शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 05:35 IST

सध्या रिझर्व्ह बँकेचा ९.४१ लाख कोटी निधी हा एकूण संपत्तीच्या सात टक्के म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडा जास्त आहे. अशा स्थितीत सरकारने रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीवर डोळा ठेवणे कितपत औचित्यपूर्ण आहे हा खरा प्रश्न आहे.

रिझर्व्ह बँकेने आपल्या राखीव निधीमधून १.७६ लाख कोटी सरकारला देण्याचे ठरविले आहे. खरे तर हा निर्णय रिझर्व्ह बँकेने स्वेच्छेने घेतला नसून बिमल जालान समितीच्या शिफारसवजा दबावामुळे घेतला आहे. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेमध्ये रघुराम राजन यांच्या काळापासून गेल्या पाच वर्षांत सुरू असलेल्या शीतयुद्धाची ती परिणती आहे. यात सरकार रिझर्व्ह बँकेवर कुरघोडी करण्यात यशस्वी ठरले असे सकृतदर्शनी दिसत असले तरी रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह लागले आहे हे स्पष्ट आहे.

रिझर्व्ह बँकेचा राखीव निधी हा अडचणीत आलेल्या बँकांना तारण्यासाठी असतो व वेळोवेळी त्यातून कमजोर झालेल्या बँकांना सशक्त करण्यासाठी भांडवल दिले जात असते. याचे उत्कृष्ट उदाहरण १९९६ मधील चेन्नईच्या इंडियन बँकेला १४०० कोटी एकमुश्त भांडवल देण्याचे आहे. जयललिता मुख्यमंत्री असताना कर्ज मेळाव्याद्वारे जे कर्जवाटप झाले ते परत आले नाही़ त्यामुळे इंडियन बँक दुर्बल झाली होती व तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी अर्थसंकल्पात तरतूद केली नाही म्हणून रिझर्व्ह बँकेला विनंती केली होती व रिझर्व्ह बँकेनेही ती स्वीकारली होती. आजच्या घडीला रिझर्व्ह बँकेजवळ २.५० लाख कोटी आकस्मिक तरतूद निधी (काँटीन्ज सी फंड) आहे व रिझर्व्ह बँकेजवळ जे सोने व विदेशी चलन आहे ते ६.९१ लाख कोटींचे आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचा एकूण राखीव निधी ९.४१ लाख कोटी आहे. १९९७ साली स्थापन झालेल्या एका वित्त समितीने सर्व बँकांच्या एकूण संपत्तीच्या १२ टक्के राखीव निधी रिझर्व्ह बँकेने ठेवावा, अशी शिफारस केली होती. खरे तर सरकारला दरवर्षी रिझर्व्ह बँकेकडून सरकारी भांडवलावरील लाभांश मिळत असतो व तो सतत वाढता आहे. २०१४-१५ मध्ये सरकारला ६६,००० कोटी, २०१५-१६ मध्ये पुन्हा ६६,००० कोटी २०१६-१७ मध्ये नोटाबंदीमुळे ३१,००० कोटी, २०१७-१८ मध्ये ५०,००० कोटी व २०१८-१९ मध्ये ६८,००० कोटी असा लाभांश सरकारला मिळाला आहे. तरीही गेल्या पाच वर्षांपासून सरकारने रिझर्व्ह बँकेचा राखीव निधी सरकारकडे हस्तांतरित करण्याचा धोशा लावला आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेचे दोन गव्हर्नर रघुराम राजन व ऊर्जित पटेल आणि डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य राजीनामा देऊन गेल्या तीन वर्षांत बाहेर पडले आहेत.

आचार्य यांनी राजीनामा देताना रिझर्व्ह बँक स्वतंत्र तर नाहीच, स्वायत्तसुद्धा नाही, असे खोचक विधान केले होते. सरकारला रिझर्व्ह बँकेचा राखीव निधी का हवा आहे, या प्रश्नाचे उत्तर सरकारचा कमी होत चाललेला महसूल व वाढता योजना खर्च आहे. याचे मुख्य कारण म्हणजे एकीकडे विकासदर सतत वाढत आहे, असा दावा करत असताना महसूल कमी झाला हे मात्र सरकारने गेली पाच वर्षे कधीच मान्य केले नाही. परिणामी अर्थसंकल्पीय तूट सतत वाढत आहे. सध्या ही तूट जीडीपीच्या ३.८० टक्के म्हणजे जवळपास ७.५० लाख कोटी झाली आहे आणि म्हणून सरकारला रिझर्व्ह बँकेचा राखीव निधी हवा आहे. अर्थसंकल्पीय तूट वाढणे हे अर्थव्यवस्था मंदीत असल्याचे लक्षण आहे. देशातील बेरोजगारीचा दर ६.१० टक्के म्हणजे बेरोजगारांचा आकडा ७.८० कोटींवर गेला आहे. वाहन उद्योगात प्रचंड मंदी आली आहे़ वाहन कंपन्यांनी कामगार कपात सुरू केली आहे. गेल्या एक वर्षात १.१० कोटी लोक बेकार झाले आहेत. त्यापैकी एकट्या वाहन क्षेत्रातील पाच लाख लोक आहेत. एवढेच नव्हे तर १८ सरकारी बँकांचे थकीत कर्ज १० लाख कोटींपेक्षा अधिक झाले आहे.

चीन-अमेरिका व्यापारयुद्धाचा परिणाम अर्थव्यवस्था मंदावण्यात झाला आहे आणि परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अशा स्थितीत सरकारी व इतर बँकांना तारण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा राखीव निधी सरकारकडे हस्तांतरित करावा, अशी शिफारस बिमल जालान समितीने केली आहे आणि ती रिझर्व्ह बँकेने त्वरित स्वीकारून १.७६ लाख कोटी सरकारला देण्याचे ठरवले आहे. वरकरणी हे सर्व आलबेल वाटत असले तरी अर्थव्यवस्था व बँकांचा आधार अनवधानाने नाहीसा होण्याची शक्यता बळावली आहे. भारतासारख्या १३० कोटी लोकसंख्येच्या देशासाठी ही खचितच आनंदाची बाब नव्हे!

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक