शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विश्वविक्रमाला गवसणी घालताना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 02:30 IST

महाराष्ट्रात गडचिरोलीचे नाव ऐकले नाही अशी व्यक्ती अभावानेच आढळेल. ज्या कारणासाठी गडचिरोलीची ओळख आहे ते कारण मात्र गडचिरोलीकर किंवा तमाम महाराष्ट्रालाही अभिमान वाटावा असे नाही.

महाराष्ट्रात गडचिरोलीचे नाव ऐकले नाही अशी व्यक्ती अभावानेच आढळेल. ज्या कारणासाठी गडचिरोलीची ओळख आहे ते कारण मात्र गडचिरोलीकर किंवा तमाम महाराष्ट्रालाही अभिमान वाटावा असे नाही. गेल्या चार दशकांपासून हा जिल्हा नक्षली हिंसाचाराने होरपळत आहे. शेकडो लोकांना हिंसाचाराला बळीही पडावे लागले. अशा वातावरणात महात्मा गांधींच्या अहिंसेच्या संदेश वाचनातून येथे ३ मार्चला जागतिक विक्रम नोंदविण्याची तयारी सुरू आहे. पण केवळ हा विक्रम केल्याने येथे अहिंसा आणि शांतता प्रस्थापित होणार का? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेच मिळेल. मग मोठा खर्च करून हा विश्वविक्रम करण्याची गरज काय? असाही प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होणे साहजिक आहे. या प्रश्नांची उत्तरे आज दिली नाही तरी चालेल, पण उद्या ती उत्तरे प्रत्यक्ष कृतीतूनच लोकांना मिळतील, याची दक्षता पोलिसांना घ्यावी लागणार आहे. आज नक्षलवाद आणि हिंसा हा गडचिरोलीवासीयांच्या दैनंदिन जीवनाचा जणू एक भाग झाला आहे. कधी पोलिसांचा खबºया असल्याच्या संशयातून नक्षल्यांकडून असलेली जीवाची भीती तर कधी नक्षल समर्थक असल्याच्या संशयातून पोलीस पकडून नेण्याची भीती. गेल्या ३०-४० वर्षांपासून हेच सुरू आहे. अशाप्रकारे ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करण्याच्या प्रकाराला आता लोकही कंटाळले आहेत. बाहेरचे जग पाहू लागलेल्या नवीन पिढीतील युवकांना प्रगती आणि विकास काय असते, हे कळू लागले आहे. त्यामुळेच नवीन पिढीसमोर नक्षलवाद जास्त दिवस तग धरण्याची शक्यता कमीच आहे, मात्र आदिवासींच्या या नवीन पिढीला प्रगतीच्या वाटेने पुढे नेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. सामान्य नागरिकांना हिंसाचार नको आहे, यात दुमत नाही. पण हिंसाचार घडविणा-यांशी उघडपणे दोन हात करण्याची हिंमतही त्यांच्यात नाही. ती हिंमत त्यांना देण्यासोबतच अहिंसेचा पुरस्कार करण्याची त्यांच्या मनातील भावना जाहीरपणे प्रकट करण्याची एक संधी गडचिरोलीत होऊ घातलेल्या जागतिक विक्रमाच्या निमित्ताने लोकांना मिळणार आहे. हा विश्वविक्रम झाला म्हणजे आता जिल्ह्यातील हिंसाचार थांबेल आणि जिल्ह्यात शांतता निर्माण होईल, असे मुळीच नाही. पण तसे होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले जाईल, हे निश्चित. विश्वविक्रम करणारा एक आदिवासीबहुल जिल्हा अशीही गडचिरोलीची ओळख जागतिक स्तरावर जाईल. मात्र त्यानंतर या जिल्ह्यात खरोखरच हिंसाचार थांबून शांतता प्रस्थापित करण्याची पोलिसांची जबाबदारी आणखी वाढणार आहे. तसे न झाल्यास ते पोलिसांचे अपयश ठरेल, यात शंका नाही.