शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबी राजकारणाचा ‘रिअ‍ॅलिटी शो’

By admin | Updated: September 10, 2016 05:45 IST

क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी ‘आवाज-ए-पंजाब’ नावाचा मंच स्थापन करून राजकारणातील आपली ‘दुसरी इनिंग’ सुरू होत असल्याचे संकेत दिले

भाजपाने ‘बारावा राखीव खेळाडू’ म्हणून बाजूला बसवल्याने नाराज झालेल्या क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी ‘आवाज-ए-पंजाब’ नावाचा मंच स्थापन करून राजकारणातील आपली ‘दुसरी इनिंग’ सुरू होत असल्याचे संकेत दिले आहेत. ‘एका दगडात अनेक पक्षी’ मारण्याचा इराद्याने सिद्धू यांना ‘भोली सूरत दिल के खोटे, नाम बडे, और दर्शन छोटे’ ही बॉलीवूडच्या चित्रपटातील एका लोकप्रिय गाण्याची ओळ सांगून भाजपा, काँग्रेस व ‘आप’ या तीनही पक्षांना एकाच वेळी लक्ष्य केले. सिद्धू हे हजरजबाबी आहेत. त्यामुळे चित्रवाणीवरील वाहिन्यांच्या ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्ये ते भरपूर लोकप्रियता मिळवत आले आहेत. शिवाय क्रिकेटच्या सामन्यांच्या धावत्या वर्णनाच्या वेळी एक तज्ज्ञ म्हणूनही ते लोकप्रिय ठरले आहेत. त्यामुळे पंजाबातील निवडणुकीच्या रिंगणात सिद्धू यांनी उडी मारल्याने प्रचाराची रंगत वाढेल हे नक्की. शिवाय त्यांच्या या ‘दुसऱ्या इनिंग’मुळे काँग्रेस व ‘आप’ या दोन्ही पक्षांना आता आपल्या रणनीतीत फेरबदल करणे भाग पडणार आहे, हेही निश्चित. पण त्यापलीकडे सिद्धू प्रत्यक्षात राजकीय बळ किती जमवू शकतात, याबाबत शंकाच आहे; कारण गेली काही वर्षे भाजपात असताना सिद्धू यांना त्या पक्षाच्या पंजाब शाखेतही आपला जम बसवता आलेला नव्हता. त्यामुळेच ‘बारावा राखीव खेळाडू’ म्हणून निवडणुकीच्या खेळात सिद्धू यांना मागे बसवणे भाजपाला शक्य झाले होते. अशा रीतीने सिद्धू हे राजकारणाचा ‘रिअ‍ॅलिटी शो’ करण्याच्या तयारीस लागले असतानाच, पंजाबात बाजी मारण्याच्या ‘आप’च्या स्वप्नाला तडा जाण्यास सुरूवात झाली आहे. सिद्धू यांनी ‘एलान-ए-पंजाब’ या मंचाच्या स्थापनेची घोषणा केली, त्याच दिवशी ‘आप’चे नेते असलेले अरविंद केजरीवाल हे लुधियानात येऊन पोहचले, तेव्हा त्यांच्या विरोधात महिलांनी तीव्र निदर्शने केली. निमित्त होते, ते ‘आप’च्या एका आमदाराच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रसिद्ध होत असलेल्या कहाण्या आणि त्याला झालेली अटक. एकूणच गेल्या काही महिन्यांत ‘आप’चे आमदार एकापाठोपाठ एक अनेक वादग्रस्त प्रकरणात अडकत गेले आहेत. हा भाजपाचा कट आहे, असा केजरीवाल यांचा आरोप आहे. त्यात अजिबात तथ्य नाही, असेही छातीठोकपणे म्हणण्याजोगी स्थिती नाही. याचे कारण म्हणजे ‘आप’ ने निवडणुकीत धूळ चारल्याने संतप्त झालेल्या मोदी व भाजपाने केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून त्यांच्या कारभारात अडथळे आणण्याचा सतत प्रयत्न चालविला आहे. अर्थात अतिरेकी आदर्शवादाच्या आहारी जाऊन नैतिकतेच्या उंच मंचावर बसून इतरांना नीतिमत्तेचे धडे देण्याचा जो उद्योग केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासून सुरू केला होता, तोच आता त्यांचा अंगाशी येत आहे. दिल्ली या ‘राज्या’ची सत्ता ‘आप’च्या हातात आली. पण दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नाही. केंद्रशासित प्रदेशात जसे प्रशासकीय अधिकार नायब राज्यपालांनाच असतात, तीच घटनात्मक तरतूद दिल्लीसाठी आहे. राजकारणात उडी घेण्यापूर्वी केजरीवाल हे प्राप्तिकर खात्यात वरिष्ठ पदावर अधिकारी होते. त्यामुळे प्रशासकीय चाकोरी त्यांना माहीत नसणे असंभवनीय आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीची सत्ता हाती आल्यावर केजरीवाल यांनी या चाकोरीबाहेर पडून धडाक्याने निर्णय घेण्यास सुरूवात केली. त्यामुळे मोदी व भाजपा यांना आयतीच संधी मिळाली आणि नायब राज्यपाल केजरीवाल यांच्या आदेशांना स्थगिती देऊ लागले. मग प्रकरण उच्च न्यायालयात गेले. तेथे केजरीवाल यांना हार पत्करावी लागली. आता ते सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहेत. दुसरीकडे नैतिकतेचे धडे देणाऱ्या केजरीवाल यांच्या पक्षात किती अनैतिकता आहे, हे त्यांना सोडून गेलेल्या प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांनीच जगासमोर आणले. ही अशी सुवर्णसंधी भाजपा सोडणे शक्यच नव्हते. पंजाबात गेल्या लोकसभा निवडणुकीत दोन जागा मिळाल्याने तेथे बरीच मोठी मजल मारण्याची स्वप्ने केजरीवाल बघत होते, ती या अशा पार्श्वभूमीवर धूसर होत जाण्याची शक्यताच जास्त आहे. राहिला प्रश्न भाजपा-अकाली दलाचा व काँग्रेसचा. अकाली दलाच्या कारभाराला जनता विटली आहे. अमली पदार्थांच्या व्यसनाचा विळखा पंजाबातील तरूण वर्गाभोवती पडला आहे. त्यात अनेक अकाली नेत्यांचाच हात आहे. जनमानसात अकाली दलाची ही जी डागाळलेली प्रतिमा आहे, त्याने भाजपाही हतबल झाला आहे. याच परिस्थितीचा फायदा ‘आप’ उठवू पाहत होता. पण राजकीय अदूरदर्शीपणामुळें केजरीवाल यांनी स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. पंजाबी राजकारणाचा हा ‘रिअ‍ॅलिटी शो’ काँग्रेस विंगेत उभी राहून बघत आहे. आपल्याला फायदा होणार, असा विश्वास काँग्रेसला वाटत आहे. पण या पक्षातही मतभेदांचे पेव पसरलेले आहे आणि प्रत्यक्षात काँग्रेस पक्षाची यंत्रणा कामाला लागल्याची चिन्हे दिसत नाहीत. अशा या वातावरणात नवज्योतसिंग सिद्धू यांनी उडी मारल्याने पंजाबी राजकारणाचा हा ‘रिअ‍ॅलिटी शो’ निवडणुकीच्या प्रचारता रंगत आणणार आहे. मात्र मतदारांना चांगला पर्याय देण्याच्या परिस्थितीत एकही पक्ष नाही, हीच खरी पंजाबची शोकांतिका आहे.