शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
3
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
4
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
5
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
6
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
7
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
8
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
9
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
10
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
11
जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्यउद्योगाला जागा; इम्तियाज जलीलांचा शिरसाटांवर आरोप
12
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
13
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
14
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
15
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
17
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
18
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
19
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
20
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?

पुनश्च ‘फील गुड’!

By admin | Updated: January 28, 2016 03:31 IST

केन्द्रातील रालोआच्या पूर्वीच्या राजवटीवर आधारित ‘फील गुड’च्या प्रचाराचा दणका या आघाडीने उडवूनदेखील देशातील मतदारांनी तो फारसा मनावर न घेऊन २००४च्या निवडणुकीत

केन्द्रातील रालोआच्या पूर्वीच्या राजवटीवर आधारित ‘फील गुड’च्या प्रचाराचा दणका या आघाडीने उडवूनदेखील देशातील मतदारांनी तो फारसा मनावर न घेऊन २००४च्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआला सत्तेवर आणले होते. तेव्हांच्या प्रचारातील फील गुडचा संदर्भ मतदारांशी होता. म्हणजे मतदारांना ‘गुड’ जाणवत असल्याचा रालोआ आणि खरे तर भाजपाचा दावा होता. पण अलीकडेच एका खासगी संस्थेने जे सर्वेक्षण केले आहे त्याचे निष्कर्ष खुद्द रालोआ आणि विशेषत: भाजपा आणि पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना ‘गुड’ ‘फील’ व्हावे असे आहेत. सर्वेक्षणात देशातील ज्या लोकाना सहभागी करुन घेतले गेले त्यातील ४६ टक्के लोकांच्या मते म्हणे देशाचा सध्याचा कारभार ‘सरासरीपेक्षा खूपच वरचा’ आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे ४६ टक्के लोक मोदी सरकारच्या कारभारावर खूष असताना त्याहून अधिक म्हणजे ५४ टक्के लोक खुद्द मोदी यांच्याच प्रेमात पडल्याचे सर्वेक्षणातून आढळून आले आहे. तरीदेखील आजच्या या ‘फील गुड’ वातावरणात लोकसभेची निवडणूक पार पडली तर रालोआच्या आजच्या सदस्यसंख्येत ३८ जागांची घट होऊन ती ३०१ पर्यंत येईल असेही हे सर्वेक्षण सांगते. त्याचबरोबर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआच्या जागांमध्ये ४६ जागांची वाढ होईल असाही या सर्वेक्षणाचा एक निष्कर्ष आहे. म्हणजे ‘फील गुड’ येथेही आणि तेथेही! पण मोदी आणि त्यांच्या सरकारने खुशालून जावे अशी आणखीही एक बाब समोर आली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीच्या शर्यतीत सध्या आघाडी प्राप्त केलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी एका चित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारताची वारेमाप स्तुती केली आहे. ‘इंडिया इज डुईंग ग्रेट’ पण त्याची कोणीच चर्चा करीत नाही, असे या महोदयांनी म्हटले आहे. पंतप्रधान झाल्यापासून नरेन्द्र मोदी यांनी त्यांचे सारे लक्ष विदेश भ्रमणावर केन्द्रीत केल्याचा हा परिणाम म्हणायचा? पण हे ट्रम्प महोदय अत्यंत वाचाळ आणि बेभरवशाचे मानले जातात. संपूर्ण जग नि:मुस्लीम करण्याची वल्गना करणारे हेच ते सद्गृहस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी प्रशंसा केली म्हणून हुरळून जावे असे त्यात काहीही नाही. तोच प्रकार खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा. विशेषत: देशात कुठेही आणि कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या की खासगी सर्वेक्षणांचे पेव फुटत असते. त्यांच्या निष्कर्षांचे पितळही अधूनमधून उघडे पडत असते. पण अलीकडेच पार पडलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीविषयी केल्या गेलेल्या सर्वेक्षणांच्या निष्कर्षांचे तेथील मतदारांनी अक्षरश: धिंडवडेच काढले होते. त्यातून मोदी सरकारच्या कारभारासंबंधी सव्वाशे कोटी जनता आणि साधारणपणे साठ कोटी मतदारांच्या वतीने काही हजारातील लोकानी व्यक्त केलेला अभिप्राय प्रातिनिधिक कसा काय समजला जाऊ शकतो? तरीदेखील मियाँ गालिब यांचे शब्द उधारीत घेऊन ‘दिल के बहलाने के लिये खयाल अच्छा है’ असे म्हणता येऊ शकेल.