शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

पुन्हा उडता पंजाब

By admin | Updated: June 22, 2016 23:41 IST

हा फरक आहे लोकशाहीत आणि ठोकशाहीत. अनुराग कश्यप यांच्या उडता पंजाब या सिनेमावर पहलाज निहलानी यांनी सपासप कातरी चालविण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यातून होत

हा फरक आहे लोकशाहीत आणि ठोकशाहीत. अनुराग कश्यप यांच्या उडता पंजाब या सिनेमावर पहलाज निहलानी यांनी सपासप कातरी चालविण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यातून होत असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीच्या विरुद्ध भारतातील असंख्य लोक अनुराग यांच्या बाजूने उभे राहिले आणि न्यायालयानेदेखील या स्वातंत्र्याचे रक्षण करणारा निवाडा जाहीर केला. ज्या लोकानी आणि संस्थांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा लावून धरला ते सारे अनुराग यांचे चाहते वा निहलानी यांचे वैरी होते असे नव्हे. मुद्दा तात्त्विक होता आणि अंती तो विजयी झाला. परंतु यातील अत्यंत विचित्र योगायोग म्हणजे हाच चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित करण्यासाठी जेव्हां तिकडे पाठविण्यात आला तेव्हां तिथल्या सेन्सॉर बोर्डाने याच सिनेमात तब्बल शंभर ‘कट’ सुचविले. मुबाशीर हसन यांच्या अध्यक्षतेखालील मंडळातल्या सर्व दहा सदस्यांनी उडता पंजाब पाकिस्तानात प्रदर्शित करण्यासाठी शंभर जागी कापाकापी करण्याचा एकमुखी निर्णय जाहीर केला. सिनेमातील बहुतेक संवाद आक्षेपार्ह असल्याचे सांगून हसन यांनी म्हटले आहे की पाकच्या विरोधातील संवादांच्या जागी ‘बीप’ करण्याचे आदेश सिनेमाच्या वितरकाला दिले आहेत. त्याआधी पाच सदस्यीय मंडळाने उडता पंजाबचा पाकमधील प्रवेशच नाकारण्याची भूमिका घेतली होती. पण वितरकाच्या विनंतीवरून मंडळाच्या सर्व सदस्यांनी चित्रपट पाहून १०० जागी कापाकापी करण्यास सांगण्याचा निर्णय घेतला. आमचे मंडळ कधीही इस्लामविरोधी, पाकविरोधी आणि समाजविरोधी दृष्यांबाबत तडजोड करीत नाही असेही हसन यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे संबंधित वितरकाने पाकी मंडळाचा आदेश शिरोधार्थ मानला आहे व मंडळाच्या शिफारसीनुसार दुबईत जाऊन उडता पंजाबवर नव्याने संस्करण करून मगच तो सिनेमा पाकिस्तानमध्ये झळकविण्याचे ठरविले आहे. भारतातील चित्रपट प्रमाणीकरण मंडळाच्या निर्णयाला ज्या चित्रपटाच्या बाबतीत आव्हान दिले जाऊ शकते त्याच चित्रपटाबाबत पाकिस्तानातील मंडळापुढे मान तुकविणे भाग पडते हा लोकशाहीतील मोठा फरक येथे दिसून येतो. पण मग जो बाणेदारपणा याच चित्रपटाशी संबंधित निर्माता-दिग्दर्शकाने भारतात दाखविला तोच तिथेही दाखवून एकही दृष्य कापणार नाही, भले पाकिस्तानात सिनेमा नाही दाखविला गेला तरी बेहत्तर अशी भूमिका काही घेतली नाही. यावर पाकिस्तानातील वितरकाशी आम्हाला काही घेणे देणे नाही असे उत्तर येईल. तरीही धंदा महत्वाचा हेच खरे. तत्त्व वगैरे नंतर!