शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

भविष्यवेधी लेखक

By admin | Updated: July 3, 2016 02:45 IST

गेली पाच दशके ज्यांच्या पुस्तकांनी वाचकांवर गारुड केले, त्या अ‍ॅल्विन टॉफ्लर या लेखकाचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या भविष्यवेधी पुस्तकांनी वाचकांना नुसते खिळवून ठेवले नाही,

- विनायक पात्रुडकरगेली पाच दशके ज्यांच्या पुस्तकांनी वाचकांवर गारुड केले, त्या अ‍ॅल्विन टॉफ्लर या लेखकाचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या भविष्यवेधी पुस्तकांनी वाचकांना नुसते खिळवून ठेवले नाही, तर त्याची परिणतीही अनुभवता आली. बदलत्या नागरी वसाहतीवर नव्या संक्रमणांचा आघात कसा होत जाणार आहे, याचे तंतोतंत वर्णन टॉफ्लर यांच्या पुस्तकांमधून दृष्टिपथात येते.तोकुणी बुवा, संत किंवा योगी नव्हता; तरीही तो जे लिहीत गेला तसंच जग घडत गेलं; जणू जगाची पावलं कुठं पडणार आहेत याची जाणीव त्याला आधीच झाली होती! त्याची पुस्तकं वाचून जगभरात नवे उद्योगपती तयार झाले. अनेक देशांचे नेतेही त्याची पुस्तके वाचत आणि बदलत्या काळाचा आढावा घेत. विलक्षण प्रतिभा लाभलेल्या अ‍ॅल्विन टॉफ्लर या लेखकाचे नाव ग्रंथप्रेमींना माहीत नसणारा कदाचित सापडणार नाही. कुठलाही लेखक त्याच्या लिखाणाने वाचकांचे आयुष्य समृद्ध करीत असतो. टॉफ्लरने केवळ आयुष्य समृद्ध केले नाही, तर समृद्ध आयुष्याची दिशाही स्पष्ट केली. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांचे ते ‘गुरू’ झाले. ज्ञानाधिष्ठित समाजरचना नेमकी कशी असते? शारीरिक श्रमावर आधारलेली औद्योगिक रचना बदलून त्याचे रूपांतर माहिती तंत्रज्ञानात कसे होईल, याचे भाकीत ४० वर्षांपूर्वीच टॉफ्लर यांनी करून ठेवले होते. आपले आयुष्य संगणक व्यापून टाकणार आहे. नवे युग हे डिजिटल वर्ल्ड कसे असेल, याचे भाकीत त्यांनी त्यांच्या पुस्तकातून अतिशय बारकाईने केले होते. तंत्रज्ञानाच्या वेगामुळे विविध समाजघटकांवर, त्यांच्या सांस्कृतिक जीवनावर कसे आघात होतील, याचे साद्यंत वर्णन टॉफ्लर यांच्या पुस्तकांतून आढळले. त्यांची पत्नी हैदी यांच्याबरोबर त्यांनी चेंजेस इन सोसायटी, थर्ड वेव्ह, पॉवर शिफ्ट अशी पुस्तके लिहिली, ज्यांच्या लाखो प्रती जगभर खपल्या, कितीतरी भाषांमध्ये त्यांचे भाषांतर झाले. १९८०मध्ये त्यांनी ‘थर्ड वेव्ह’ हा ग्रंथ लिहिला. त्यात क्लोनिंग, वैयक्तिक संगणक, इंटरनेट विश्व, केबल टीव्ही, मोबाइल माध्यम यामुळे मानवी जीवन कसे बदलून जाईल याचा आढावा घेतला होता. त्या वेळी या गोष्टी अशक्य वाटत होत्या. आज जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे पाहतो, तेव्हा नागरी आयुष्य या तंत्रज्ञानांनी किती व्यापून गेलेय, हे लक्षात येते. आज चुकून जर आपण घरी मोबाइल विसरून गेलो तर शरीराचा एखादा अवयव गायब झाल्याची भावना निर्माण होते. १९६०मध्ये लिहिलेल्या ‘फ्युचर शॉक’ पुस्तकाने अ‍ॅल्विन टॉफ्लर हे नाव जगभर माहीत झाले. या पुस्तकाच्या ६० लाख प्रती खपल्या. त्या वेळेचा हा विक्रमच होता. १९८०मध्ये त्यांनी हाच भविष्यवेधी दृष्टिकोन कायम ठेवत ‘थर्ड वेव्ह’ हा ग्रंथ प्रकाशित केला. शेती आणि उद्योग या दोन लाटांनी मानवी आयुष्याला नवे वळण मिळाले. परंतु माहिती - तंत्रज्ञानाच्या तिसऱ्या लाटेमुळे मानवी विचारप्रणालीत आमूलाग्र बदल घडवून आणला गेला. त्याचा वेध त्यांनी ‘थर्ड वेव्ह’ या ग्रंथातून घेतला होता. इंटरनेट, मोबाइल आणि डिजिटलमुळे मनुष्य माहितीच्या मायाजालातून प्रवास करेल. माहिती हेच जगण्याचे