शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

मनोरुग्णांना दिलासा

By admin | Updated: February 24, 2017 23:57 IST

मानसिक रोगातून बऱ्या झालेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी दिशानिर्देश तयार करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अशा पीडित आणि असहाय रुग्णांना दिलासा आणि जगण्याची नवी उमेद देणारा ठरणार आहे

मानसिक रोगातून बऱ्या झालेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी दिशानिर्देश तयार करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अशा पीडित आणि असहाय रुग्णांना दिलासा आणि जगण्याची नवी उमेद देणारा ठरणार आहे. हे मनोरुग्ण उपचाराने बरे झाल्यावर त्यांंचे कुटुंबीयसुद्धा त्यांना घरी घेऊन जाण्यास इच्छुक नसतात, हे वास्तव लक्षात आणून देतानाच हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असल्याने शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरजही न्यायालयाने अधोरेखित केली आहे. बहुतांश वेळेस असे अनुभवास येते की, मनोरुग्ण आजारातून पूर्णपणे बरे झाले की शासकीय मनोरुग्णालये अथवा नर्सिंग होममध्ये त्यांना वास्तव्याची परवानगी दिली जात नाही. दुसरीकडे त्यांचे नातेवाईकही त्यांना परत घरी घेऊन जाण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे या रुग्णांना जगण्याचा आधारच नसतो. यापैकी अनेकांना तर वर्षानुवर्षे मनोरुग्णालयातच खितपत राहावे लागते आणि जे घरी जातात त्यांचेही आयुष्य खचितच सामान्य होते. खरे तर अशा मानसिक अवस्थेत त्यांची जपणूक करणे आवश्यक असते. पण त्यांच्याप्रति संवेदनशीलता दाखविणे तर दूरच उलट त्यांच्यावर अत्याचार होत असल्याचे निदर्शनास येते. नागपुरात एका पोलीस शिपायाने आपल्या मनोरुग्ण पत्नीला घरातच उपाशीपोटी डांबून ठेवल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. समाजात मनोरुग्णांबद्दल अत्यंत अमानवीय दृष्टिकोन बाळगला जातो. त्यांचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकारही हिरावून घेतला जातो, ही वस्तुस्थिती आहे. नॅशनल क्राइम ब्युरोच्या २०१५च्या अहवालानुसार देशात सुमारे आठ हजार मनोरुग्णांनी आत्महत्त्या केली असून, त्यात महाराष्ट्रातील १,४१२ लोकांचा समावेश आहे. आज वाढते नैराश्य हा जागतिक पातळीवरील चिंतेचा विषय झाला आहे. विश्व आरोग्य संघटनेनुसार सद्यस्थिती जगभरात ३५ कोटींपेक्षा अधिक लोक नैराश्याने ग्रस्त आहेत. भारतात नैराश्यग्रस्तांची संख्या साडेतीन कोटींच्या घरात पोहोचली असून, ही फार मोठ्या धोक्याची घंटा आहे.