शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

पुनश्च ‘फील गुड’!

By admin | Updated: January 28, 2016 03:31 IST

केन्द्रातील रालोआच्या पूर्वीच्या राजवटीवर आधारित ‘फील गुड’च्या प्रचाराचा दणका या आघाडीने उडवूनदेखील देशातील मतदारांनी तो फारसा मनावर न घेऊन २००४च्या निवडणुकीत

केन्द्रातील रालोआच्या पूर्वीच्या राजवटीवर आधारित ‘फील गुड’च्या प्रचाराचा दणका या आघाडीने उडवूनदेखील देशातील मतदारांनी तो फारसा मनावर न घेऊन २००४च्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआला सत्तेवर आणले होते. तेव्हांच्या प्रचारातील फील गुडचा संदर्भ मतदारांशी होता. म्हणजे मतदारांना ‘गुड’ जाणवत असल्याचा रालोआ आणि खरे तर भाजपाचा दावा होता. पण अलीकडेच एका खासगी संस्थेने जे सर्वेक्षण केले आहे त्याचे निष्कर्ष खुद्द रालोआ आणि विशेषत: भाजपा आणि पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना ‘गुड’ ‘फील’ व्हावे असे आहेत. सर्वेक्षणात देशातील ज्या लोकाना सहभागी करुन घेतले गेले त्यातील ४६ टक्के लोकांच्या मते म्हणे देशाचा सध्याचा कारभार ‘सरासरीपेक्षा खूपच वरचा’ आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे ४६ टक्के लोक मोदी सरकारच्या कारभारावर खूष असताना त्याहून अधिक म्हणजे ५४ टक्के लोक खुद्द मोदी यांच्याच प्रेमात पडल्याचे सर्वेक्षणातून आढळून आले आहे. तरीदेखील आजच्या या ‘फील गुड’ वातावरणात लोकसभेची निवडणूक पार पडली तर रालोआच्या आजच्या सदस्यसंख्येत ३८ जागांची घट होऊन ती ३०१ पर्यंत येईल असेही हे सर्वेक्षण सांगते. त्याचबरोबर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआच्या जागांमध्ये ४६ जागांची वाढ होईल असाही या सर्वेक्षणाचा एक निष्कर्ष आहे. म्हणजे ‘फील गुड’ येथेही आणि तेथेही! पण मोदी आणि त्यांच्या सरकारने खुशालून जावे अशी आणखीही एक बाब समोर आली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीच्या शर्यतीत सध्या आघाडी प्राप्त केलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी एका चित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारताची वारेमाप स्तुती केली आहे. ‘इंडिया इज डुईंग ग्रेट’ पण त्याची कोणीच चर्चा करीत नाही, असे या महोदयांनी म्हटले आहे. पंतप्रधान झाल्यापासून नरेन्द्र मोदी यांनी त्यांचे सारे लक्ष विदेश भ्रमणावर केन्द्रीत केल्याचा हा परिणाम म्हणायचा? पण हे ट्रम्प महोदय अत्यंत वाचाळ आणि बेभरवशाचे मानले जातात. संपूर्ण जग नि:मुस्लीम करण्याची वल्गना करणारे हेच ते सद्गृहस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी प्रशंसा केली म्हणून हुरळून जावे असे त्यात काहीही नाही. तोच प्रकार खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा. विशेषत: देशात कुठेही आणि कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या की खासगी सर्वेक्षणांचे पेव फुटत असते. त्यांच्या निष्कर्षांचे पितळही अधूनमधून उघडे पडत असते. पण अलीकडेच पार पडलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीविषयी केल्या गेलेल्या सर्वेक्षणांच्या निष्कर्षांचे तेथील मतदारांनी अक्षरश: धिंडवडेच काढले होते. त्यातून मोदी सरकारच्या कारभारासंबंधी सव्वाशे कोटी जनता आणि साधारणपणे साठ कोटी मतदारांच्या वतीने काही हजारातील लोकानी व्यक्त केलेला अभिप्राय प्रातिनिधिक कसा काय समजला जाऊ शकतो? तरीदेखील मियाँ गालिब यांचे शब्द उधारीत घेऊन ‘दिल के बहलाने के लिये खयाल अच्छा है’ असे म्हणता येऊ शकेल.