शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंचे पुण्याहून पुणतांबा

By admin | Updated: June 22, 2017 01:23 IST

पुण्याहून पुणतांबा, अशी एक ग्रामीण म्हण प्रचलित आहे. सरळधोपट मार्गाने न जाता लांबून वळसा घालायचा या अर्थाने ही म्हण वापरली जाते.

पुण्याहून पुणतांबा, अशी एक ग्रामीण म्हण प्रचलित आहे. सरळधोपट मार्गाने न जाता लांबून वळसा घालायचा या अर्थाने ही म्हण वापरली जाते. योगायोगाने राज्यात सध्या पुणतांबा हे गाव चर्चेत आहे. पुणतांबातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे अनेकांना या गावाची वाट तुडवणे भाग पडले आहे. ज्यांच्या गावीही (ध्यानीमनी) हे गाव नव्हते त्यांनाही ते शोधावे लागले. पुणे, मुंबई या महानगरांच्या पलीकडे एक पुणतांबा आहे, अन् त्याचे काही प्रश्न आहेत. तेथेही मोठा मतदार आहे, तो संप करु शकतो, राज्य हादरवू शकतो, हा धडा पुणतांबाने राज्याला दिला. हा इतिहासच घडला आहे. पण, जे पक्ष व नेते आज पुणतांबाची वाट तुडवताहेत ते अगदी सरळधोपटच येताहेत का? याबाबत साशंकता आहेतच. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे आता पुणतांबेकरांच्या वाटेने निघाले आहेत म्हणून हा प्रश्न उपस्थित होतो. २५ जूनला ते येथे येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. ठाकरे आत्ता इतक्या उशिराने पुणतांबाला का? असा प्रश्न राजकीय पटलावर उपस्थित होऊ शकतो. तो होणारच. शेतकरी आंदोलनाच्या काळात ते परदेशात होते म्हणून त्यांना हा उशीर होतोय हे एक कारण झाले. ते खूपच तत्कालिक व वैयक्तिक कारण झाले. शेतकऱ्यांना त्यांच्या या कारणाशी काहीही घेणेदेणे नसणार. एकूणच एवढी वर्षे सेना कोठे हरवली होती? असा प्रश्न शेतकरी व शिवसैनिकांनाही पडू शकतो. सेना पुणतांबात आज पोहोचत नाही. शिवसेनेची नगर जिल्ह्यातील पहिली शाखा पुणतांबात स्थापन झाली. पुणतांबाचे सुहास वहाडणे हे सेनेचे जिल्हाप्रमुख होते. हे गाव म्हणजे संघाचाही बालेकिल्ला आहे. आजही पुणतांबात संघाची प्रभात शाखा, सायंशाखा व रात्र शाखा भरते. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे हे पुणतांबाचेच. ज्या विचारांचा हे गाव बालेकिल्ला आहे त्याच विचाराचे सरकार राज्यात व देशात आज सत्तास्थानी आहे. असे असताना पुणतांबा संपावर गेले. हा संप सेना-भाजपचे यश समजायचे की अपयश? ठाकरे हे पुणतांबेकरांशी संवाद साधायला येताहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. पण, सरकार त्यांचेच असताना शेतकऱ्यांशी मंत्रिमंडळातून संवाद साधायचा की पुणतांबातून? हा प्रश्न सेनेला विचारला जाणार. म्हणूनच ‘पुण्याहून पुणतांबा’ ही म्हण सेनेच्या या नीतीलाही लागू पडते. एकाच वेळी सरकार व पुणतांबा हे दोन्हीही सेनेला सांभाळायचे आहे, असे दिसते. शेतकरी अस्वस्थ आहे व आपण महानगरी प्रश्नातच अडकून पडलो, तर सेनेला ग्रामीण भागात भवितव्य नाही, हे सेनेनेही ओळखले आहे. नगरसारख्या जिल्ह्यातही सेनेची पीछेहाट झाली आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व एकूणच ग्रामीण प्रश्नांशी सेनेचा संवाद खुंटला आहे. गत जिल्हा परिषद निवडणुकीत सेनेचा एकही बडा नेता जिल्ह्यात फिरकला नाही. विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे स्वत:ही प्रथमच जिल्ह्यात येत आहेत. या जिल्ह्यात सेनेकडे सध्या फक्त एक आमदार व खासदार आहे. नगरसारख्या मोठ्या जिल्ह्यात पक्षाची ही अवस्था आहे. म्हणूनच ठाकरेंना बहुधा पुणतांबा आठवले, असाही या दौऱ्याचा एक अर्थ निघतो. समृद्धी महामार्ग नगर जिल्ह्यातूनही जातो. याही शेतकऱ्यांना ते भेटणार आहेत. ठाकरे पुणतांबातून पुन्हा एकदा सेनेला उभारीची व शेतकरी प्रश्नांना हात घालण्याची हाक देतील, अशी शक्यता आहे. फडणवीस सरकारवर दबाव ठेवण्याची त्यांची जुनी रणनीती याही दौऱ्यात त्यांच्या सोबत आहेच. पुणतांबेकरांच्या भेटीनंतर शेतकरी कर्जमाफीतील ‘तत्त्वत:’ ‘निकष’ हे शब्द बाजूला करून ठाकरे सरकारला ‘सरधोपट’ पुणतांबात पोहोचविणार का? यावर त्यांच्या या दौऱ्याचे फलित ठरेल. असे झाले तरच ठाकरे सरधोपट पुणतांबाला निघालेत, असे म्हणता येईल. - सुधीर लंके