शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
5
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
6
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
7
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
8
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
9
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
10
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
11
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
12
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
13
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
14
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
15
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
16
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
17
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
18
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
19
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
20
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे

रामाची हनुमानउडी!

By admin | Updated: December 29, 2015 02:42 IST

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारी अफगाणिस्तानचा दौरा आटोपून परतीच्या वाटेवर असताना लाहोरमध्ये थांबून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे वाढदिवसानिमित्त

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारी अफगाणिस्तानचा दौरा आटोपून परतीच्या वाटेवर असताना लाहोरमध्ये थांबून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे वाढदिवसानिमित्त जे अभिष्टचिंतन केले व त्यांच्या नातीच्या लग्नानिमित्त तिला जे आशीर्वाद दिले, त्या घटनेकडे आंतरराष्ट्रीय संबंधातील एक वेगळा आणि स्वागतार्ह पुढाकार इतक्या मर्यादित अर्थानेच खरे तर पाहायला हवे. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध सदैव ताणलेलेच असतात व त्याची कल्पना उभय देशातील लोकाना आणि शासकांनाही असते आणि आहे. त्यामुळे अशा एका सौहार्दपूर्ण भेटीने सारे मतभेद संपुष्टात येतील असे मानणे आणि त्याचबरोबर या भेटीचे वेगवेगळे अर्थ शोधत बसणे खूपच भाबडेपणाचे ठरेल. पण तरीही एकवेळ हे भाबडेपण परवडले अशी एक भलीथोरली हनुमानउडी भाजपाचे एक सरचिटणीस राम माधव यांनी मारली आहे. काही काळ हे राम रा.स्व.संघाचे अधिकृत प्रवक्ते होते आणि त्यानंतर संघाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना भाजपात सरचिटणीस बनविले गेले. मोदी-शरीफ भेटीचा त्यांना गवसलेला अर्थ फारच अफलातून आहे. पंतप्रधान अफगाणिस्तानचा यशस्वी दौरा पूर्ण करुन आणि पाकिस्तानात सौहार्दाचे दर्शन घडवून देऊन माघारी परतले या एकाच घटनेत माधव यांच्या किंवा संघाच्या स्वप्नातील अखंड भारताच्या निर्मितीने उचल खाल्ली आहे. १९४७पूर्वीचा म्हणजे भारत-पाक-बांगला देश यांचा अखंड भारत त्यांना दिसू लागला आहे. वास्तविक पाहाता भारताची फाळणी हा आता इतिहास बनला आहे आणि घड्याळाचे काटे कोणालाही उलटे फिरविता येत नाहीत, हे वास्तव आहे. खुद्द भारतातील अनेक इतिहासकारांनी आणि विश्लेषकांनीही फाळणी अपरिहार्य ठरवितानाच तिचे स्वागतदेखील केले आहे. तरीही अखंड भारताचे स्वप्न ज्यांना पाहायचेच असेल त्यांना अडवता येणार नाही. पण राम माधव आज सत्ताधारी पक्षाचे सरचिटणीस असल्याने त्यांच्या वक्तव्याची दखल घेणे क्रमप्राप्त ठरत असल्याने जशी ती काँग्रेसने घेतली तशीच खुद्द भाजपानेही घेतली असून भाजपातर्फे बोलताना एम.जे.अकबर यांनी राम माधव यांच्या भूमिकेशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचा निर्वाळा देऊन टाकला आहे. भाजपाचेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्याही लाहोर भेटीच्या वेळीच दोन्ही देश सार्वभौम असल्याची ग्वाही दिली होती व त्या मताशी आजही भाजपा ठाम असल्याचे अकबर यांनी म्हटले आहे. भाजपात नसलेले पण रालोआत असल्याने केन्द्रीय मंत्री असलेले रामविलास पासवान यांनीही मोदींच्या पाक भेटीचा त्यांना गवसलेला अर्थ मांडताना आता या चार देशांचे महागठबंधन निर्माण करावे असे म्हटले आहे. तसे करण्याने परस्परांमधील सहकार्य आणि सौहार्द वृद्धीस लागेल असे त्यांना वाटत असेल तर मग ‘सार्क’ काय आहे? इकडे भारतात असा अनैसर्गिक उत्साह दाखविला जात असताना पाकच्या प्रधानमंत्र्यांचे सल्लागार सरताज अझीझ यांनी मात्र नकारात्मक सूर लावूून पुढील महिन्यात उभय राष्ट्रांदरम्यान होऊ घेतलेल्या सचिव पातळीवरील चर्चेतून फार काही निष्पन्न होणार नाही असेच भाकीत वर्तविले आहे.