शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

पंजाबी राजकारणाचा ‘रिअ‍ॅलिटी शो’

By admin | Updated: September 10, 2016 05:45 IST

क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी ‘आवाज-ए-पंजाब’ नावाचा मंच स्थापन करून राजकारणातील आपली ‘दुसरी इनिंग’ सुरू होत असल्याचे संकेत दिले

भाजपाने ‘बारावा राखीव खेळाडू’ म्हणून बाजूला बसवल्याने नाराज झालेल्या क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी ‘आवाज-ए-पंजाब’ नावाचा मंच स्थापन करून राजकारणातील आपली ‘दुसरी इनिंग’ सुरू होत असल्याचे संकेत दिले आहेत. ‘एका दगडात अनेक पक्षी’ मारण्याचा इराद्याने सिद्धू यांना ‘भोली सूरत दिल के खोटे, नाम बडे, और दर्शन छोटे’ ही बॉलीवूडच्या चित्रपटातील एका लोकप्रिय गाण्याची ओळ सांगून भाजपा, काँग्रेस व ‘आप’ या तीनही पक्षांना एकाच वेळी लक्ष्य केले. सिद्धू हे हजरजबाबी आहेत. त्यामुळे चित्रवाणीवरील वाहिन्यांच्या ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्ये ते भरपूर लोकप्रियता मिळवत आले आहेत. शिवाय क्रिकेटच्या सामन्यांच्या धावत्या वर्णनाच्या वेळी एक तज्ज्ञ म्हणूनही ते लोकप्रिय ठरले आहेत. त्यामुळे पंजाबातील निवडणुकीच्या रिंगणात सिद्धू यांनी उडी मारल्याने प्रचाराची रंगत वाढेल हे नक्की. शिवाय त्यांच्या या ‘दुसऱ्या इनिंग’मुळे काँग्रेस व ‘आप’ या दोन्ही पक्षांना आता आपल्या रणनीतीत फेरबदल करणे भाग पडणार आहे, हेही निश्चित. पण त्यापलीकडे सिद्धू प्रत्यक्षात राजकीय बळ किती जमवू शकतात, याबाबत शंकाच आहे; कारण गेली काही वर्षे भाजपात असताना सिद्धू यांना त्या पक्षाच्या पंजाब शाखेतही आपला जम बसवता आलेला नव्हता. त्यामुळेच ‘बारावा राखीव खेळाडू’ म्हणून निवडणुकीच्या खेळात सिद्धू यांना मागे बसवणे भाजपाला शक्य झाले होते. अशा रीतीने सिद्धू हे राजकारणाचा ‘रिअ‍ॅलिटी शो’ करण्याच्या तयारीस लागले असतानाच, पंजाबात बाजी मारण्याच्या ‘आप’च्या स्वप्नाला तडा जाण्यास सुरूवात झाली आहे. सिद्धू यांनी ‘एलान-ए-पंजाब’ या मंचाच्या स्थापनेची घोषणा केली, त्याच दिवशी ‘आप’चे नेते असलेले अरविंद केजरीवाल हे लुधियानात येऊन पोहचले, तेव्हा त्यांच्या विरोधात महिलांनी तीव्र निदर्शने केली. निमित्त होते, ते ‘आप’च्या एका आमदाराच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रसिद्ध होत असलेल्या कहाण्या आणि त्याला झालेली अटक. एकूणच गेल्या काही महिन्यांत ‘आप’चे आमदार एकापाठोपाठ एक अनेक वादग्रस्त प्रकरणात अडकत गेले आहेत. हा भाजपाचा कट आहे, असा केजरीवाल यांचा आरोप आहे. त्यात अजिबात तथ्य नाही, असेही छातीठोकपणे म्हणण्याजोगी स्थिती नाही. याचे कारण म्हणजे ‘आप’ ने निवडणुकीत धूळ चारल्याने संतप्त झालेल्या मोदी व भाजपाने केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून त्यांच्या कारभारात अडथळे आणण्याचा सतत प्रयत्न चालविला आहे. अर्थात अतिरेकी आदर्शवादाच्या आहारी जाऊन नैतिकतेच्या उंच मंचावर बसून इतरांना नीतिमत्तेचे धडे देण्याचा जो उद्योग केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासून सुरू केला होता, तोच आता त्यांचा अंगाशी येत आहे. दिल्ली या ‘राज्या’ची सत्ता ‘आप’च्या हातात आली. पण दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नाही. केंद्रशासित प्रदेशात जसे प्रशासकीय अधिकार नायब राज्यपालांनाच असतात, तीच घटनात्मक तरतूद दिल्लीसाठी आहे. राजकारणात उडी घेण्यापूर्वी केजरीवाल हे प्राप्तिकर खात्यात वरिष्ठ पदावर अधिकारी होते. त्यामुळे प्रशासकीय चाकोरी त्यांना माहीत नसणे असंभवनीय आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीची सत्ता हाती आल्यावर केजरीवाल यांनी या चाकोरीबाहेर पडून धडाक्याने निर्णय घेण्यास सुरूवात केली. त्यामुळे मोदी व भाजपा यांना आयतीच संधी मिळाली आणि नायब राज्यपाल केजरीवाल यांच्या आदेशांना स्थगिती देऊ लागले. मग प्रकरण उच्च न्यायालयात गेले. तेथे केजरीवाल यांना हार पत्करावी लागली. आता ते सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहेत. दुसरीकडे नैतिकतेचे धडे देणाऱ्या केजरीवाल यांच्या पक्षात किती अनैतिकता आहे, हे त्यांना सोडून गेलेल्या प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांनीच जगासमोर आणले. ही अशी सुवर्णसंधी भाजपा सोडणे शक्यच नव्हते. पंजाबात गेल्या लोकसभा निवडणुकीत दोन जागा मिळाल्याने तेथे बरीच मोठी मजल मारण्याची स्वप्ने केजरीवाल बघत होते, ती या अशा पार्श्वभूमीवर धूसर होत जाण्याची शक्यताच जास्त आहे. राहिला प्रश्न भाजपा-अकाली दलाचा व काँग्रेसचा. अकाली दलाच्या कारभाराला जनता विटली आहे. अमली पदार्थांच्या व्यसनाचा विळखा पंजाबातील तरूण वर्गाभोवती पडला आहे. त्यात अनेक अकाली नेत्यांचाच हात आहे. जनमानसात अकाली दलाची ही जी डागाळलेली प्रतिमा आहे, त्याने भाजपाही हतबल झाला आहे. याच परिस्थितीचा फायदा ‘आप’ उठवू पाहत होता. पण राजकीय अदूरदर्शीपणामुळें केजरीवाल यांनी स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. पंजाबी राजकारणाचा हा ‘रिअ‍ॅलिटी शो’ काँग्रेस विंगेत उभी राहून बघत आहे. आपल्याला फायदा होणार, असा विश्वास काँग्रेसला वाटत आहे. पण या पक्षातही मतभेदांचे पेव पसरलेले आहे आणि प्रत्यक्षात काँग्रेस पक्षाची यंत्रणा कामाला लागल्याची चिन्हे दिसत नाहीत. अशा या वातावरणात नवज्योतसिंग सिद्धू यांनी उडी मारल्याने पंजाबी राजकारणाचा हा ‘रिअ‍ॅलिटी शो’ निवडणुकीच्या प्रचारता रंगत आणणार आहे. मात्र मतदारांना चांगला पर्याय देण्याच्या परिस्थितीत एकही पक्ष नाही, हीच खरी पंजाबची शोकांतिका आहे.