शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

पक्षाला जडलेल्या ‘अंकल लागण’मुळे राहुल चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 02:45 IST

पक्षाच्या ध्येय-धोरणांशी विसंगत विधाने करणाऱ्या आणि जे काही कमावले आहे ते नष्ट करण्यासाठी मोदी-शहांच्या हाती आयते कोलित देणाºया पक्षातील ‘अंकल्स’मुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कमालीचे नाराज आहेत.

- हरीश गुप्ता(लोकमत समूहाचे नॅशनल एडिटर)पक्षाच्या ध्येय-धोरणांशी विसंगत विधाने करणाऱ्या आणि जे काही कमावले आहे ते नष्ट करण्यासाठी मोदी-शहांच्या हाती आयते कोलित देणाºया पक्षातील ‘अंकल्स’मुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कमालीचे नाराज आहेत. अ. भा. काँग्रेस अधिवेशनात मोदींविरुद्ध ‘चायवाला’ वक्तव्य करून २०१४च्या लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या प्रचारमोहिमेची वाट लावणारे ‘अंकल’ मणिशंकर अय्यर यांच्यापासून सुटका करताना राहुल गांधींना प्रचंड कष्ट पडले होते. पक्षातील ज्येष्ठांना नेहमीच जनहिताच्या मुद्यांवर बोलताना काळजी घेण्याची आणि अधिकृत पक्ष प्रवक्त्यांनी दिलेल्या पक्षाच्या ध्येयधोरणांवर कायम राहण्याची विनंती ते करीत आले आहेत.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सैफुद्दिन सोझ यांनी जम्मू-काश्मीरबाबत अवेळी केलेल्या विधानांमुळे राहुल गांधी संतप्त झाले होते. भाजपा आणि पीडीपी यांच्यात संघर्ष सुरू असताना आणि काँग्रेस आपले धोरण आखण्याच्या तयारीत असतानाच सोझ यांनी वक्तव्य केल्यामुळे राहुल गांधी अधिक संतप्त झाले होते. या ‘सोझ बॉम्ब’ने काँग्रेसचे मोठे नुकसान झाले. परंतु राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सोझ यांच्या काश्मीरवरील वक्तव्याचे समर्थन करून काँग्रेसची जखम अधिक खोल केली. राहुल गांधी यांच्यासाठी त्यांच्या आजी स्व. इंदिरा गांधी यांच्या काळापासूनच गुलाम नबी आझाद हे ‘अंकल’ असल्याकारणाने त्यांना काही सुचेनासे झाले होते. त्यामुळे ‘अंकल’ आपण खरोखरच चुकलात’, असे फोन करून सांगण्याचे धाडसही ते करू शकले नाही. राहुल गांधी यांनी आई सोनिया गांधी यांना मात्र फोन करून आझाद यांच्याशी बोलण्यास सांगितल्याचे समजते. हा मुद्दा उपस्थित करण्याची ही योग्य वेळ नव्हती, अशा शब्दात सोनिया गांधी यांनी आझाद यांना त्यांनी केलेल्या चुकीची जाणीव करून दिल्याचेही कळते. त्यानंतर आझाद यांनी सोझ यांना शांत राहण्याचा आमि मीडियापासून जरा दूरच राहण्याचा सल्ला दिला. या पार्श्वभूमीवर जेव्हा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या निवासस्थानी काश्मीर मुद्यावर बैठक घेण्यात आली तेव्हा राहुल गांधींनी बैठकीचे अध्यक्षस्थान मात्र भूषविले नाही.जयराम रमेश ‘कोडे’राहुल गांधी यांना जयराम रमेश यांचेही कोडे पडलेले आहे. ते अभ्यासू आणि १९७५-७७ मध्ये कार्नेजी मेलॉन विद्यापीठात शिकलेले भारतीय अर्थतज्ज्ञ आहेत. १९९१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे सल्लागार बनल्यापासूनच ते सक्रिय आहेत. त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. २००४ पासून राज्यसभेचे सदस्य असलेले रमेश कॅबिनेट मंत्रीही राहिलेले आहेत. ते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांना २०१९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी १५ गुरुद्वारा रकबगंज मार्ग येथे स्थापित केलेल्या काँग्रेस वॉर रूमचे प्रमुख बनविण्यात आल्याचेही समजते. तसे २००४ पासूनच ते वॉर रूममध्ये सहभागी आहेत. ते अविवाहित आणि वन-मॅन आर्मी सारखेच राहिलेले आहेत. लॅपटॉप २४ तास त्यांच्या खांद्यावर असतो आणि त्याद्वारे ते नेत्यांसाठी भाषणांचा मसुदा तयार करीत असतात. परंतु त्यांनी नुकताच राहुल गांधींच्या विरोधात मार्ग पत्करला आणि स्वत:चे नुकसान करून