शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

रफी... शाहीदने सांगितलेली बापाची गोष्ट...

By गजानन जानभोर | Updated: January 2, 2018 00:10 IST

मोहम्मद रफी आपल्या वलयांकित व्यक्तिमत्त्वाचे कुठलेही ओझे मुलांवर टाकू पाहत नव्हते. मुलांना आपल्यासारखे नाही तर त्यांच्यासारखे घडू द्या, हे रफींनी फार वर्षांपूर्वी ओळखले. आपल्या संस्कार, संगोपनात ते कुठेच येत नाही. शाहीदला मनापासून जगू देणारा रफी मग बाप म्हणूनही ग्रेट ठरतो.

तो मोहम्मद रफींचा मुलगा. मोठ्या माणसांच्या मुलांच्या वाट्याला येणारे वलय आपसूक त्याच्याही भोवती. वडील सर्वोत्तम गायक़ चाहत्यांसाठी साक्षात परमेश्वरच. त्यामुळे त्यांच्याही मुलाने गायकच व्हावे, ही सा-यांचीच अपेक्षा. पण, त्याने या वाटेने येऊ नये असे रफींना वाटायचे. चार भावंडांमध्ये तो सर्वात लहान, शाहीद. तो १९ वर्र्षांचा असताना मोहम्मद रफी गेले. अब्बांच्या पार्थिवाजवळ बसून किशोर कुमारच्या कुशीत तो दिवसभर रडत होता. नंतर सावरला, पण वडिलांसारखेच गाण्याचे दडपण न पेलवणारे... त्याने हे ओझे काही दिवस वाहून बघितले, संगीतकार-निर्मात्यांकडे गेला. पण, निराश झाला. शेवटी त्याने गाणे थांबवले. स्वत:च्या आनंदासाठी आणि अब्बांच्या नामस्मरणासाठी मात्र तो नियमित गायचा, अजूनही गातो...शाहीद परवा नागपुरात भेटला आणि मनातले सारे सच्चेपण त्याने प्रकट केले. मायावी दुनियेतील गळेकापू स्पर्धेत आपली मुले टिकू शकणार नाहीत, ही भीती मोहम्मद रफींना वाटायची. गुणवत्ता असूनही आपल्याला सोसावे लागले ते मुलांच्या नशिबी येऊ नये ही त्यांची कळकळ. रेकॉर्डिंगच्या वेळीही मुलांना ते थांबू देत नव्हते. मुले थोडी मोठी झाली आणि रफींनी त्यांना शिक्षणासाठी लंडनला पाठवले. शाहीदची इच्छा नव्हती. शाळेतील मुले म्हणायची ‘तुझे अब्बा खूप छान गातात, तू का गात नाहीस?’ मग त्यालाही वाटायचे आपणही त्यांच्यासारखेच गावे. काहीशा अनिच्छेनेच तो लंडनला गेला...रफी आपल्या वलयांकित व्यक्तिमत्त्वाचे कुठलेही ओझे मुलांवर टाकू पाहत नव्हते. एरवी असे होत नाही. प्रतिभावंतांची मुले दडपणात वाढतात. आई-वडील, घरातील वातावरण त्यांना स्वतंत्रपणे उमलू देत नाही. मुलांची वाढ आपणच अशी खुंटवून टाकतो. ‘तुला काय व्हायचे आहे?’ असा प्रश्न यापैकी कुणी आपल्या मुलांना कधी विचारला असेल? काही कळायच्या आतच सचिनने अर्जुनच्या हातात बॅट दिली, राजीव कपूरला वडील राज कपूर फरफटतच राम तेरी गंगा मैलीत घेऊन आले. फरदीन खान, बॉबी देवोल हीही अशीच खुरडलेली व्यक्तिमत्त्व. मनाजोगत्या क्षेत्रात ते गेले असते तर यशस्वी ठरले असते. अभिषेक या मायावीनगरीत तग धरू शकणार नाही, ही कल्पना अमिताभ यांना खरंच आली नसेल का? ‘गायिका व्हावे, असे तुला मनापासून वाटते का’? असा प्रश्न हृदयनाथ मंगेशकरांनी मुलगी राधाला कधीच विचारला नसेल. अभिनयातील टुकारपण सिद्ध झाल्यानंतर तुषार कपूरला पडद्यावर मुकेपण स्वीकारावे लागले ही खंत जितेंद्रला वाटत नाही का? असे असंख्य प्रश्न शाहीदशी बोलताना मनात उभे राहतात. रफींनी या आई-बाबांसारखी चूक केली नाही. शाहीदला त्याच्यासारखेच होऊ दिले, स्वत:सारखे नाही. तो यशस्वी उद्योजक होऊ शकला, तो त्यामुळेच. गाणे ही शाहीदची आवड होती. ती आजही आहे. पण, तिला उदरनिर्वाहाचे साधन होऊ दिले नाही.गाण्याबद्दल अब्बांमध्ये असलेले समर्पण आपल्यात नाही, ही जाणीव शाहीदला हरक्षणी व्हायची. ‘‘अब्बांनी मला माझे मीपण दिले’’ असे सांगताना शाहीद गहिवरतो. आपल्या मुलांना आपल्यासारखे नाही तर त्यांच्यासारखे घडू द्या, हे रफींनी फार वर्षांपूर्वी ओळखले. आपल्या संस्कार, संगोपनात मात्र ते कुठेच येत नाही. आपल्या वात्सल्याचाही तो भाग होत नाही. शाहीदला मनापासून जगू देणारा रफी मग बाप म्हणूनही ग्रेट ठरतो. 

टॅग्स :musicसंगीत