शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

प्रबळ इच्छाशक्तीचा पुरावा

By admin | Updated: June 6, 2017 04:26 IST

२ आॅगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. दोन एसटी बस आणि एक तवेरा गाडीतील तब्बल ३९ प्रवाशांवर काळाने झडप घातली होती

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पूल कोसळलेल्या घटनेला २ आॅगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. दोन एसटी बस आणि एक तवेरा गाडीतील तब्बल ३९ प्रवाशांवर काळाने झडप घातली होती. महाराष्ट्रासह देशाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेने सर्वच ब्रिटिशकालीन पुलाचे आॅडिट करण्यास सरकारला भाग पडले होते. केंद्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत १८० दिवसात नवीन पूल बांधण्याची घोषणा केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे आव्हान केवळ १६५ दिवसात लीलया पेलले. ५ जूनला या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर, कोणतेही काम कठीण नसते याचा जिवंत पुरावा केंद्र सरकारने दिला आहे. सावित्री पूल दुर्घटनेतील २ आॅगस्ट २०१६ हा दिवस इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदविला जाईल. परंतु १८० या मर्यादित दिवसांच्या आधी तो पूल नव्याने बांधून वाहतुकीसाठी खुला करणे हाही दिवस इतिहासामध्ये सोनेरी अक्षरांनी लिहिण्यासारखाच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पूल हा फक्त दोन गावांना जोडत नाही तर, दोन्ही तीरांच्या परिसरांचा शाश्वत विकासाचा तो प्रेरक असतो. त्यामुळे पुलाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोकणाचे महत्त्व दिवसागणिक वाढत आहे. मुंबई-गोवा हा महामार्ग देशाची आर्थिक राजधानी मुंबई तसेच दक्षिणेतील राज्यांना जोडण्याचे काम करतो. या मार्गावरून १९ हजार वाहनांची वाहतूक होते. म्हणूनच एका भरभक्कम आणि वैशिष्ट्यपूर्ण पुलाची निर्मिती आवश्यक होती. गडकरींचे आश्वासक पाऊल आणि सरकारच्या धडक कार्यक्र मामुळे पुलाच्या सर्वच तांत्रिक बाबींना गती मिळाली आणि पुलाची उभारणी द्रुतगतीने झाली. सरकारने ठरवले तर, काहीही करू शकते हे यातून दिसून आले. परंतु देशात आणि राज्यामध्ये मोठ्या संख्येने पूल आहेत, ते केवळ कागदावर, आजही गडकरींच्या धाडसी निर्णयाच्या तेही प्रतीक्षेत आहेत. त्यांचीही तातडीने उभारणी गरजेची आहे. मुंबई-गोवा या चार पदरी महामार्गाच्या कामाला बरीच वर्षे लागली आहेत. त्याकडेही सरकारने लक्ष दिल्यास अपघात रोखता येतील वेळेचीही बचत होणार आहे. गडकरी यांनी याकडेही लक्ष देऊन याचेही काम युद्धपातळीवर करावे, अशी तमाम कोकणवासीयांची इच्छा आहे.