शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

प्रकल्पग्रस्तांचा आक्रोश

By admin | Updated: March 16, 2017 01:06 IST

प्रकल्पग्रस्तांना सुखाने जगता येत नसेल तर शासन व प्रशासनालाही सुखाने राहण्याचा अधिकार नाही, अशी घोषणा देत नवी मुंबईतील हजारो भूमिपुत्रांनी कोकणभवनवर धडक दिली.

प्रकल्पग्रस्तांना सुखाने जगता येत नसेल तर शासन व प्रशासनालाही सुखाने राहण्याचा अधिकार नाही, अशी घोषणा देत नवी मुंबईतील हजारो भूमिपुत्रांनी कोकणभवनवर धडक दिली. पाच दशके अन्याय सहन केला. प्रश्न सोडविण्याऐवजी कोरडी आश्वासनेच पदरात पडली. पण आता सर्व प्रश्न सुटेपर्यंत माघार नाहीच असा इशारा देत भूमिपुत्रांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. सिडको व एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांनी नवी मुंबईत आंदोलन सुरू केले असले तरी त्यानिमित्ताने सर्वच प्रकल्पबाधीतांची व्यथाच समोर आली आहे. सरकार आश्वासन देते; पण त्याची पूर्तता करत नसल्याने आधी पुनर्वसन व नंतरच प्रकल्प अशी भूमिका शेतकरी घेऊ लागले आहेत. सद्यस्थितीमध्ये जमीन संपादनाअभावी देशातील तब्बल ८०४ प्रकल्प रखडले असून, त्यामध्ये सर्वाधिक १२५ प्रकल्प महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील सर्वच सिंचन प्रकल्प रखडले आहेत. हिंजवडी, तळेगाव, रांजणगाव, कार्लामधील आयटी पार्क व एमआयडीसी प्रकल्प रखडले आहेत. गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होऊ शकत नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी झालेल्या विरोधामुळे तब्बल १० वर्ष हा प्रकल्प उशिरा सुरू होत आहे. सध्या नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाबाबतही भूमिपुत्रांनी आंदोलनाची हाक दिली आहे. धरण, महामार्ग, विमानतळ, एमआयडीसी व रेल्वेसारख्या प्रकल्पांसाठी सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करते. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन केले जाते; पण त्यांचे पुनर्वसन करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नवी मुंबईमध्ये १९६५ मध्ये एमआयडीसी व १९७० मध्ये शहर वसविण्यासाठी शंभर टक्के जमिनीचे संपादन केले. पण पाच दशकानंतरही पुनर्वसन झाले नसल्याने हजारो प्रकल्पग्रस्त रस्त्यावर आले आहेत. शासनाने पुनर्वसनास प्राधान्य दिले नाही तर भविष्यातील एकही महत्वाचा प्रकल्प वेळेत पूर्ण होणार नाही व त्यामुळे महाराष्ट्र विकासामध्ये पिछाडीवर जाण्याची भीती व्यक्त होत असून, यातून हा मूलभूत प्रश्न शासन कसा हाताळते यावर राज्याच्या विकासाचे भवितव्य अवलंबून आहे.