शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

निवारण की प्रतिबंध

By admin | Updated: February 16, 2016 03:10 IST

भूज आणि लातूर येथील हाहाकारी भूकंपांनंतर देश पातळीवर ज्या विषयाची चर्चा सुरु झाली तो विषय म्हणजे आपत्ती निवारण.

भूज आणि लातूर येथील हाहाकारी भूकंपांनंतर देश पातळीवर ज्या विषयाची चर्चा सुरु झाली तो विषय म्हणजे आपत्ती निवारण. या विषयाची पुन्हा एकदा तीव्रतेने आठवण झाली, रविवारी मुंबईत घडलेल्या दुर्घटनेपायी. मेक इन इंडिया सप्ताहाच्या निमित्ताने मुंबईतील गिरगाव चौपाटीवर आयोजित सांस्कृतिक समारंभाच्या वेळी अचानक व्यासपीठाखाली आग पेटली आणि ती हाहा म्हणता वाऱ्याच्या वेगाने पसरली. या भीषण आगीत प्राणहानी झाली नाही पण वित्तहानी मात्र बरीच झाली असावी. दुर्घटना घडून गेल्यानंतर जे काही प्रसिद्ध झाले त्यानुसार त्या समारंभाच्या वेळी चुकून एखादी आपत्ती निर्माण झाली तर तिचे निवारण करण्याची चोख व्यवस्था राज्य सरकारने केली होती आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या व्यक्तिगत नियंत्रणाखाली म्हणे ती कार्यरत होती. कदाचित त्यामुळेच जीवितहानी टळली असे म्हणता येईल. पण मुळात आपत्ती निवारणाचा विचार करण्यापूर्वी किंवा तो करताना आधी आपत्ती प्रतिबंधाचा विचार का होत नाही हा यातून निर्माण झालेला प्रश्न. ज्या आपत्ती निसर्गनिर्मित असतात त्यांच्या बाबतीत प्रतिबंधाला वाव नसतो असे मानले जाते. तरीही आता भूकंप, चक्री वादळे, त्सुनामी यासारख्या आपत्तींची पूर्वसूचना मिळू लागली आहे. तरीही त्या टाळता येतातच असे नव्हे. पण ज्या आपत्ती मानवनिर्मित असतात त्या मात्र टाळता येणे सहजशक्य असते. हल्ली अगदी घरगुती विवाह समारंभापासून जाहीर सांस्कृतिक आणि तत्सम कार्यक्रम अगदी झगमगाटी वातावरणात पार पाडले जावेत आणि प्रेक्षकांच्या दृष्टीने ते चित्तचक्षुचमत्कारिक असावेत असा एक आग्रह धरला जातो. तसे व्हावे म्हणून जी साधनसामुग्री वापरली जाते ती अग्नीची अत्यंत सुलभ वाहक असते. त्यामुळे एखादी ठिणगीदेखील त्यांचा पेट घेण्यास कारणीभूत ठरत असते. झगमगाटी कार्यक्रम म्हटला की कृत्रिम दिव्यांची आणि त्यासाठी वायरी वा केबल्सच्या जंजाळाची उपस्थिती अगदी अनिवार्य ठरते. रविवारी मुंबईत जी आग लागली ती वायरींच्या जंजाळामुळे की व्यासपीठावरच केल्या गेलेल्या शोभेच्या दारुच्या आतषबाजीमुळे याची चौकशी केली जाईल. पण मुळात अशी आपत्ती टाळता येणे फार कठीण आहे असे नाही. परिणामत: निवारण करण्याची संधी मिळावी म्हणून आपत्तीस निमंत्रण देण्याऐवजी तिचा प्रतिबंध करणे केव्हांही अघिक सोपे आणि निर्धोक ठरु शकते.