शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

विश्वविक्रमाला गवसणी घालताना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 02:30 IST

महाराष्ट्रात गडचिरोलीचे नाव ऐकले नाही अशी व्यक्ती अभावानेच आढळेल. ज्या कारणासाठी गडचिरोलीची ओळख आहे ते कारण मात्र गडचिरोलीकर किंवा तमाम महाराष्ट्रालाही अभिमान वाटावा असे नाही.

महाराष्ट्रात गडचिरोलीचे नाव ऐकले नाही अशी व्यक्ती अभावानेच आढळेल. ज्या कारणासाठी गडचिरोलीची ओळख आहे ते कारण मात्र गडचिरोलीकर किंवा तमाम महाराष्ट्रालाही अभिमान वाटावा असे नाही. गेल्या चार दशकांपासून हा जिल्हा नक्षली हिंसाचाराने होरपळत आहे. शेकडो लोकांना हिंसाचाराला बळीही पडावे लागले. अशा वातावरणात महात्मा गांधींच्या अहिंसेच्या संदेश वाचनातून येथे ३ मार्चला जागतिक विक्रम नोंदविण्याची तयारी सुरू आहे. पण केवळ हा विक्रम केल्याने येथे अहिंसा आणि शांतता प्रस्थापित होणार का? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेच मिळेल. मग मोठा खर्च करून हा विश्वविक्रम करण्याची गरज काय? असाही प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होणे साहजिक आहे. या प्रश्नांची उत्तरे आज दिली नाही तरी चालेल, पण उद्या ती उत्तरे प्रत्यक्ष कृतीतूनच लोकांना मिळतील, याची दक्षता पोलिसांना घ्यावी लागणार आहे. आज नक्षलवाद आणि हिंसा हा गडचिरोलीवासीयांच्या दैनंदिन जीवनाचा जणू एक भाग झाला आहे. कधी पोलिसांचा खबºया असल्याच्या संशयातून नक्षल्यांकडून असलेली जीवाची भीती तर कधी नक्षल समर्थक असल्याच्या संशयातून पोलीस पकडून नेण्याची भीती. गेल्या ३०-४० वर्षांपासून हेच सुरू आहे. अशाप्रकारे ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करण्याच्या प्रकाराला आता लोकही कंटाळले आहेत. बाहेरचे जग पाहू लागलेल्या नवीन पिढीतील युवकांना प्रगती आणि विकास काय असते, हे कळू लागले आहे. त्यामुळेच नवीन पिढीसमोर नक्षलवाद जास्त दिवस तग धरण्याची शक्यता कमीच आहे, मात्र आदिवासींच्या या नवीन पिढीला प्रगतीच्या वाटेने पुढे नेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. सामान्य नागरिकांना हिंसाचार नको आहे, यात दुमत नाही. पण हिंसाचार घडविणा-यांशी उघडपणे दोन हात करण्याची हिंमतही त्यांच्यात नाही. ती हिंमत त्यांना देण्यासोबतच अहिंसेचा पुरस्कार करण्याची त्यांच्या मनातील भावना जाहीरपणे प्रकट करण्याची एक संधी गडचिरोलीत होऊ घातलेल्या जागतिक विक्रमाच्या निमित्ताने लोकांना मिळणार आहे. हा विश्वविक्रम झाला म्हणजे आता जिल्ह्यातील हिंसाचार थांबेल आणि जिल्ह्यात शांतता निर्माण होईल, असे मुळीच नाही. पण तसे होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले जाईल, हे निश्चित. विश्वविक्रम करणारा एक आदिवासीबहुल जिल्हा अशीही गडचिरोलीची ओळख जागतिक स्तरावर जाईल. मात्र त्यानंतर या जिल्ह्यात खरोखरच हिंसाचार थांबून शांतता प्रस्थापित करण्याची पोलिसांची जबाबदारी आणखी वाढणार आहे. तसे न झाल्यास ते पोलिसांचे अपयश ठरेल, यात शंका नाही.