहरणे कमी नाहीत.

एरवी एखादे पद माणसाच्या पदरात पडले की, त्याचे राहणीमान, वागणे-बोलणे बदलल्याची आणि समाजापासून तो काहीसे अंतर ठेवून वावरू लागल्याची उदाहरणे कमी नाहीत. परंतु तब्बल आठवेळा आमदारकी व चार वेळा मंत्रिपद भूषवूनही आपल्या वागण्या-बोलण्यात अथवा राहणीमानात कसलाही बदल न करणारी व्यक्ती विरळच ठरावी. अर्जुन तुळशिराम तथा ‘एटी’ पवार हे त्यापैकीच एक. नाशिक जिल्ह्यातील दळवट या आदिवासी गावाच्या सरपंचपदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. भारतीय क्रांती दल ते राष्ट्रवादी कॉँग्रेस व्हाया कॉँग्रेस व भाजपा अशा सुमारे चार दशकांहून अधिकच्या आपल्या राजकीय प्रवासात एटींनी कसलाही राजकीय वाद ओढवून घेतला नाही, त्यामागील कारणही त्यांच्या शांत व अबोल स्वभावात दडले होते. आक्रमकता व आक्रस्ताळेपणातून प्रसिद्धी जरूर मिळते, परंतु कामे होतातच असे नाही त्यासाठी दोन हात सदा जोडलेले असणेच उपयोगी ठरते. ‘एटी’ याच कार्यशैलीसाठी परिचित होते. दोन हात व एक मस्तक हेच त्यांचे भांडवल. त्याच बळावर त्यांनी विकासापासून दूर राहिलेल्या कळवण तालुक्यातील जनतेसाठी अनेकविध प्रकल्प राबविले. जमीन मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांना दगड मारून पळवून लावण्याची प्रथा असणाऱ्या आदिवासी भागात ‘अर्जुनसागर’सारखा प्रकल्प उभारून परिसरातील पाणी समस्या दूर करण्याचे श्रेय तर त्यांना जातेच पण आदिवासींच्या विकासासाठी स्वतंत्र खाते व अर्थसंकल्पात विशिष्ट निधी राखीव ठेवण्याच्या निर्णयाचे सूत्रपातकर्ते म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, तापी महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. या सर्व पदांना न्याय देताना त्यांनी कळवण व आदिवासी बांधवांकडे कधी दुर्लक्ष होऊ दिले नाही. म्हणूनच कळवण म्हणजे एटी आणि एटी म्हणजे कळवण असे एक सूत्रच होऊन बसले होते. पक्ष बदलला तरी कळवणच्या मतदारांनी एटींची पाठ कधी सोडली नाही. २०१४च्या निवडणुकीत मतदारसंघ पुनर्रचनेचा फटका त्यांना बसला; पण त्यांच्या साधेपणाने हात जोडून वावरण्यात अखेरपर्यंत बदल झाला नाही. अखेर जनतेला काय हवे असते? आपला नेता आपल्या सोबत आहे, याचेच त्यांना कौतुक असते. त्यामुळेच एटींचे जाणे सर्वांसाठी चटका लावणारे आहे.