घेतले. सैफुद्दिन सोझ यांनी काश्मीरवर लिहिलेल्या वादग्रस्त पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहू नका, हा काँग्रेस पक्षाचा अघोषित आदेश त्यांनी धुडकावला. या प्रकाशन सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेले पी. चिदंबरम मात्र या कार्यक्रमापासून दूरच राहिले. एवढेच नव्हे तर आधी उपस्थित राहण्याचा निर्णय घेणारे डॉ. मनमोहनसिंग यांनीही घरीच राहणे पसंत केले. विशेष सुरक्षा गटाने कार्यक्रम स्थळाची रेकीही केली. परंतु रमेश यांनी उपस्थित राहणे आवश्यक समजल्याने राहुल गांधी नाराज झाले. आता राहुल गांधींची नाराजी दूर करण्यासाठी प्रियंका गांधींना भेटण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची माहिती आहे.प्रशांत किशोर पुन्हा नितीशकुमारांच्या तंबूतबिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी निवडणूक विश्लेषक आणि रणनीतीकार प्रशांत किशोर यांना पुन्हा जवळ करीत त्यांच्यावर आगामी निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराचे काम सोपविण्याची तयारी चालविली आहे. नितीशकुमार यांच्याकडे २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेचे नेतृत्व सोपविण्याचा भाजपाचा इरादा दिसत नाही. त्यामुळे येणारा काळ कठीण असल्याची जाणीव एकटे पडलेले नितीशकुमार यांना झाल्याचे दिसते. १२ जुलै रोजी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत जागा वाटपाबाबतची चर्चा होणार आहे. या चर्चेच्या फलनिष्पत्तीबाबत नितीशकुमार साशंक आहेत. राजदला पुन्हा जवळ करण्याच्या प्रयत्नात त्यांनी लालूप्रसाद यादव यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. परंतु लालूंच्या दोन्ही पुत्रांनी नितीशकुमार यांच्या या प्रयत्नांवर कटू शब्दांत टीकास्त्र सोडले. ‘आता नितीशकुमार यांच्यासाठी आमची दारे नेहमीसाठी बंद झाली आहेत,’ असे लालूपुत्रांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी प्रशांत किशोर यांना पुन्हा जवळ करण्याचे ठरविले आहे. २०१५ मध्ये संजद-राजद-काँग्रेस आघाडीला विजय मिळवून देण्यात प्रशांत किशोर यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार हे विजयी झाले होते. परंतु २०१४ च्या ऐतिहासिक विजयानंतर मात्र किशोर मोदी तंबूमधून बाहेर पडले होते.काँग्रेससाठी नितीशकुमार नैसर्गिक मित्रकाँग्रेस बिहारमधील राजकीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि सुरक्षित खेळी खेळत आहे. एकीकडे भाजपा-नितीशकुमार यांच्यात वरचढ होण्याची स्पर्धा चालू असताना आणि लालूपुत्र नितीशकुमारांवर कठोर टीका करीत असताना काँग्रेस मात्र शांत आहे. ‘काँग्रेस आणि राजद हे संयुक्त जनता दलाचे नैसर्गिक मित्र आहेत,’ असे ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी म्हटले आहे. २०१७ मध्ये महाआघाडीतून बाहेर पडण्याचा नितीशकुमार यांचा निर्णय ही ‘घोडचूक’ होती, असेही गहलोत यांनी म्हटले आहे. याविषयी अधिक काही बोलण्यास त्यांनी नकार दिला असला तरी नितीशकुमार यांच्यासोबत पुन्हा आघाडी करण्यासाठी काँग्रेस अनुकूल असल्याचेच संकेत त्यांनी दिले आहेत. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत आणि २०१९ मध्ये २०१५ ची पुनरावृत्ती होऊ शकते, याची काँग्रेसला पुरेपूर जाणीव आहे. संजदसोबत आघाडी करण्याच्या संदर्भात आपण राजदचे मन वळविण्यात यशस्वी होऊ, असा काँग्रेसला विश्वास आहे. गहलोत म्हणाले, ‘नितीशकुमार यांनी महाआघाडीतून बाहेर पडायला नको होते. ती त्यांची घोडचूक होती. २०१३ मध्ये नरेंद्र मोदी यांना भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आल्यावर मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडणारे आणि महाआघाडी स्थापन करणारे नितीशकुमार महाआघाडी कसे काय सोडू शकतात, हे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी