शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

निवारण की प्रतिबंध

By admin | Updated: February 16, 2016 03:10 IST

भूज आणि लातूर येथील हाहाकारी भूकंपांनंतर देश पातळीवर ज्या विषयाची चर्चा सुरु झाली तो विषय म्हणजे आपत्ती निवारण.

भूज आणि लातूर येथील हाहाकारी भूकंपांनंतर देश पातळीवर ज्या विषयाची चर्चा सुरु झाली तो विषय म्हणजे आपत्ती निवारण. या विषयाची पुन्हा एकदा तीव्रतेने आठवण झाली, रविवारी मुंबईत घडलेल्या दुर्घटनेपायी. मेक इन इंडिया सप्ताहाच्या निमित्ताने मुंबईतील गिरगाव चौपाटीवर आयोजित सांस्कृतिक समारंभाच्या वेळी अचानक व्यासपीठाखाली आग पेटली आणि ती हाहा म्हणता वाऱ्याच्या वेगाने पसरली. या भीषण आगीत प्राणहानी झाली नाही पण वित्तहानी मात्र बरीच झाली असावी. दुर्घटना घडून गेल्यानंतर जे काही प्रसिद्ध झाले त्यानुसार त्या समारंभाच्या वेळी चुकून एखादी आपत्ती निर्माण झाली तर तिचे निवारण करण्याची चोख व्यवस्था राज्य सरकारने केली होती आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या व्यक्तिगत नियंत्रणाखाली म्हणे ती कार्यरत होती. कदाचित त्यामुळेच जीवितहानी टळली असे म्हणता येईल. पण मुळात आपत्ती निवारणाचा विचार करण्यापूर्वी किंवा तो करताना आधी आपत्ती प्रतिबंधाचा विचार का होत नाही हा यातून निर्माण झालेला प्रश्न. ज्या आपत्ती निसर्गनिर्मित असतात त्यांच्या बाबतीत प्रतिबंधाला वाव नसतो असे मानले जाते. तरीही आता भूकंप, चक्री वादळे, त्सुनामी यासारख्या आपत्तींची पूर्वसूचना मिळू लागली आहे. तरीही त्या टाळता येतातच असे नव्हे. पण ज्या आपत्ती मानवनिर्मित असतात त्या मात्र टाळता येणे सहजशक्य असते. हल्ली अगदी घरगुती विवाह समारंभापासून जाहीर सांस्कृतिक आणि तत्सम कार्यक्रम अगदी झगमगाटी वातावरणात पार पाडले जावेत आणि प्रेक्षकांच्या दृष्टीने ते चित्तचक्षुचमत्कारिक असावेत असा एक आग्रह धरला जातो. तसे व्हावे म्हणून जी साधनसामुग्री वापरली जाते ती अग्नीची अत्यंत सुलभ वाहक असते. त्यामुळे एखादी ठिणगीदेखील त्यांचा पेट घेण्यास कारणीभूत ठरत असते. झगमगाटी कार्यक्रम म्हटला की कृत्रिम दिव्यांची आणि त्यासाठी वायरी वा केबल्सच्या जंजाळाची उपस्थिती अगदी अनिवार्य ठरते. रविवारी मुंबईत जी आग लागली ती वायरींच्या जंजाळामुळे की व्यासपीठावरच केल्या गेलेल्या शोभेच्या दारुच्या आतषबाजीमुळे याची चौकशी केली जाईल. पण मुळात अशी आपत्ती टाळता येणे फार कठीण आहे असे नाही. परिणामत: निवारण करण्याची संधी मिळावी म्हणून आपत्तीस निमंत्रण देण्याऐवजी तिचा प्रतिबंध करणे केव्हांही अघिक सोपे आणि निर्धोक ठरु शकते.