सूत्र राहील आणि तीच त्रासदायक गोष्ट ठरेल, असेही टॉफ्लर यांनी लिहून ठेवले आहे. आज साक्षर - निरक्षरतेच्या व्याख्या बदलल्या आहेत. लिहिता-वाचता येणारा मनुष्य साक्षर, ही रचनाही बदलली आहे. ज्याला संगणक येत नाही तो ‘संगणक निरक्षर’ अशी संकल्पना दृढ झाली आहे. नव्या तंत्रज्ञानाशी जो जुळवून घेत नाही तो जगातून दूर फेकला जाईल, अशी रचनाच तयार होत गेली. त्यामुळे माहिती युग अधिक परिणामकारक ठरले. या युगात मनुष्य अधिक गोंधळलेला राहील. धर्म, राष्ट्र, समाज, कुटुंब, व्यवसाय या साऱ्यावर नव्या माहिती युगाचे परिणाम दिसतील. त्याच्या ठरावीक चौकटीतल्या विचारप्रणालीला त्यामुळे जोरदार धक्का बसेल, असे वक्तव्य टॉफ्लरने ‘फ्लूचर शॉक’मध्ये केले होते. त्याने व्यक्त केलेले सर्व धोके आपण अनुभवत आहोत. अमेरिका आॅन लाइन (एओएल) या बड्या कंपनीचे संस्थापक स्टीव्ह केस असो वा सीएनएन संस्थापक टेड टर्नर असो सर्व जणच टॉफ्लर यांच्या भविष्यवेधी लिखाणाचे चाहते होते. या बड्या कंपन्या स्थापन करताना त्यांच्या मनात कुठेतही अ‍ॅल्विन टॉफ्लर यांची भविष्यवाणी असायची असे या दोघांनी जाहीरपणे कबूलही केले आहे. त्यामुळे जगभर प्रभावी नेते घडविणारा लेखक म्हणून अ‍ॅल्विन टॉफ्लर यांची ख्याती होती. २७ जूनला त्यांनी अमेरिकेतील त्यांच्या निवासस्थानी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या गं्रथांनी आजच्या जगाचा वेध घेतला खरा; पण त्यांनी जे सांस्कृतिक दुष्परिणाम सांगितले त्याकडे मात्र आपण सोईस्कर दुर्लक्ष केले. विविधतेतून घडलेल्या मानवी संस्कृतीवर केवळ माहितीच्या आधारे भिन्न संस्कृती लादण्याचा प्रयत्न हा मानवतेला घातकच ठरणारा आहे. याची जाणीव या ‘उद्या’च्या लेखकाने आधीच करून दिली होती. तरीही प्रगतीचा आणि विकासाचा वेग पकडणाऱ्या मनुष्यसमूहाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने सांस्कृतिक आक्रमण होतच राहिले. डिजिटल वर्ल्डनंतरचा प्रवास कसा असेल याची भविष्यवाणी अजूनतरी कुठल्याही लेखकाने केल्याचे वाचनात नाही. मात्र सांस्कृतिक आक्रमणाचे दुष्परिणाम पुढची काही दशके आपल्याला भोगायला लागतील यात शंका नाही. अ‍ॅल्विन टॉफ्लरसारख्या प्रतिभावानाने ही ऐतिहासिक साहित्यकृती निर्माण करून चमत्कारच केला. त्याच्या भविष्यवेधी साहित्यकृतींना आणि प्रतिभेला मन:पूर्वक सलाम. ज्ञानाधिष्ठित समाजरचना नेमकी कशी असते? शारीरिक श्रमावर आधारलेली औद्योगिक रचना बदलून त्याचे रूपांतर माहिती तंत्रज्ञानात कसे होईल, याचे भाकीत ४० वर्षांपूर्वीच टॉफ्लर यांनी करून ठेवले होते.1990 या साली लिहिलेल्या ‘पॉवर शिफ्ट’ या पुस्तकातून, ज्याच्याकडे जगाची खूप माहिती आहे, तेच जगावर राज्य करतील असे भाकीत टॉफ्लर यांनी वर्तविले होते. आज गुगल, फेसबुक, टिष्ट्वटर यांनी आपले आयुष्य किती वेढलेले आहे, याचा अंदाज आला तरी पुरे. रशियाचे तत्कालीन अध्यक्ष मिखाइल गोर्बाचेव्ह असो अथवा चीनचे राष्ट्राध्यक्ष झाओ झिआंग सारेच टॉपर अ‍ॅल्विन टॉफ्लरच्या लिखाणाचे चाहते होते.टॉफ्लर स्वत:ही शेकडो व्याख्याने देत. जगभर त्यांचा चाहतावर्ग विखुरलेला होता. न्यू यॉर्कमध्ये जन्मलेल्या टॉफ्लर यांची सुरुवातीची कारकिर्द पत्रकारितेची होती. ‘फॉर्च्युन’ नियतकालिकातील त्यांचे कॉलम खूप गाजले. त्यानंतर आयबीएमने त्यांना संगणकाचे सामाजिक आणि संस्था, संघटनांवर होणारे परिणाम याविषयी संशोधनात्मक लिखाण करण्यास सांगितले. एटी अ‍ॅण्ड टीसारखी कंपनी त्यांचे सल्ले घ्यायची.

 

(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत.)