शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मनोरुग्णांना दिलासा

By admin | Updated: February 24, 2017 23:57 IST

मानसिक रोगातून बऱ्या झालेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी दिशानिर्देश तयार करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अशा पीडित आणि असहाय रुग्णांना दिलासा आणि जगण्याची नवी उमेद देणारा ठरणार आहे

मानसिक रोगातून बऱ्या झालेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी दिशानिर्देश तयार करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अशा पीडित आणि असहाय रुग्णांना दिलासा आणि जगण्याची नवी उमेद देणारा ठरणार आहे. हे मनोरुग्ण उपचाराने बरे झाल्यावर त्यांंचे कुटुंबीयसुद्धा त्यांना घरी घेऊन जाण्यास इच्छुक नसतात, हे वास्तव लक्षात आणून देतानाच हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असल्याने शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरजही न्यायालयाने अधोरेखित केली आहे. बहुतांश वेळेस असे अनुभवास येते की, मनोरुग्ण आजारातून पूर्णपणे बरे झाले की शासकीय मनोरुग्णालये अथवा नर्सिंग होममध्ये त्यांना वास्तव्याची परवानगी दिली जात नाही. दुसरीकडे त्यांचे नातेवाईकही त्यांना परत घरी घेऊन जाण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे या रुग्णांना जगण्याचा आधारच नसतो. यापैकी अनेकांना तर वर्षानुवर्षे मनोरुग्णालयातच खितपत राहावे लागते आणि जे घरी जातात त्यांचेही आयुष्य खचितच सामान्य होते. खरे तर अशा मानसिक अवस्थेत त्यांची जपणूक करणे आवश्यक असते. पण त्यांच्याप्रति संवेदनशीलता दाखविणे तर दूरच उलट त्यांच्यावर अत्याचार होत असल्याचे निदर्शनास येते. नागपुरात एका पोलीस शिपायाने आपल्या मनोरुग्ण पत्नीला घरातच उपाशीपोटी डांबून ठेवल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. समाजात मनोरुग्णांबद्दल अत्यंत अमानवीय दृष्टिकोन बाळगला जातो. त्यांचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकारही हिरावून घेतला जातो, ही वस्तुस्थिती आहे. नॅशनल क्राइम ब्युरोच्या २०१५च्या अहवालानुसार देशात सुमारे आठ हजार मनोरुग्णांनी आत्महत्त्या केली असून, त्यात महाराष्ट्रातील १,४१२ लोकांचा समावेश आहे. आज वाढते नैराश्य हा जागतिक पातळीवरील चिंतेचा विषय झाला आहे. विश्व आरोग्य संघटनेनुसार सद्यस्थिती जगभरात ३५ कोटींपेक्षा अधिक लोक नैराश्याने ग्रस्त आहेत. भारतात नैराश्यग्रस्तांची संख्या साडेतीन कोटींच्या घरात पोहोचली असून, ही फार मोठ्या धोक्याची घंटा आहे.