शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लोकानुनयासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2016 00:02 IST

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या त्यांच्या तिसऱ्या भाषणात नवीन तसे काही नव्हते, अपवाद केवळ पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील अशांततेच्या उल्लेखाचा

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या त्यांच्या तिसऱ्या भाषणात नवीन तसे काही नव्हते, अपवाद केवळ पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील अशांततेच्या उल्लेखाचा. तुम्ही सतत जम्मू-काश्मीरमधील अशांततेचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न करता आणि काश्मीरी जनतेला स्वातंत्र्य हवे आहे म्हणून सतत गवगवा करता पण तुमच्या बलुचिस्तानात काय चालले आहे व तेथील जनतेच्या स्वातंत्र्याच्या मागणीचे काय, असा मोदी यांच्या भाषणाचा सूर होता. काश्मीर खोऱ्यात पाकिस्तान ढवळाढवळ करुन अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा जो भारताचा आरोप आहे तसाच आरोप पाकिस्तानही भारतावर बलुचिस्तानसंबंधी करीत आहे आणि डॉ.मनमोहनसिंग पंतप्रधान असताना पाकिस्तानच्या या आरोपावर चर्चा करण्याची तयारी भारताने दाखविलीही होती. तथापि मोदींच्या सोमवारच्या भाषणातील बलुचिस्तानच्या संदर्भावर संपुआ सरकारमधील परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी खरमरीत प्रतिक्रिया देताना बलुचिस्तान हा पाकचा अंतर्गत प्रश्न आहे व त्यावर सार्वजनिक चर्चा करण्याने भारताच्या पाकव्याप्त काश्मीरवरील हक्कास बाधा पोहोचू शकते असे म्हणताक्षणी काँग्रेस पक्षाने खुर्शीद यांना एकाकी पाडून मोदींच्या कथनास पाठिंबा दिला आहे. बलुचिस्तान असो की पाकव्याप्त काश्मीर असो, पाकिस्तान त्या प्रांतात लष्कराचा वापर करुन लोकांच्या हक्कांची पायमल्ली करीत आहे व हा प्रश्न आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चर्चेस आणलाच गेला पाहिजे असे स्वच्छ भूमिका काँग्रेस पक्षाने जाहीर केली आहे. लोकव्यवहारात ज्याला ‘ठोशास ठोसा’ म्हणतात तसाच काहीसा प्रकार मोदींनी केला असला आणि त्याला काँग्रेसनेही पाठिंबा जाहीर केला असला तरी नुकत्याच संपलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही महत्वाच्या राष्ट्रीय पक्षांमध्ये जे सौहार्द निर्माण झाल्याचे म्हटले जाते, त्याचा हा निश्चितच परिणाम नव्हे असा तज्ज्ञांचा अभिप्राय आहे. त्यामागे कारण आहे उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे. पाकिस्तानच्या विरोधात घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही भूमिकेचे शहरी आणि विशेषत: युवा वर्गातील मतदारांकडून स्वागत होत असते आणि त्यातच मग हिन्दू मतांचे अप्रत्यक्षरीत्या ध्रुवीकरणही होत असते. मोदी आणि भाजपा यांना ते अपेक्षितही असते. लोकानुनय त्यासाठीच असतो. पण आज काँगेसची स्थिती इतकी नाजूक बनली आहे की तिचे परंपरागत मतदार तिच्यापासून दूर गेले असल्याने तिलाही हिंदू मतांची ओढ लागली आहे.