शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रामाची हनुमानउडी!

By admin | Updated: December 29, 2015 02:42 IST

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारी अफगाणिस्तानचा दौरा आटोपून परतीच्या वाटेवर असताना लाहोरमध्ये थांबून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे वाढदिवसानिमित्त

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारी अफगाणिस्तानचा दौरा आटोपून परतीच्या वाटेवर असताना लाहोरमध्ये थांबून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे वाढदिवसानिमित्त जे अभिष्टचिंतन केले व त्यांच्या नातीच्या लग्नानिमित्त तिला जे आशीर्वाद दिले, त्या घटनेकडे आंतरराष्ट्रीय संबंधातील एक वेगळा आणि स्वागतार्ह पुढाकार इतक्या मर्यादित अर्थानेच खरे तर पाहायला हवे. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध सदैव ताणलेलेच असतात व त्याची कल्पना उभय देशातील लोकाना आणि शासकांनाही असते आणि आहे. त्यामुळे अशा एका सौहार्दपूर्ण भेटीने सारे मतभेद संपुष्टात येतील असे मानणे आणि त्याचबरोबर या भेटीचे वेगवेगळे अर्थ शोधत बसणे खूपच भाबडेपणाचे ठरेल. पण तरीही एकवेळ हे भाबडेपण परवडले अशी एक भलीथोरली हनुमानउडी भाजपाचे एक सरचिटणीस राम माधव यांनी मारली आहे. काही काळ हे राम रा.स्व.संघाचे अधिकृत प्रवक्ते होते आणि त्यानंतर संघाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना भाजपात सरचिटणीस बनविले गेले. मोदी-शरीफ भेटीचा त्यांना गवसलेला अर्थ फारच अफलातून आहे. पंतप्रधान अफगाणिस्तानचा यशस्वी दौरा पूर्ण करुन आणि पाकिस्तानात सौहार्दाचे दर्शन घडवून देऊन माघारी परतले या एकाच घटनेत माधव यांच्या किंवा संघाच्या स्वप्नातील अखंड भारताच्या निर्मितीने उचल खाल्ली आहे. १९४७पूर्वीचा म्हणजे भारत-पाक-बांगला देश यांचा अखंड भारत त्यांना दिसू लागला आहे. वास्तविक पाहाता भारताची फाळणी हा आता इतिहास बनला आहे आणि घड्याळाचे काटे कोणालाही उलटे फिरविता येत नाहीत, हे वास्तव आहे. खुद्द भारतातील अनेक इतिहासकारांनी आणि विश्लेषकांनीही फाळणी अपरिहार्य ठरवितानाच तिचे स्वागतदेखील केले आहे. तरीही अखंड भारताचे स्वप्न ज्यांना पाहायचेच असेल त्यांना अडवता येणार नाही. पण राम माधव आज सत्ताधारी पक्षाचे सरचिटणीस असल्याने त्यांच्या वक्तव्याची दखल घेणे क्रमप्राप्त ठरत असल्याने जशी ती काँग्रेसने घेतली तशीच खुद्द भाजपानेही घेतली असून भाजपातर्फे बोलताना एम.जे.अकबर यांनी राम माधव यांच्या भूमिकेशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचा निर्वाळा देऊन टाकला आहे. भाजपाचेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्याही लाहोर भेटीच्या वेळीच दोन्ही देश सार्वभौम असल्याची ग्वाही दिली होती व त्या मताशी आजही भाजपा ठाम असल्याचे अकबर यांनी म्हटले आहे. भाजपात नसलेले पण रालोआत असल्याने केन्द्रीय मंत्री असलेले रामविलास पासवान यांनीही मोदींच्या पाक भेटीचा त्यांना गवसलेला अर्थ मांडताना आता या चार देशांचे महागठबंधन निर्माण करावे असे म्हटले आहे. तसे करण्याने परस्परांमधील सहकार्य आणि सौहार्द वृद्धीस लागेल असे त्यांना वाटत असेल तर मग ‘सार्क’ काय आहे? इकडे भारतात असा अनैसर्गिक उत्साह दाखविला जात असताना पाकच्या प्रधानमंत्र्यांचे सल्लागार सरताज अझीझ यांनी मात्र नकारात्मक सूर लावूून पुढील महिन्यात उभय राष्ट्रांदरम्यान होऊ घेतलेल्या सचिव पातळीवरील चर्चेतून फार काही निष्पन्न होणार नाही असेच भाकीत वर्तविले आहे.