शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंचे पुण्याहून पुणतांबा

By admin | Updated: June 22, 2017 01:23 IST

पुण्याहून पुणतांबा, अशी एक ग्रामीण म्हण प्रचलित आहे. सरळधोपट मार्गाने न जाता लांबून वळसा घालायचा या अर्थाने ही म्हण वापरली जाते.

पुण्याहून पुणतांबा, अशी एक ग्रामीण म्हण प्रचलित आहे. सरळधोपट मार्गाने न जाता लांबून वळसा घालायचा या अर्थाने ही म्हण वापरली जाते. योगायोगाने राज्यात सध्या पुणतांबा हे गाव चर्चेत आहे. पुणतांबातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे अनेकांना या गावाची वाट तुडवणे भाग पडले आहे. ज्यांच्या गावीही (ध्यानीमनी) हे गाव नव्हते त्यांनाही ते शोधावे लागले. पुणे, मुंबई या महानगरांच्या पलीकडे एक पुणतांबा आहे, अन् त्याचे काही प्रश्न आहेत. तेथेही मोठा मतदार आहे, तो संप करु शकतो, राज्य हादरवू शकतो, हा धडा पुणतांबाने राज्याला दिला. हा इतिहासच घडला आहे. पण, जे पक्ष व नेते आज पुणतांबाची वाट तुडवताहेत ते अगदी सरळधोपटच येताहेत का? याबाबत साशंकता आहेतच. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे आता पुणतांबेकरांच्या वाटेने निघाले आहेत म्हणून हा प्रश्न उपस्थित होतो. २५ जूनला ते येथे येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. ठाकरे आत्ता इतक्या उशिराने पुणतांबाला का? असा प्रश्न राजकीय पटलावर उपस्थित होऊ शकतो. तो होणारच. शेतकरी आंदोलनाच्या काळात ते परदेशात होते म्हणून त्यांना हा उशीर होतोय हे एक कारण झाले. ते खूपच तत्कालिक व वैयक्तिक कारण झाले. शेतकऱ्यांना त्यांच्या या कारणाशी काहीही घेणेदेणे नसणार. एकूणच एवढी वर्षे सेना कोठे हरवली होती? असा प्रश्न शेतकरी व शिवसैनिकांनाही पडू शकतो. सेना पुणतांबात आज पोहोचत नाही. शिवसेनेची नगर जिल्ह्यातील पहिली शाखा पुणतांबात स्थापन झाली. पुणतांबाचे सुहास वहाडणे हे सेनेचे जिल्हाप्रमुख होते. हे गाव म्हणजे संघाचाही बालेकिल्ला आहे. आजही पुणतांबात संघाची प्रभात शाखा, सायंशाखा व रात्र शाखा भरते. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे हे पुणतांबाचेच. ज्या विचारांचा हे गाव बालेकिल्ला आहे त्याच विचाराचे सरकार राज्यात व देशात आज सत्तास्थानी आहे. असे असताना पुणतांबा संपावर गेले. हा संप सेना-भाजपचे यश समजायचे की अपयश? ठाकरे हे पुणतांबेकरांशी संवाद साधायला येताहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. पण, सरकार त्यांचेच असताना शेतकऱ्यांशी मंत्रिमंडळातून संवाद साधायचा की पुणतांबातून? हा प्रश्न सेनेला विचारला जाणार. म्हणूनच ‘पुण्याहून पुणतांबा’ ही म्हण सेनेच्या या नीतीलाही लागू पडते. एकाच वेळी सरकार व पुणतांबा हे दोन्हीही सेनेला सांभाळायचे आहे, असे दिसते. शेतकरी अस्वस्थ आहे व आपण महानगरी प्रश्नातच अडकून पडलो, तर सेनेला ग्रामीण भागात भवितव्य नाही, हे सेनेनेही ओळखले आहे. नगरसारख्या जिल्ह्यातही सेनेची पीछेहाट झाली आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व एकूणच ग्रामीण प्रश्नांशी सेनेचा संवाद खुंटला आहे. गत जिल्हा परिषद निवडणुकीत सेनेचा एकही बडा नेता जिल्ह्यात फिरकला नाही. विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे स्वत:ही प्रथमच जिल्ह्यात येत आहेत. या जिल्ह्यात सेनेकडे सध्या फक्त एक आमदार व खासदार आहे. नगरसारख्या मोठ्या जिल्ह्यात पक्षाची ही अवस्था आहे. म्हणूनच ठाकरेंना बहुधा पुणतांबा आठवले, असाही या दौऱ्याचा एक अर्थ निघतो. समृद्धी महामार्ग नगर जिल्ह्यातूनही जातो. याही शेतकऱ्यांना ते भेटणार आहेत. ठाकरे पुणतांबातून पुन्हा एकदा सेनेला उभारीची व शेतकरी प्रश्नांना हात घालण्याची हाक देतील, अशी शक्यता आहे. फडणवीस सरकारवर दबाव ठेवण्याची त्यांची जुनी रणनीती याही दौऱ्यात त्यांच्या सोबत आहेच. पुणतांबेकरांच्या भेटीनंतर शेतकरी कर्जमाफीतील ‘तत्त्वत:’ ‘निकष’ हे शब्द बाजूला करून ठाकरे सरकारला ‘सरधोपट’ पुणतांबात पोहोचविणार का? यावर त्यांच्या या दौऱ्याचे फलित ठरेल. असे झाले तरच ठाकरे सरधोपट पुणतांबाला निघालेत, असे म्हणता येईल. - सुधीर लंके