शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

रामदेवबाबाचा अ(न)र्थ योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 02:03 IST

देश संकटात आणि समाज गोंधळात असला की त्यात अनेकांच्या बुद्धींना शिंगे फुटतात आणि ती माणसे समाजाला त्यांनाही न समजलेल्या विषयावर मार्गदर्शन करायला निघतात.

देश संकटात आणि समाज गोंधळात असला की त्यात अनेकांच्या बुद्धींना शिंगे फुटतात आणि ती माणसे समाजाला त्यांनाही न समजलेल्या विषयावर मार्गदर्शन करायला निघतात. सध्या चीनच्या आक्रमक पवित्र्यामुळे भारताच्या सरकारएवढेच येथील जनमतही विचलित झाले आहे. त्याची ती अस्थिरता आपल्या योगसामर्थ्याच्या बळावर आपण घालवू शकतो असा स्वत:विषयीचा समज रामदेवबाबा या धंदेवाईक योगपुरुषाने आता करून घेतला आहे. या बाबाला त्याच्या भक्तांची फार मोठी रांग लाभली आहे. ही रांग त्याच्या योगलीलांएवढीच त्याने बाजारात आणलेल्या औषधांना आणि सौंदर्यप्रसाधनांनाही बरकत आणणारी आहे. त्या बळावर हा योगपुरुष पाहता पाहता देशातला एक अग्रगण्य व्यावसायिक बनला आहे. सरकार पक्षाचे व सरकारचेही पाठबळ असल्यामुळे त्याला राजकारणही कळू लागले आहे आणि आता तो थेट आंतरराष्ट्रीय राजकारणावरही भाष्ये करू लागला आहे. एखाद्या योग्याने राजकारण बोलू नये असे आजचे दिवस नाहीत. आताचा काळ योग्यांनी मुख्यमंत्री होण्याचा आहे. तर हे रामदेवबाबा चीनचा बंदोबस्त करण्याचा सोपा उपाय सरकार व देश यांना सांगायला आता पुढे आले आहेत. त्यांच्या मते भारतात चीनमधून फार मोठ्या प्रमाणावर मालाची आयात होते. तेथून येणारा माल स्वस्त आणि सहजगत्या उपलब्ध असल्यामुळे बाजारात तो फार खपतही असतो. प्रत्यक्षात चिनी मालाच्या किंमतीहून रामदेवबाबाची उत्पादने जास्तीची महागडी आहेत. गणपतीच्या मूर्तींपासून पतंगांपर्यंत आणि सौंदर्यप्रसाधनांपासून अत्याधुनिक मोबाईलसारख्या चिनी वस्तू भारतात मिळू लागल्या आहेत. रामदेवबाबाचे म्हणणे असे की भारतीयांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला आणि त्यांची खरेदी थांबविली तर सारा चीनचा अर्थव्यवहार जमिनीवर येईल आणि तो देशही नाक मुठीत धरून भारताला शरण येईल. चीनची सारी अर्थव्यवस्था केवळ भारतातील त्याच्या उत्पादनांच्या खरेदीवर उभी आहे असा एक यौगिक गैरसमज या बाबाने करून घेतला आहे. वास्तविक चीनचा निर्यात व्यापार जून २०१७ मध्ये १७६ अब्ज डॉलर एवढा मोठा झाल्याची नोंद जगाच्या अर्थव्यवस्थेने घेतली आहे. चीनचा सर्वात मोठा आयातदार देश अमेरिका हा आहे. युरोप, आफ्रिका, मध्य आशिया आणि रशिया हेही त्याचे फार मोठे ग्राहक आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि भारताभोवतीचे सारे देश चिनी माल स्वदेशी मालाहून स्वस्त म्हणून त्यावर प्रसन्न आहेत. चीनची भारताला होणारी निर्यात २० कोटी डॉलरहून कमी आहे. या जून महिन्यात तर आणखीनच कमी झाल्याचेही नोंदविले गेले आहे. १७६ अब्ज डॉलर किंमतीच्या मालाची निर्यात करणाºया चीनला त्याच्या दृष्टीने क्षुल्लक असलेली रक्कम अडवून आपण जेरीला आणू शकतो हे फक्त एखाद्या यौगिक शक्ती प्राप्त असणाºयाला किंवा तसे ढोंग करणाºयालाच सुचू शकते. गोमेचा एक पाय तुटला तर तिचे फारसे बिघडत नाही अशा अर्थाची एक म्हण मराठीत आहे. ती या रामदेवबाबाला बहुदा ठाऊक नसावी. भारताला होणारी चीनची निर्यात ही गोमेच्या एका पायाएवढीही नाही. ती तशी असती आणि ही निर्यात थांबवून चीनला नमविता आले असते तर तसा उपदेश देशाला नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली यांनी कधीच केला असता. माजी राष्ट्रपती प्रणव मुकर्जी हेही दीर्घकाळ भारताचे अर्थमंत्री होते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे दीर्घकाळ रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष, अर्थमंत्री व देशाचे प्रधानमंत्री राहिलेले नेते आहेत. त्यांनाही थोडेफार अर्थकारण कळतच असावे. मात्र त्यांच्यातल्या कोणीही चीनचा असा एक पाय तोडावा असा उपदेश देशाला केला नाही. या माणसांजवळ रामदेवबाबाची यौगिक शक्ती बहुदा नसावी. समाज एकदा आपल्या भजनी लागला की आपण त्याला काहीही सांगू शकतो आणि तो आपले म्हणणे एका बावळट भक्तिभावाने स्वीकारत असतो असे अनेक बुवा आणि बाबांना वाटते. त्यांच्या काही भगतांनी त्यांचा तो विश्वास दुर्दैवाने खराही ठरवला असतो. मात्र त्यांचा हा विश्वास आणि देशापुढचे मोठे संकट या दोन गोष्टी एकत्र आणल्या की त्यातली अशा बुवाबाबांकडून देशाची व आपली होणारी फसवणूक लक्षात येते. चीनकडून होणारी आयात संपल्याने फारतर रामदेवबाबाच्या धंद्याला आलेली बरकत थोडीशी वाढू शकते. पण तेवढ्यामुळे चीनचे अर्थकारण रसातळाला जाईल किंवा तो देश सहा कोटी डॉलर्ससाठी नाक मुठीत धरून भारतासमोर शरणागती पत्करील असे सांगणे हा खोट्या जाहिराती प्रकाशित करून आपला माल खपविण्याच्या बेकायदेशीर धंद्यात जमा होणारा भाग आहे. या बाबाने हा उपदेश समाजाला न करता सरकारला केला असता तर सरकारने त्याला निश्चितच वेड्यात काढले असते. सरकारची ही प्रतिक्रिया या योग्याला आगाऊ समजावी एवढे धंद्याचे ज्ञान त्याला निश्चितच आहे. त्यामुळे हा उपदेश सरकारला न करता जनतेला केला आहे. या बाबाला योगशास्त्राएवढेच अर्थशास्त्रही समजते असे कौतुकाने म्हणणारे बावळे भगत आपल्याला भेटतीलही. मात्र हा सारा एका योगी म्हणविणाºया माणसाने आपल्याला नसलेल्या ज्ञानाच्या बळावर आपल्या भक्तांना व समाजाला बनविण्याचा चालविलेला खेळ आहे हे किमान जाणकारांना समजले पाहिजे.