शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

प्रबळ इच्छाशक्तीचा पुरावा

By admin | Updated: June 6, 2017 04:26 IST

२ आॅगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. दोन एसटी बस आणि एक तवेरा गाडीतील तब्बल ३९ प्रवाशांवर काळाने झडप घातली होती

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पूल कोसळलेल्या घटनेला २ आॅगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. दोन एसटी बस आणि एक तवेरा गाडीतील तब्बल ३९ प्रवाशांवर काळाने झडप घातली होती. महाराष्ट्रासह देशाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेने सर्वच ब्रिटिशकालीन पुलाचे आॅडिट करण्यास सरकारला भाग पडले होते. केंद्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत १८० दिवसात नवीन पूल बांधण्याची घोषणा केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे आव्हान केवळ १६५ दिवसात लीलया पेलले. ५ जूनला या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर, कोणतेही काम कठीण नसते याचा जिवंत पुरावा केंद्र सरकारने दिला आहे. सावित्री पूल दुर्घटनेतील २ आॅगस्ट २०१६ हा दिवस इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदविला जाईल. परंतु १८० या मर्यादित दिवसांच्या आधी तो पूल नव्याने बांधून वाहतुकीसाठी खुला करणे हाही दिवस इतिहासामध्ये सोनेरी अक्षरांनी लिहिण्यासारखाच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पूल हा फक्त दोन गावांना जोडत नाही तर, दोन्ही तीरांच्या परिसरांचा शाश्वत विकासाचा तो प्रेरक असतो. त्यामुळे पुलाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोकणाचे महत्त्व दिवसागणिक वाढत आहे. मुंबई-गोवा हा महामार्ग देशाची आर्थिक राजधानी मुंबई तसेच दक्षिणेतील राज्यांना जोडण्याचे काम करतो. या मार्गावरून १९ हजार वाहनांची वाहतूक होते. म्हणूनच एका भरभक्कम आणि वैशिष्ट्यपूर्ण पुलाची निर्मिती आवश्यक होती. गडकरींचे आश्वासक पाऊल आणि सरकारच्या धडक कार्यक्र मामुळे पुलाच्या सर्वच तांत्रिक बाबींना गती मिळाली आणि पुलाची उभारणी द्रुतगतीने झाली. सरकारने ठरवले तर, काहीही करू शकते हे यातून दिसून आले. परंतु देशात आणि राज्यामध्ये मोठ्या संख्येने पूल आहेत, ते केवळ कागदावर, आजही गडकरींच्या धाडसी निर्णयाच्या तेही प्रतीक्षेत आहेत. त्यांचीही तातडीने उभारणी गरजेची आहे. मुंबई-गोवा या चार पदरी महामार्गाच्या कामाला बरीच वर्षे लागली आहेत. त्याकडेही सरकारने लक्ष दिल्यास अपघात रोखता येतील वेळेचीही बचत होणार आहे. गडकरी यांनी याकडेही लक्ष देऊन याचेही काम युद्धपातळीवर करावे, अशी तमाम कोकणवासीयांची इच्छा आहे.