शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांचा आक्रोश

By admin | Updated: March 16, 2017 01:06 IST

प्रकल्पग्रस्तांना सुखाने जगता येत नसेल तर शासन व प्रशासनालाही सुखाने राहण्याचा अधिकार नाही, अशी घोषणा देत नवी मुंबईतील हजारो भूमिपुत्रांनी कोकणभवनवर धडक दिली.

प्रकल्पग्रस्तांना सुखाने जगता येत नसेल तर शासन व प्रशासनालाही सुखाने राहण्याचा अधिकार नाही, अशी घोषणा देत नवी मुंबईतील हजारो भूमिपुत्रांनी कोकणभवनवर धडक दिली. पाच दशके अन्याय सहन केला. प्रश्न सोडविण्याऐवजी कोरडी आश्वासनेच पदरात पडली. पण आता सर्व प्रश्न सुटेपर्यंत माघार नाहीच असा इशारा देत भूमिपुत्रांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. सिडको व एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांनी नवी मुंबईत आंदोलन सुरू केले असले तरी त्यानिमित्ताने सर्वच प्रकल्पबाधीतांची व्यथाच समोर आली आहे. सरकार आश्वासन देते; पण त्याची पूर्तता करत नसल्याने आधी पुनर्वसन व नंतरच प्रकल्प अशी भूमिका शेतकरी घेऊ लागले आहेत. सद्यस्थितीमध्ये जमीन संपादनाअभावी देशातील तब्बल ८०४ प्रकल्प रखडले असून, त्यामध्ये सर्वाधिक १२५ प्रकल्प महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील सर्वच सिंचन प्रकल्प रखडले आहेत. हिंजवडी, तळेगाव, रांजणगाव, कार्लामधील आयटी पार्क व एमआयडीसी प्रकल्प रखडले आहेत. गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होऊ शकत नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी झालेल्या विरोधामुळे तब्बल १० वर्ष हा प्रकल्प उशिरा सुरू होत आहे. सध्या नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाबाबतही भूमिपुत्रांनी आंदोलनाची हाक दिली आहे. धरण, महामार्ग, विमानतळ, एमआयडीसी व रेल्वेसारख्या प्रकल्पांसाठी सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करते. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन केले जाते; पण त्यांचे पुनर्वसन करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नवी मुंबईमध्ये १९६५ मध्ये एमआयडीसी व १९७० मध्ये शहर वसविण्यासाठी शंभर टक्के जमिनीचे संपादन केले. पण पाच दशकानंतरही पुनर्वसन झाले नसल्याने हजारो प्रकल्पग्रस्त रस्त्यावर आले आहेत. शासनाने पुनर्वसनास प्राधान्य दिले नाही तर भविष्यातील एकही महत्वाचा प्रकल्प वेळेत पूर्ण होणार नाही व त्यामुळे महाराष्ट्र विकासामध्ये पिछाडीवर जाण्याची भीती व्यक्त होत असून, यातून हा मूलभूत प्रश्न शासन कसा हाताळते यावर राज्याच्या विकासाचे भवितव्य अवलंबून आहे.