शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

रफी... शाहीदने सांगितलेली बापाची गोष्ट...

By गजानन जानभोर | Updated: January 2, 2018 00:10 IST

मोहम्मद रफी आपल्या वलयांकित व्यक्तिमत्त्वाचे कुठलेही ओझे मुलांवर टाकू पाहत नव्हते. मुलांना आपल्यासारखे नाही तर त्यांच्यासारखे घडू द्या, हे रफींनी फार वर्षांपूर्वी ओळखले. आपल्या संस्कार, संगोपनात ते कुठेच येत नाही. शाहीदला मनापासून जगू देणारा रफी मग बाप म्हणूनही ग्रेट ठरतो.

तो मोहम्मद रफींचा मुलगा. मोठ्या माणसांच्या मुलांच्या वाट्याला येणारे वलय आपसूक त्याच्याही भोवती. वडील सर्वोत्तम गायक़ चाहत्यांसाठी साक्षात परमेश्वरच. त्यामुळे त्यांच्याही मुलाने गायकच व्हावे, ही सा-यांचीच अपेक्षा. पण, त्याने या वाटेने येऊ नये असे रफींना वाटायचे. चार भावंडांमध्ये तो सर्वात लहान, शाहीद. तो १९ वर्र्षांचा असताना मोहम्मद रफी गेले. अब्बांच्या पार्थिवाजवळ बसून किशोर कुमारच्या कुशीत तो दिवसभर रडत होता. नंतर सावरला, पण वडिलांसारखेच गाण्याचे दडपण न पेलवणारे... त्याने हे ओझे काही दिवस वाहून बघितले, संगीतकार-निर्मात्यांकडे गेला. पण, निराश झाला. शेवटी त्याने गाणे थांबवले. स्वत:च्या आनंदासाठी आणि अब्बांच्या नामस्मरणासाठी मात्र तो नियमित गायचा, अजूनही गातो...शाहीद परवा नागपुरात भेटला आणि मनातले सारे सच्चेपण त्याने प्रकट केले. मायावी दुनियेतील गळेकापू स्पर्धेत आपली मुले टिकू शकणार नाहीत, ही भीती मोहम्मद रफींना वाटायची. गुणवत्ता असूनही आपल्याला सोसावे लागले ते मुलांच्या नशिबी येऊ नये ही त्यांची कळकळ. रेकॉर्डिंगच्या वेळीही मुलांना ते थांबू देत नव्हते. मुले थोडी मोठी झाली आणि रफींनी त्यांना शिक्षणासाठी लंडनला पाठवले. शाहीदची इच्छा नव्हती. शाळेतील मुले म्हणायची ‘तुझे अब्बा खूप छान गातात, तू का गात नाहीस?’ मग त्यालाही वाटायचे आपणही त्यांच्यासारखेच गावे. काहीशा अनिच्छेनेच तो लंडनला गेला...रफी आपल्या वलयांकित व्यक्तिमत्त्वाचे कुठलेही ओझे मुलांवर टाकू पाहत नव्हते. एरवी असे होत नाही. प्रतिभावंतांची मुले दडपणात वाढतात. आई-वडील, घरातील वातावरण त्यांना स्वतंत्रपणे उमलू देत नाही. मुलांची वाढ आपणच अशी खुंटवून टाकतो. ‘तुला काय व्हायचे आहे?’ असा प्रश्न यापैकी कुणी आपल्या मुलांना कधी विचारला असेल? काही कळायच्या आतच सचिनने अर्जुनच्या हातात बॅट दिली, राजीव कपूरला वडील राज कपूर फरफटतच राम तेरी गंगा मैलीत घेऊन आले. फरदीन खान, बॉबी देवोल हीही अशीच खुरडलेली व्यक्तिमत्त्व. मनाजोगत्या क्षेत्रात ते गेले असते तर यशस्वी ठरले असते. अभिषेक या मायावीनगरीत तग धरू शकणार नाही, ही कल्पना अमिताभ यांना खरंच आली नसेल का? ‘गायिका व्हावे, असे तुला मनापासून वाटते का’? असा प्रश्न हृदयनाथ मंगेशकरांनी मुलगी राधाला कधीच विचारला नसेल. अभिनयातील टुकारपण सिद्ध झाल्यानंतर तुषार कपूरला पडद्यावर मुकेपण स्वीकारावे लागले ही खंत जितेंद्रला वाटत नाही का? असे असंख्य प्रश्न शाहीदशी बोलताना मनात उभे राहतात. रफींनी या आई-बाबांसारखी चूक केली नाही. शाहीदला त्याच्यासारखेच होऊ दिले, स्वत:सारखे नाही. तो यशस्वी उद्योजक होऊ शकला, तो त्यामुळेच. गाणे ही शाहीदची आवड होती. ती आजही आहे. पण, तिला उदरनिर्वाहाचे साधन होऊ दिले नाही.गाण्याबद्दल अब्बांमध्ये असलेले समर्पण आपल्यात नाही, ही जाणीव शाहीदला हरक्षणी व्हायची. ‘‘अब्बांनी मला माझे मीपण दिले’’ असे सांगताना शाहीद गहिवरतो. आपल्या मुलांना आपल्यासारखे नाही तर त्यांच्यासारखे घडू द्या, हे रफींनी फार वर्षांपूर्वी ओळखले. आपल्या संस्कार, संगोपनात मात्र ते कुठेच येत नाही. आपल्या वात्सल्याचाही तो भाग होत नाही. शाहीदला मनापासून जगू देणारा रफी मग बाप म्हणूनही ग्रेट ठरतो. 

टॅग्स :musicसंगीत