शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
4
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
5
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
6
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
7
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
8
"ही कुणाची चप्पल घातलीस?" आईने बदललेली चप्पल विचारताच गतिमंद मुलीने सांगितला झालेल्या अत्याचाराचा थरार !
9
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
10
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
11
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
12
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
13
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
14
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
15
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
16
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
17
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
18
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
19
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
20
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा

प्रबळ इच्छाशक्तीचा पुरावा

By admin | Updated: June 6, 2017 04:26 IST

२ आॅगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. दोन एसटी बस आणि एक तवेरा गाडीतील तब्बल ३९ प्रवाशांवर काळाने झडप घातली होती

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पूल कोसळलेल्या घटनेला २ आॅगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. दोन एसटी बस आणि एक तवेरा गाडीतील तब्बल ३९ प्रवाशांवर काळाने झडप घातली होती. महाराष्ट्रासह देशाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेने सर्वच ब्रिटिशकालीन पुलाचे आॅडिट करण्यास सरकारला भाग पडले होते. केंद्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत १८० दिवसात नवीन पूल बांधण्याची घोषणा केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे आव्हान केवळ १६५ दिवसात लीलया पेलले. ५ जूनला या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर, कोणतेही काम कठीण नसते याचा जिवंत पुरावा केंद्र सरकारने दिला आहे. सावित्री पूल दुर्घटनेतील २ आॅगस्ट २०१६ हा दिवस इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदविला जाईल. परंतु १८० या मर्यादित दिवसांच्या आधी तो पूल नव्याने बांधून वाहतुकीसाठी खुला करणे हाही दिवस इतिहासामध्ये सोनेरी अक्षरांनी लिहिण्यासारखाच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पूल हा फक्त दोन गावांना जोडत नाही तर, दोन्ही तीरांच्या परिसरांचा शाश्वत विकासाचा तो प्रेरक असतो. त्यामुळे पुलाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोकणाचे महत्त्व दिवसागणिक वाढत आहे. मुंबई-गोवा हा महामार्ग देशाची आर्थिक राजधानी मुंबई तसेच दक्षिणेतील राज्यांना जोडण्याचे काम करतो. या मार्गावरून १९ हजार वाहनांची वाहतूक होते. म्हणूनच एका भरभक्कम आणि वैशिष्ट्यपूर्ण पुलाची निर्मिती आवश्यक होती. गडकरींचे आश्वासक पाऊल आणि सरकारच्या धडक कार्यक्र मामुळे पुलाच्या सर्वच तांत्रिक बाबींना गती मिळाली आणि पुलाची उभारणी द्रुतगतीने झाली. सरकारने ठरवले तर, काहीही करू शकते हे यातून दिसून आले. परंतु देशात आणि राज्यामध्ये मोठ्या संख्येने पूल आहेत, ते केवळ कागदावर, आजही गडकरींच्या धाडसी निर्णयाच्या तेही प्रतीक्षेत आहेत. त्यांचीही तातडीने उभारणी गरजेची आहे. मुंबई-गोवा या चार पदरी महामार्गाच्या कामाला बरीच वर्षे लागली आहेत. त्याकडेही सरकारने लक्ष दिल्यास अपघात रोखता येतील वेळेचीही बचत होणार आहे. गडकरी यांनी याकडेही लक्ष देऊन याचेही काम युद्धपातळीवर करावे, अशी तमाम कोकणवासीयांची इच्छा आहे.