शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

करातांची सरशी

By admin | Updated: June 1, 2016 03:20 IST

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी सरचिटणीस प्रकाश करात आणि त्यांचे विद्यमान उत्तराधिकारी सीताराम येचुरी यांच्या दरम्यान एक छुपा संघर्ष असल्याची बाब नवी नाही.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी सरचिटणीस प्रकाश करात आणि त्यांचे विद्यमान उत्तराधिकारी सीताराम येचुरी यांच्या दरम्यान एक छुपा संघर्ष असल्याची बाब नवी नाही. ढोबळमानाने करात परंपरावादी तर येचुरी समन्वयवादी असल्याचेही म्हणता येईल. पण तूर्तास येचुरी एकप्रकारे पक्षप्रभारी असूनही करात यांची भूमिका पक्षाच्या पोलिट ब्युरोने स्वीकारली असल्याने त्यांची सरशी झाली असल्याचे दिसते. अर्थात त्याला कारणीभूत आहे पश्चिम बंगाल विधानसभेची नुकतीच पार पडलेली निवडणूक. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेसबरोबर समझोता केला होता. मुळात दक्षिणेकडील केरळात काँग्रेसच्या विरोधात आणि बंगालात मात्र त्याच काँग्रेसच्या खांद्याला खांदा हा प्रकार मतदारांना गृहीत धरणारा होता. वर्षानुवर्षे तृणमूल आणि काँग्रेससह अन्य पक्षदेखील जो आरोप बंगालात प्रदीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या डाव्या आघाडीच्या विरोधात करीत आले तोच दहशतवादाचा आरोप तृणमूलच्या विरुद्ध करुन त्याचा मुकाबला करण्यासाठी कम्युनिस्टांनी काँग्रेसशी मैत्री केली. पण तरीही या दोहोंना ममतांची सत्तेकडील वाट रोखता आली नाही. ती रोखता आली असती आणि डावे अधिक काँग्रेस यांची सरशी झाली असती तर कदाचित पोलिट ब्युरोमध्ये येचुरींचा सत्कारच केला गेला असता. पण तसे झाले नाही. साहजिकच येचुरींच्या भूमिकेचे विरोधक आणि करातांचे पाठीराखे यांनी पक्षाच्या चुकीच्या भूमिकेबद्दल वादळी चर्चा घडवून आणली. प्रकाश करात हे मूलत: अत्यंत कर्मठ म्हणून ओळखले जातात आणि काँग्रेससह कोणत्याही अन्य राजकीय पक्षासोबतचा प्रवास त्यांना मान्य नाही. येचुरी यांना मात्र तथाकथित जातीयवादी पक्षांना नामोहरम करण्यासाठी सर्व निधर्मी पक्षांनी एकत्रित व्हावे असे वाटत असते. पण त्यांचे असे वाटणे निदान आज तरी पक्षाने अस्वीकृत केले आहे. त्याचमुळे पोलिट ब्युरोच्या दोन दिवसीय बैठकीनंतर पक्षाने जे निवेदन प्रसिद्ध केले आहे त्यात असे स्वच्छपणे म्हटले आहे की काँग्रेससह कोणत्याही पक्षाबरोबर समझोता न करण्याचा जो निर्णय पक्षाच्या केन्द्रीय समितीने अगोदरच घेऊन ठेवला आहे त्या निर्णयाशी अलीकडच्या निवडणुकांबाबत पक्षाने घेतलेला निर्णय अजिबातच सुसंगत नव्हता. पक्षाच्या बंगाल शाखेने निवडणूक लढविताना साऱ्या मर्यादा पार केल्या अशी टीका करताना सुहासिनी अली यांनी तर असेही म्हटले की पक्षाने स्वबळ अजमावणे योग्य झाले असते.