शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ता ते महासत्ता

By admin | Updated: January 25, 2017 23:23 IST

प्रजासत्ताक दिन अर्थात सामान्य माणसाच्या संविधानिक स्वातंत्र्याची ग्वाही ! भारताला १५ आॅगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले; परंतु हा स्वातंत्र्याचा उद्घोष

प्रजासत्ताक दिन अर्थात सामान्य माणसाच्या संविधानिक स्वातंत्र्याची ग्वाही ! भारताला १५ आॅगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले; परंतु हा स्वातंत्र्याचा उद्घोष जितका देशभक्तीने भारलेला होता तितकेच महत्त्वाचे होते या देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखताना देशाला एकसंध राखणे आणि प्रत्येकाला मुक्त स्वातंत्र्याचा अनुभव देणे. भारत देश मात्र विविधतेने नटलेला. विविध जातीधर्मात विभागलेला, प्रादेशिक अस्मितेने घट्ट बांधलेला... असे असताना सर्वमान्य होईल आणि देशाला समानतेच्या एका धाग्यात बांधून ठेवेल असे काहीतरी हवे होते. केवळ स्वातंत्र्य मिळाले इतके पुरेसे नसून आता देशात लोकांची सत्ता अर्थात प्रजासत्ताक निर्माण झाले आहे ही भावना सुरुवातीपासून रुजायला हवी होती. देशाची राज्यघटना ही त्या भारतीय प्रजासत्ताकाची मुहूर्तमेढ होती.डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने देशाची राज्यघटना साकारली आणि या देशाला एक घटनात्मक चौकट प्राप्त झाली. देशाचे संवैधानिक स्थैर्य आणि त्या स्थैर्याच्या बळावर होणारी विकासाची वाटचाल यांना देशाच्या स्वातंत्र्यलढ्याने निर्माण केलेल्या मूल्यांचे अधिष्ठान आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारत हे एक सार्वभौम लोकशाही गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले ते या देशातील जनतेची व सत्ताधाऱ्यांचीही सत्य, अहिंसा, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या जगन्मान्य मूल्यांएवढीच लोकशाही व धर्मनिरपेक्षता या मूल्यांवरही निष्ठा आहे म्हणूनच. देशावर किती आव्हाने आली; पण या देशातील लोकांनी ती समर्थपणे पेलली. देशाची एकसंधता अबाधित राखली. गुलामीच्या पाशातून मुक्त झालेला भारत आज महासत्ता बनण्याच्या दिशेने समर्थपणे वाटचाल करू लागला आहे. आजमितीला प्रजासत्ताक दिन आपण उत्साहात साजरा करतोय. उद्योगधंदे, पायाभूत सुविधा यात प्रगती करतानाच भारताने अण्वस्त्रे आणि सामरिक सुसज्जता तर प्राप्त केलीच; पण चांद्रयान, मंगळमोहीम यातही पुढे राहून अवकाशातही स्वत:चे नाव कोरले.२५ डिसेंबर १९२९ रोजी लाहोरनगरीत राष्ट्रीय सभेच्या ४४व्या अधिवेशनाला सुरवात झाली याच अधिवेशनाचे अध्यक्ष असलेले पं. जवाहरलाल नेहरू यांनी ‘स्वराज्य’ या शब्दाचा अर्थ ‘संपूर्ण स्वातंत्र्य’ असा घोषित केला. त्याच क्षणी पं. नेहरुंच्या हस्ते तिरंगा राष्ट्रध्वज महात्मा गांधीजींच्या साक्षीने फडकवला गेला. संपूर्ण स्वातंत्र्याची ही घोषणा देशभर पसरली. २ जानेवारी १९३० च्या बैठकीत ‘२६ जानेवारी’ हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून देशभर पाळण्यात यावा असा ठराव करण्यात आला. त्या आदेशानुसार २६ जानेवारी १९३० हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून देशभर साजरा झाला. १५ आॅगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले व हा २६ जानेवारी विस्मरणात जाणार का? असे वाटत असतानाच सुदैवाने याच दिवशी देशाची राज्यघटना अमलात आणली गेली. हा एक सुवर्णयोग! आज भारताने जागतिक पातळीवर स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे. अर्थात त्याचे श्रेय राज्यव्यवस्थेला जसे आहे तसेच देशाने सार्वभौम राष्ट्र म्हणून दिलेल्या स्वीकृतीलाही आहे. आपली सत्ता लोकशाही मार्गाने प्रस्थापित होते. लोकशाही प्रगल्भ आणि समृद्ध होईल तेवढा प्रगतीचा वेग वाढणार. कोणत्याही देशाची प्रगती त्या देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवर निर्भर करते. भारतात कोणत्या पक्षाचे सरकार सत्तारूढ आहे यापेक्षा ते लोकशाही पद्धतीचे आहे, लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य आहे, हे महत्त्वाचे ! गेल्या साडेसहा दशकांहून अधिक काळ अनेक राजकीय स्थितंतरे झाली; पण या राजकीय स्पर्धेतही लोकशाही प्रणाली अस्तित्व टिकवून राहिली. जगात अनेक देशांची उलथापालथ होत असताना भारताने मात्र जी विविधतेत एकता जपली आहे ती पाहून अवघे जग स्तिमित होते. लोकांना त्यांचे व्यक्तिगत व सामूहिक स्वातंत्र्य देणारी लोकशाही देशात रुजली आहे; परंतु ती अधिक परिपक्व होण्याची मात्र नितांत गरज आहे. जनादेशाच्या आधारेच देशावर सत्ता कोणाची हे निर्धारित होते. बहुपक्षीय व्यवस्था, निवडणुकांचा घोडेबाजार यामधून भारतीय निवडणूक प्रक्रियेत अनेक गैरप्रकारही शिरलेले दिसतात. जे लोकशाही प्रक्रियेला गालबोट लावतात. देशाचे सार्वभौमत्व टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे याची जाणीव आपल्याला असायला हवी. हक्क उपभोगताना कर्तव्याची जाणीव हवी. प्रजासत्ताक दिनी हेच भान मनामनात जागृत व्हावे व आपला प्रजासत्ताक देश महासत्ताक व्हावा, हीच सदिच्छा.- विजय बाविस्कर