शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

मनोरुग्णांना दिलासा

By admin | Updated: February 24, 2017 23:57 IST

मानसिक रोगातून बऱ्या झालेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी दिशानिर्देश तयार करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अशा पीडित आणि असहाय रुग्णांना दिलासा आणि जगण्याची नवी उमेद देणारा ठरणार आहे

मानसिक रोगातून बऱ्या झालेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी दिशानिर्देश तयार करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अशा पीडित आणि असहाय रुग्णांना दिलासा आणि जगण्याची नवी उमेद देणारा ठरणार आहे. हे मनोरुग्ण उपचाराने बरे झाल्यावर त्यांंचे कुटुंबीयसुद्धा त्यांना घरी घेऊन जाण्यास इच्छुक नसतात, हे वास्तव लक्षात आणून देतानाच हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असल्याने शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरजही न्यायालयाने अधोरेखित केली आहे. बहुतांश वेळेस असे अनुभवास येते की, मनोरुग्ण आजारातून पूर्णपणे बरे झाले की शासकीय मनोरुग्णालये अथवा नर्सिंग होममध्ये त्यांना वास्तव्याची परवानगी दिली जात नाही. दुसरीकडे त्यांचे नातेवाईकही त्यांना परत घरी घेऊन जाण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे या रुग्णांना जगण्याचा आधारच नसतो. यापैकी अनेकांना तर वर्षानुवर्षे मनोरुग्णालयातच खितपत राहावे लागते आणि जे घरी जातात त्यांचेही आयुष्य खचितच सामान्य होते. खरे तर अशा मानसिक अवस्थेत त्यांची जपणूक करणे आवश्यक असते. पण त्यांच्याप्रति संवेदनशीलता दाखविणे तर दूरच उलट त्यांच्यावर अत्याचार होत असल्याचे निदर्शनास येते. नागपुरात एका पोलीस शिपायाने आपल्या मनोरुग्ण पत्नीला घरातच उपाशीपोटी डांबून ठेवल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. समाजात मनोरुग्णांबद्दल अत्यंत अमानवीय दृष्टिकोन बाळगला जातो. त्यांचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकारही हिरावून घेतला जातो, ही वस्तुस्थिती आहे. नॅशनल क्राइम ब्युरोच्या २०१५च्या अहवालानुसार देशात सुमारे आठ हजार मनोरुग्णांनी आत्महत्त्या केली असून, त्यात महाराष्ट्रातील १,४१२ लोकांचा समावेश आहे. आज वाढते नैराश्य हा जागतिक पातळीवरील चिंतेचा विषय झाला आहे. विश्व आरोग्य संघटनेनुसार सद्यस्थिती जगभरात ३५ कोटींपेक्षा अधिक लोक नैराश्याने ग्रस्त आहेत. भारतात नैराश्यग्रस्तांची संख्या साडेतीन कोटींच्या घरात पोहोचली असून, ही फार मोठ्या धोक्याची घंटा आहे.