शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

करातांची सरशी

By admin | Updated: June 1, 2016 03:20 IST

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी सरचिटणीस प्रकाश करात आणि त्यांचे विद्यमान उत्तराधिकारी सीताराम येचुरी यांच्या दरम्यान एक छुपा संघर्ष असल्याची बाब नवी नाही.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी सरचिटणीस प्रकाश करात आणि त्यांचे विद्यमान उत्तराधिकारी सीताराम येचुरी यांच्या दरम्यान एक छुपा संघर्ष असल्याची बाब नवी नाही. ढोबळमानाने करात परंपरावादी तर येचुरी समन्वयवादी असल्याचेही म्हणता येईल. पण तूर्तास येचुरी एकप्रकारे पक्षप्रभारी असूनही करात यांची भूमिका पक्षाच्या पोलिट ब्युरोने स्वीकारली असल्याने त्यांची सरशी झाली असल्याचे दिसते. अर्थात त्याला कारणीभूत आहे पश्चिम बंगाल विधानसभेची नुकतीच पार पडलेली निवडणूक. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेसबरोबर समझोता केला होता. मुळात दक्षिणेकडील केरळात काँग्रेसच्या विरोधात आणि बंगालात मात्र त्याच काँग्रेसच्या खांद्याला खांदा हा प्रकार मतदारांना गृहीत धरणारा होता. वर्षानुवर्षे तृणमूल आणि काँग्रेससह अन्य पक्षदेखील जो आरोप बंगालात प्रदीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या डाव्या आघाडीच्या विरोधात करीत आले तोच दहशतवादाचा आरोप तृणमूलच्या विरुद्ध करुन त्याचा मुकाबला करण्यासाठी कम्युनिस्टांनी काँग्रेसशी मैत्री केली. पण तरीही या दोहोंना ममतांची सत्तेकडील वाट रोखता आली नाही. ती रोखता आली असती आणि डावे अधिक काँग्रेस यांची सरशी झाली असती तर कदाचित पोलिट ब्युरोमध्ये येचुरींचा सत्कारच केला गेला असता. पण तसे झाले नाही. साहजिकच येचुरींच्या भूमिकेचे विरोधक आणि करातांचे पाठीराखे यांनी पक्षाच्या चुकीच्या भूमिकेबद्दल वादळी चर्चा घडवून आणली. प्रकाश करात हे मूलत: अत्यंत कर्मठ म्हणून ओळखले जातात आणि काँग्रेससह कोणत्याही अन्य राजकीय पक्षासोबतचा प्रवास त्यांना मान्य नाही. येचुरी यांना मात्र तथाकथित जातीयवादी पक्षांना नामोहरम करण्यासाठी सर्व निधर्मी पक्षांनी एकत्रित व्हावे असे वाटत असते. पण त्यांचे असे वाटणे निदान आज तरी पक्षाने अस्वीकृत केले आहे. त्याचमुळे पोलिट ब्युरोच्या दोन दिवसीय बैठकीनंतर पक्षाने जे निवेदन प्रसिद्ध केले आहे त्यात असे स्वच्छपणे म्हटले आहे की काँग्रेससह कोणत्याही पक्षाबरोबर समझोता न करण्याचा जो निर्णय पक्षाच्या केन्द्रीय समितीने अगोदरच घेऊन ठेवला आहे त्या निर्णयाशी अलीकडच्या निवडणुकांबाबत पक्षाने घेतलेला निर्णय अजिबातच सुसंगत नव्हता. पक्षाच्या बंगाल शाखेने निवडणूक लढविताना साऱ्या मर्यादा पार केल्या अशी टीका करताना सुहासिनी अली यांनी तर असेही म्हटले की पक्षाने स्वबळ अजमावणे योग्य झाले असते.