शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

घोषणांबरोबरच जमिनीवर काय चाललंय ते ही बघा - राजेंद्र दर्डांचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना अनावृत्त पत्र

By राजेंद्र दर्डा | Updated: August 5, 2017 16:38 IST

प्रभुजी कृपा करा आणि एकदा नागपूर - मुंबई व्हाया औरंगाबाद असा नंदीग्राम_एक्सप्रेसने प्रवास करा. ही विनंती यासाठी की आजच आपली एक घोषणा वाचली.

प्रभुजी कृपा करा आणि एकदा नागपूर - मुंबई व्हाया औरंगाबाद असा नंदीग्राम_एक्सप्रेसने प्रवास करा. ही विनंती यासाठी की आजच आपली एक घोषणा वाचली. ‘आता मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाचा पुढील महिन्यात शुभारंभ’- रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची घोषणा. ४०० कि.मी. ताशी वेगाने ही बुलेट ट्रेन धावणार आहे म्हणे. परवाच २१ जुलैला मराठवाडा एक्स्प्रेसने औरंगाबाद ते नांदेड प्रवास केला. २५० कि.मी. अंतर जाण्यासाठी पाच तास लागले. एक तास उशिरा पोहोचलो. २२ जुलै रोजी नंदीग्रामने परतीचा प्रवास केला. राज्याची राजधानी आणि उपराजधानी जोडणाऱ्या या रेल्वेने औरंगाबादला परत एकदा तासभर उशीराच पोहोचलो. मी वातानुकलीत प्रथम श्रेणीच्या डब्यात होतो. नंदीग्राममधील सहप्रवासी मुंबईचे एक व्यावसायिक बलदेवसिंग पत्नीसह गुरुतागद्दी समोर मथ्था टेकून परत निघाले होते. ते दर महिन्याला दर्शनासाठी नांदेडला येतात. त्यांचा अनुभवही क्लेशदायी होता. स्वच्छतागृहात पाणी नाही. ते इतके अस्वच्छ की तिथे पाय ठेवणे अशक्य. ही जर प्रथम श्रेणीची अवस्था असेल तर जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यांचे हाल काय असतील? विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्वच्छ भारताचा नारा दिला आहे. त्यासाठी आपण स्वच्छता सेस ही देतो. रेल्वे डब्यातील अस्वच्छता आणि कासवगतीने चालणाऱ्या नंदीग्राम आणि मराठवाडा एक्सप्रेस, हे रेल्वे मंत्रालयासमोरील मोठे आव्हान आहे. तेव्हा प्रभुजी माफ करा. घोषणेच्या बरोबर जमिनीवरचेही निरीक्षण करा. आपण अभ्यासू म्हणूनच आग्रहाची विनंती. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला शुभेच्छा.(राजेंद्र दर्डा हे लोकमतचे एडिटर-इन-चीफ आहेत.)

बुलेट ट्रेनची पायाभरणी सप्टेंबरमध्ये - सुरेश प्रभू

नवी दिल्ली : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाचा पायाभरणी समारंभ पुढील महिन्यात होणार असून, त्या समारंभाला जपानचे पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी लोकसभेत ही माहिती दिली.या मार्गाला १ लाख १0 हजार कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. ही बुलेट ट्रेन २0२३ पर्यंत सुरू होईल, असेही ते म्हणाले. या रेल्वे प्रकल्पासाठी अतिशय कमी व्याजाचे कर्ज जपानने देऊ केले आहे.४००० कर्मचाऱ्यांना जपानतर्फेच विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुंबई-दिल्ली, चेन्नई-मुंबई, कोलकाता मुंबई, दिल्ली-चेन्नई व दिल्ली-कोलकाता या मार्गावर ताशी ३५0 किलोमीटर वेगाने धावणारी गाडी सुरू करण्यासाठी अभ्यास सुरू झाला आहे, असेही प्रभू म्हणाले.दिल्ली, कानपूर, चंदीगड, नागपूर-सिकंदराबाद, मुंबई-गोवा आणि नागपूर-बिलासपूर या मार्गांवर ताशी १६0 ते २५0 किमी वेगाने धावणा-या गाड्या सुरू करणार. बुलेट ट्रेनबाबत मागील सरकारने जपानशी बोलणी सुरू केली. त्याला आमचे सरकार आल्यावर वेग आला, असे ते म्हणाले.