शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

रामाची हनुमानउडी!

By admin | Updated: December 29, 2015 02:42 IST

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारी अफगाणिस्तानचा दौरा आटोपून परतीच्या वाटेवर असताना लाहोरमध्ये थांबून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे वाढदिवसानिमित्त

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारी अफगाणिस्तानचा दौरा आटोपून परतीच्या वाटेवर असताना लाहोरमध्ये थांबून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे वाढदिवसानिमित्त जे अभिष्टचिंतन केले व त्यांच्या नातीच्या लग्नानिमित्त तिला जे आशीर्वाद दिले, त्या घटनेकडे आंतरराष्ट्रीय संबंधातील एक वेगळा आणि स्वागतार्ह पुढाकार इतक्या मर्यादित अर्थानेच खरे तर पाहायला हवे. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध सदैव ताणलेलेच असतात व त्याची कल्पना उभय देशातील लोकाना आणि शासकांनाही असते आणि आहे. त्यामुळे अशा एका सौहार्दपूर्ण भेटीने सारे मतभेद संपुष्टात येतील असे मानणे आणि त्याचबरोबर या भेटीचे वेगवेगळे अर्थ शोधत बसणे खूपच भाबडेपणाचे ठरेल. पण तरीही एकवेळ हे भाबडेपण परवडले अशी एक भलीथोरली हनुमानउडी भाजपाचे एक सरचिटणीस राम माधव यांनी मारली आहे. काही काळ हे राम रा.स्व.संघाचे अधिकृत प्रवक्ते होते आणि त्यानंतर संघाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना भाजपात सरचिटणीस बनविले गेले. मोदी-शरीफ भेटीचा त्यांना गवसलेला अर्थ फारच अफलातून आहे. पंतप्रधान अफगाणिस्तानचा यशस्वी दौरा पूर्ण करुन आणि पाकिस्तानात सौहार्दाचे दर्शन घडवून देऊन माघारी परतले या एकाच घटनेत माधव यांच्या किंवा संघाच्या स्वप्नातील अखंड भारताच्या निर्मितीने उचल खाल्ली आहे. १९४७पूर्वीचा म्हणजे भारत-पाक-बांगला देश यांचा अखंड भारत त्यांना दिसू लागला आहे. वास्तविक पाहाता भारताची फाळणी हा आता इतिहास बनला आहे आणि घड्याळाचे काटे कोणालाही उलटे फिरविता येत नाहीत, हे वास्तव आहे. खुद्द भारतातील अनेक इतिहासकारांनी आणि विश्लेषकांनीही फाळणी अपरिहार्य ठरवितानाच तिचे स्वागतदेखील केले आहे. तरीही अखंड भारताचे स्वप्न ज्यांना पाहायचेच असेल त्यांना अडवता येणार नाही. पण राम माधव आज सत्ताधारी पक्षाचे सरचिटणीस असल्याने त्यांच्या वक्तव्याची दखल घेणे क्रमप्राप्त ठरत असल्याने जशी ती काँग्रेसने घेतली तशीच खुद्द भाजपानेही घेतली असून भाजपातर्फे बोलताना एम.जे.अकबर यांनी राम माधव यांच्या भूमिकेशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचा निर्वाळा देऊन टाकला आहे. भाजपाचेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्याही लाहोर भेटीच्या वेळीच दोन्ही देश सार्वभौम असल्याची ग्वाही दिली होती व त्या मताशी आजही भाजपा ठाम असल्याचे अकबर यांनी म्हटले आहे. भाजपात नसलेले पण रालोआत असल्याने केन्द्रीय मंत्री असलेले रामविलास पासवान यांनीही मोदींच्या पाक भेटीचा त्यांना गवसलेला अर्थ मांडताना आता या चार देशांचे महागठबंधन निर्माण करावे असे म्हटले आहे. तसे करण्याने परस्परांमधील सहकार्य आणि सौहार्द वृद्धीस लागेल असे त्यांना वाटत असेल तर मग ‘सार्क’ काय आहे? इकडे भारतात असा अनैसर्गिक उत्साह दाखविला जात असताना पाकच्या प्रधानमंत्र्यांचे सल्लागार सरताज अझीझ यांनी मात्र नकारात्मक सूर लावूून पुढील महिन्यात उभय राष्ट्रांदरम्यान होऊ घेतलेल्या सचिव पातळीवरील चर्चेतून फार काही निष्पन्न होणार नाही असेच भाकीत वर्तविले आहे.