शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रामनाथजी कोविंद

By admin | Updated: June 21, 2017 01:18 IST

बिहारचे राज्यपाल महामहिम रामनाथ कोविंद यांना आपली राष्ट्रपतिपदाची उमेदवारी देऊन भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी सगळ्यांना आश्चर्याएवढाच कुतूहलाचाही धक्का दिला आहे

बिहारचे राज्यपाल महामहिम रामनाथ कोविंद यांना आपली राष्ट्रपतिपदाची उमेदवारी देऊन भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी सगळ्यांना आश्चर्याएवढाच कुतूहलाचाही धक्का दिला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीजवळ या निवडणुकीतील ५४ टक्के मते असल्याचे जाहीर केल्याने कोविंद यांची निवडही निश्चित मानावी अशीच झाली आहे. त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर जनता दल (यू) चे अध्यक्ष व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि तेलंगण राष्ट्रसमितीचे के. चंद्रशेखरराव यांनी त्यांच्या उमेदवारीचे केलेले स्वागतही त्यांच्या निवडीची खात्री पटविणारे आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ही निवड व तिची पद्धत या दोन्ही गोष्टी आवडल्या नाहीत. त्यांच्या मते कोविंद यांना राष्ट्रपतिपद देण्याएवढे त्यांचे देश व समाज यातील काम मोठे वा लक्षणीय नाही. लालकृष्ण अडवाणी किंवा सुषमा स्वराज यांची नावे त्यांच्याऐवजी भाजपने पुढे करणे अधिक उचित ठरले असते. काँग्रेसच्या प्रवक्त्याने या निवडपद्धतीवर आक्षेप घेतला आहे. भाजपचे जे दोन प्रतिनिधी, वेंकय्या आणि राजनाथसिंग हे विरोधी पक्षांशी या निवडणुकीतील सहमतीसाठी चर्चा करीत होते. त्यांनी या नावांबद्दल विरोधकांना विश्वासात मात्र घेतले नाही. नावांची चर्चा न करता नुसतीच सहमतीची चर्चा त्यांनी केली. तशी चर्चा कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचत नाही हे उघड आहे. ‘आम्ही तुमच्याशी चर्चा करू पण उमेदवार मात्र आमचाच देऊ’ हा प्रकार विरोधकांना अंधारात ठेवण्याचा व झुलवत राखण्याचा आहे. अर्थात कोविंद यांचे नाव विरोधकांएवढेच भाजपने आपल्या पक्षालाही फारसे कळू दिले नाही हे येथे लक्षात घ्यायचे आहे. नाव बाहेर आले की त्याला फाटे फुटतात आणि त्याच्या बऱ्यावाईटाची नको तशी चर्चा देशात व माध्यमांत सुरू होते. तसे करण्याऐवजी साध्या राजकीय धक्कातंत्राचा उपयोग करणे व ऐनवेळी हुकूमाचे पान पुढे करणे हे राज्यकर्त्यांच्या सोईचेही असते. त्यातून भाजपमध्ये सारे काही ‘आले मोदींजींच्या मना’ असे असल्याने मोदी म्हणतील ते किंवा तो असा त्या पक्षाचा सध्याचा एककलमी व एकइसमी कार्यक्रम आहे. तोच याही ठिकाणी चालला आहे. नाव जाहीर करण्यापूर्वी मोदींनी सोनिया गांधी व डॉ. मनमोहनसिंग यांच्याशी संपर्क साधून त्यांना ते सांगितल्याचे शाह यांनी पत्रपरिषदेत जाहीर केले. त्यावर आपण आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासनही त्या दोघांनी दिले. हा प्रकार दोन्ही बाजूंच्या राजकीय सभ्यतेचा असला तरी तो ‘आम्ही नाव सुचवतो, तुम्ही ते मान्य करायचे की नाही हे पाहा’ असे सांगण्यासारखा एकतर्फी आहे हे कोणाच्याही लक्षात यावे. याआधी प्रणव मुखर्जी किंवा प्रतिभाताई पाटील यांच्या नावांची चर्चा तेव्हाच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेत्यांत झाली होती. तशीही ती रालोआच्या घटक पक्षात यावेळी झाल्याचे दिसले नाही. आपल्याजवळ बहुमत असल्याची खात्री पटल्याखेरीज कोणताही सत्तारूढ पक्ष असे करणार नाही. तो सहमती मिळविण्याचे नाटकच तेवढे करील आणि शेवटी आपला उमेदवार साऱ्यांना मान्य करावा लागेल अशी परिस्थितीही निर्माण करील. मोदी व भाजप यांनी नेमके तेच केले आहे. असो, रामनाथजी कोविंद हे दीर्घकाळ राज्यसभेत राहिलेले अनुभवी खासदार आहेत. बिहारच्या राज्यपालपदाचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे. ते दलित समाजातून आले आहेत ही गोष्ट वारंवार सांगितली गेली. पण तिचे अप्रूप आता फारसे उरले नाही. याआधी डॉ. के. आर. नारायणन् या दलित बुद्धिमंताची राष्ट्रपतिपदावर निवड झाली आहे आणि त्यांनी धर्मनिरपेक्ष व जातीनिरपेक्ष वृत्तीने त्या पदाची जबाबदारी पार पाडली हेही साऱ्यांच्या लक्षात आहे. कोविंद हे संघाच्या दलित विभागाचे प्रमुख असणे ही बाब त्यांची निवड करताना भाजपने महत्त्वाची मानली असणार हे उघड आहे. रा.स्व. संघाच्या वतीने का होईना देशातील दलितांची दु:खे व त्यांची सद्यस्थिती यांची कल्पना असणारा नेता राष्ट्रपती होणे ही बाब महत्त्वाची आहे. ज्या वर्गांना समाजाने अजून न्याय दिला नाही त्याला तो दिला जाणे महत्त्वाचे व तातडीचेही आहे. कोविंद यांच्यामुळे देशातील दलित मतांचे गठ्ठे आपल्याकडे वळतील हे सेनेचे व इतर काहींचे म्हणणे निराधार आहे. आपल्यातील जातीयतेने दलितांनाही ग्रासले आहे. प्रदेशवार, विभागवार आणि भाषावारच नव्हे तर उच्च व कनिष्ठ असे जातींचे उतरंडवजा प्रकार दलितांमध्येही आहेत. त्यामुळेच जगजीवनराम साऱ्या दलितांचे नेते झाले नाहीत आणि मायावतींना किंवा पासवानांनाही ते जमणारे नाही. महापुरुषांची जात पाहण्याची दुष्ट दृष्टी ज्या समाजात आहे त्याला कोविंद आपल्यासोबत नेऊ शकतील हा आशावाद खरा नाही. आपल्या राष्ट्रपतींचे पद नाममात्र आहे. तरीही त्या पदाला तीन महत्त्वाचे अधिकार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा सल्ला घेणे, तो नाकारणे, प्रसंगी संसदेने मंजूर केलेली विधेयके फेटाळणे आणि देशात अनागोंदी माजल्यास त्यात आणीबाणी जाहीर करणे. आपल्या विवेकाचा वापर करणारी व्यक्ती या अधिकारांच्या बळावर सरकारला मार्गदर्शन करू शकते. आजवरच्या राष्ट्रपतींनी ते केले आहे. कोविंद यांच्याकडूनही देशाला हीच अपेक्षा राहणार आहे.