शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

विश्वविक्रमाला गवसणी घालताना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 02:30 IST

महाराष्ट्रात गडचिरोलीचे नाव ऐकले नाही अशी व्यक्ती अभावानेच आढळेल. ज्या कारणासाठी गडचिरोलीची ओळख आहे ते कारण मात्र गडचिरोलीकर किंवा तमाम महाराष्ट्रालाही अभिमान वाटावा असे नाही.

महाराष्ट्रात गडचिरोलीचे नाव ऐकले नाही अशी व्यक्ती अभावानेच आढळेल. ज्या कारणासाठी गडचिरोलीची ओळख आहे ते कारण मात्र गडचिरोलीकर किंवा तमाम महाराष्ट्रालाही अभिमान वाटावा असे नाही. गेल्या चार दशकांपासून हा जिल्हा नक्षली हिंसाचाराने होरपळत आहे. शेकडो लोकांना हिंसाचाराला बळीही पडावे लागले. अशा वातावरणात महात्मा गांधींच्या अहिंसेच्या संदेश वाचनातून येथे ३ मार्चला जागतिक विक्रम नोंदविण्याची तयारी सुरू आहे. पण केवळ हा विक्रम केल्याने येथे अहिंसा आणि शांतता प्रस्थापित होणार का? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेच मिळेल. मग मोठा खर्च करून हा विश्वविक्रम करण्याची गरज काय? असाही प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होणे साहजिक आहे. या प्रश्नांची उत्तरे आज दिली नाही तरी चालेल, पण उद्या ती उत्तरे प्रत्यक्ष कृतीतूनच लोकांना मिळतील, याची दक्षता पोलिसांना घ्यावी लागणार आहे. आज नक्षलवाद आणि हिंसा हा गडचिरोलीवासीयांच्या दैनंदिन जीवनाचा जणू एक भाग झाला आहे. कधी पोलिसांचा खबºया असल्याच्या संशयातून नक्षल्यांकडून असलेली जीवाची भीती तर कधी नक्षल समर्थक असल्याच्या संशयातून पोलीस पकडून नेण्याची भीती. गेल्या ३०-४० वर्षांपासून हेच सुरू आहे. अशाप्रकारे ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करण्याच्या प्रकाराला आता लोकही कंटाळले आहेत. बाहेरचे जग पाहू लागलेल्या नवीन पिढीतील युवकांना प्रगती आणि विकास काय असते, हे कळू लागले आहे. त्यामुळेच नवीन पिढीसमोर नक्षलवाद जास्त दिवस तग धरण्याची शक्यता कमीच आहे, मात्र आदिवासींच्या या नवीन पिढीला प्रगतीच्या वाटेने पुढे नेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. सामान्य नागरिकांना हिंसाचार नको आहे, यात दुमत नाही. पण हिंसाचार घडविणा-यांशी उघडपणे दोन हात करण्याची हिंमतही त्यांच्यात नाही. ती हिंमत त्यांना देण्यासोबतच अहिंसेचा पुरस्कार करण्याची त्यांच्या मनातील भावना जाहीरपणे प्रकट करण्याची एक संधी गडचिरोलीत होऊ घातलेल्या जागतिक विक्रमाच्या निमित्ताने लोकांना मिळणार आहे. हा विश्वविक्रम झाला म्हणजे आता जिल्ह्यातील हिंसाचार थांबेल आणि जिल्ह्यात शांतता निर्माण होईल, असे मुळीच नाही. पण तसे होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले जाईल, हे निश्चित. विश्वविक्रम करणारा एक आदिवासीबहुल जिल्हा अशीही गडचिरोलीची ओळख जागतिक स्तरावर जाईल. मात्र त्यानंतर या जिल्ह्यात खरोखरच हिंसाचार थांबून शांतता प्रस्थापित करण्याची पोलिसांची जबाबदारी आणखी वाढणार आहे. तसे न झाल्यास ते पोलिसांचे अपयश ठरेल, यात शंका नाही.