शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

रामाची हनुमानउडी!

By admin | Updated: December 29, 2015 02:42 IST

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारी अफगाणिस्तानचा दौरा आटोपून परतीच्या वाटेवर असताना लाहोरमध्ये थांबून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे वाढदिवसानिमित्त

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारी अफगाणिस्तानचा दौरा आटोपून परतीच्या वाटेवर असताना लाहोरमध्ये थांबून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे वाढदिवसानिमित्त जे अभिष्टचिंतन केले व त्यांच्या नातीच्या लग्नानिमित्त तिला जे आशीर्वाद दिले, त्या घटनेकडे आंतरराष्ट्रीय संबंधातील एक वेगळा आणि स्वागतार्ह पुढाकार इतक्या मर्यादित अर्थानेच खरे तर पाहायला हवे. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध सदैव ताणलेलेच असतात व त्याची कल्पना उभय देशातील लोकाना आणि शासकांनाही असते आणि आहे. त्यामुळे अशा एका सौहार्दपूर्ण भेटीने सारे मतभेद संपुष्टात येतील असे मानणे आणि त्याचबरोबर या भेटीचे वेगवेगळे अर्थ शोधत बसणे खूपच भाबडेपणाचे ठरेल. पण तरीही एकवेळ हे भाबडेपण परवडले अशी एक भलीथोरली हनुमानउडी भाजपाचे एक सरचिटणीस राम माधव यांनी मारली आहे. काही काळ हे राम रा.स्व.संघाचे अधिकृत प्रवक्ते होते आणि त्यानंतर संघाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना भाजपात सरचिटणीस बनविले गेले. मोदी-शरीफ भेटीचा त्यांना गवसलेला अर्थ फारच अफलातून आहे. पंतप्रधान अफगाणिस्तानचा यशस्वी दौरा पूर्ण करुन आणि पाकिस्तानात सौहार्दाचे दर्शन घडवून देऊन माघारी परतले या एकाच घटनेत माधव यांच्या किंवा संघाच्या स्वप्नातील अखंड भारताच्या निर्मितीने उचल खाल्ली आहे. १९४७पूर्वीचा म्हणजे भारत-पाक-बांगला देश यांचा अखंड भारत त्यांना दिसू लागला आहे. वास्तविक पाहाता भारताची फाळणी हा आता इतिहास बनला आहे आणि घड्याळाचे काटे कोणालाही उलटे फिरविता येत नाहीत, हे वास्तव आहे. खुद्द भारतातील अनेक इतिहासकारांनी आणि विश्लेषकांनीही फाळणी अपरिहार्य ठरवितानाच तिचे स्वागतदेखील केले आहे. तरीही अखंड भारताचे स्वप्न ज्यांना पाहायचेच असेल त्यांना अडवता येणार नाही. पण राम माधव आज सत्ताधारी पक्षाचे सरचिटणीस असल्याने त्यांच्या वक्तव्याची दखल घेणे क्रमप्राप्त ठरत असल्याने जशी ती काँग्रेसने घेतली तशीच खुद्द भाजपानेही घेतली असून भाजपातर्फे बोलताना एम.जे.अकबर यांनी राम माधव यांच्या भूमिकेशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचा निर्वाळा देऊन टाकला आहे. भाजपाचेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्याही लाहोर भेटीच्या वेळीच दोन्ही देश सार्वभौम असल्याची ग्वाही दिली होती व त्या मताशी आजही भाजपा ठाम असल्याचे अकबर यांनी म्हटले आहे. भाजपात नसलेले पण रालोआत असल्याने केन्द्रीय मंत्री असलेले रामविलास पासवान यांनीही मोदींच्या पाक भेटीचा त्यांना गवसलेला अर्थ मांडताना आता या चार देशांचे महागठबंधन निर्माण करावे असे म्हटले आहे. तसे करण्याने परस्परांमधील सहकार्य आणि सौहार्द वृद्धीस लागेल असे त्यांना वाटत असेल तर मग ‘सार्क’ काय आहे? इकडे भारतात असा अनैसर्गिक उत्साह दाखविला जात असताना पाकच्या प्रधानमंत्र्यांचे सल्लागार सरताज अझीझ यांनी मात्र नकारात्मक सूर लावूून पुढील महिन्यात उभय राष्ट्रांदरम्यान होऊ घेतलेल्या सचिव पातळीवरील चर्चेतून फार काही निष्पन्न होणार नाही असेच भाकीत वर्तविले आहे.