शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पुणे-मुंबई महामार्ग अपघातमुक्त व्हावा

By admin | Updated: June 29, 2017 00:53 IST

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अपघातमुक्तीकडे पाऊल टाकत महाराष्ट्राच्या प्रगतीचा प्रशस्तमहामार्ग ठरावा...

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अपघातमुक्तीकडे पाऊल टाकत महाराष्ट्राच्या प्रगतीचा प्रशस्तमहामार्ग ठरावा...पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग प्रगतीचा दिशादर्शक म्हणून महाराष्ट्राचे भूषण आहे. पुणे आणि मुंबईच्या विकासाच्या वाटचालीत त्याचे ॅॅविशेष महत्त्व आहे. सांस्कृतिक राजधानी पुणे आणि आर्थिक राजधानी मुंबई यांना जोडण्यासाठी उभारण्यात आलेला हा मार्ग उद्या १८ वर्षे पूर्ण करीत आहे. भारतातील सर्वात पहिला नियंंत्रित प्रवेश अशी या महामार्गाची ओळख आहे. ब्रिटिशांच्या काळात बांधल्या गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर सातत्याने वाहतुकीत वाढ होत गेली. त्याचा अंदाज घेत १९९० साली केंद्र सरकारच्या राईट्स व ब्रिटिश कंपनी स्कोंट विल्सन समूह या कंपन्यांनी या मार्गाची पाहणी व अभ्यास केला. पुणे-मुंबई प्रवास अडीच तासांत हे स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले. सध्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी तत्कालीन सार्वजनिक वाहतूक मंत्री होते. त्यांनी या महामार्गाच्या उभारणीचे शिवधनुष्य पेलले. त्यांच्या कल्पकतेतून उभारणीचा आराखडा तयार झाला. १९९७ साली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर उभारणीची जबाबदारी सोपविली गेली. ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या तत्त्वावर पथकर आकारून बांधकाम खर्च वसूल करण्याचा निर्णय घेतला गेला. कोणताही अडथळा, काटरस्ता अथवा वाहतूक नियंत्रक, सिग्नल नसलेल्या या मार्गाद्वारे सुसाट वेगाने प्रवास करण्याची ओळख देशवासीयांना झाली. देशातील सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी हा एक मार्ग आहे. २००९ साली या द्रुतगती महामार्गाला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नाव दिले गेले. या मार्गामुळे मुंबई-पुणे हा १४८ किलोमीटर लांबीचा प्रवास सहा तासांवरून दोन-अडीच तासांवर आला आहे. बहुतांश खासगी वाहने, एस.टी. बसेस तसेच मालवाहू वाहने या रस्त्याचा वापर करतात. नवी मुंबई शहराच्या कळंबोलीपाशी हा रस्ता सुरु होतो. पुण्यातील देहूरस्ता येथे राष्ट्रीय महामार्गाला येऊन मिळतो. सुमारे ९४.५ किलोमीटर लांबीचा हा रस्ता सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील बोरघाटामधून जातो. गेल्या १८ वर्षांमध्ये येथील समस्या मात्र कमी झाल्या नाहीत, उलट वाढत चालल्या आहेत. १७०० हून अधिक अपघात, ५००हून अधिक बळी १८ वर्षांमध्ये या रस्त्याने अनुभवले आहेत. भक्ती बर्वे, आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे, विहंग नायक अशा कलावंतांसोबतच अनेक निष्पाप जीव मृत्युमुखी पडले आहेत. वाहतूक कोंडी आणि अपघात टाळणे, चांगली वाहतूक व्यवस्था निर्माण करणे या मुख्य हेतूने महामार्ग बांधण्यात आला होता. मात्र, हे हेतू साध्य झाले नसल्याचे दिसून येत आहे. वाहने लेन शिस्त पाळत नाहीत. दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. डाव्या बाजूने ओव्हरटेक करणे, अनियंत्रित वेगामुळे अपघात वाढले आहेत. शिस्त आणि वाहनांचा मर्यादित वेग याविषयी जागृती करण्यात एमएसआरडीसी, परिवहन मंत्री तसेच संबंधित पोलीस यंत्रणेला अपयश आलेले आहे. पुरेसे उड्डाणपूलच नसल्याने लोकांनी कंपाऊंड तोडून महामार्ग ओलांडण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर एमआरडीसीने समांतर रस्ता व उड्डाणपूल बांधले. लोकांबरोबरच जनावरेही येण्याचे न थांबल्याने अपघाताचा धोका कायम आहे. जुना मार्ग आणि द्रुतगती मार्ग दोन्ही रस्ते येथे एकत्र आल्याने वाहनांची संख्या वाढते. अनेकदा अपघात घडून वाहतूक ठप्प होते. द्रुतगती मार्गावरील टोल हे सुद्धा एक गौडबंगालच आहे. टोलची मुदत २०१९ पर्यंत आहे. तो कमीतकमी असेल असे सांगितले जात होते. ज्या उद्देशाने हा द्रुतगती मार्ग बांधण्यात आला, त्यालाच तडा गेला आहे. यामागील नेमके सत्य ‘पारदर्शक’पणे सामोरे यावे अशी प्रवाशांची मागणी आहे. प्रवासाचा कोणताही थकवा न जाणवता इच्छितस्थळी जातानाची मजा काही औरच असते. पण वेगामुळे होणारे अपघात, दरडी कोसळणे, लेनची शिस्त न पाळणारे अतिउत्साही प्रवासी आदी विविध कारणांमुळे हा महामार्ग असुरक्षित व धोकादायक ठरला आहे. देशातील पहिला महामार्ग अशी इतिहासात नोंद असलेला हा एकमेव द्रुतगती मार्ग अपघातमुक्त हमरस्ता म्हणून ओळखला जावा. महाराष्ट्राच्या प्रगतीचा महामार्ग ही त्याची ओळख बनावी. - विजय बाविस्कर