शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरप्रदेशची तयारी

By admin | Updated: December 23, 2015 23:26 IST

बाबरी मशिदीच्या जागेवर भव्य राम मंदिर बनविण्याच्या उद्देशाने, राजस्थानातून दोन ट्रक भरून दगड अयोध्येत पोहचल्याच्या बातमीने, गेल्या अनेक दिवसांपासून थंड बस्त्यात पडलेला राम मंदिर निर्माणाचा मुद्दा

बाबरी मशिदीच्या जागेवर भव्य राम मंदिर बनविण्याच्या उद्देशाने, राजस्थानातून दोन ट्रक भरून दगड अयोध्येत पोहचल्याच्या बातमीने, गेल्या अनेक दिवसांपासून थंड बस्त्यात पडलेला राम मंदिर निर्माणाचा मुद्दा, पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या मुद्याच्या साहाय्याने राष्ट्रीय राजकारणातील एक ध्रुव म्हणून पुढे आलेल्या भारतीय जनता पक्षाने, लोकसभा निवडणुकीदरम्यान हा मुद्दा संपूर्णपणे गुंडाळून ठेवला होता. त्यानंतर पार पडलेल्या विविध विधानसभांच्या निवडणुकांदरम्यानही कुठेही या मुद्याची अजिबात चर्चा झाली नाही. असे असताना आता अचानक अयोध्येत दोन ट्रक भरून दगड पोहचल्याची बातमी येते, हे वरकरणी दिसते तेवढे साधे नक्कीच नाही. या बातमीचा थेट संबंध, तोंडावर आलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीशी, निश्चितपणे आहे. दिल्ली आणि बिहारमधील विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे सपाटून मार खाल्लेल्या भाजपासाठी उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक म्हणजे अक्षरश: जीवनमरणाचा प्रश्न आहे. भाजपाला कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकावीच लागेल. या निवडणुकीतील पराभव म्हणजे केंद्रातील भाजपा सरकारच्या पतनाची नांदी ठरण्याची दाट शक्यता आहे. भाजपा नेतृत्वाला आणि त्या पक्षाचा शक्तीस्त्रोत असलेल्या संघ परिवारालाही याची पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जिंकण्याचा चंग परिवार बांधणार आहे आणि त्यासाठीच घासून गुळगुळीत झालेले राम मंदिराचे नाणे पुन्हा एकदा चलनात आणण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील एकूण ७५ पैकी तब्बल ७१ जागा जिंकलेल्या पक्षाने असे घायकुतीला येणे, खरे म्हटले तर खूप आश्चर्यकारक आहे; पण लोकसभा निवडणुकीनंतर गंगेतून भरपूर पाणी वाहून गेल्याची भाजपा व संघ नेतृत्वाला जाणीव आहे. दिल्ली आणि बिहारप्रमाणेच उत्तर प्रदेशमध्येही भाजपासमोर दमदार स्थानिक नेतृत्वाच्या व संघटनात्मक बांधणीच्या अभावाचा गंभीर प्रश्न आ वासून उभा आहे. नरेंद्र मोदींच्या नावाचा व करिश्म्याचा वापर करून लोकसभा निवडणुकीत विजय मिळविणे वेगळे आणि विधानसभा निवडणूक वेगळी, याची दिल्ली व बिहारमधील निकालांमुळे भाजपा व संघ परिवाराला पुरेपूर कल्पना आली आहे. त्यामुळेच यावेळी केवळ नरेंद्र मोदींवर विसंबून न राहता, धार्मिक तेढ निर्माण करून त्यावर आपली पोळी शेकून घेण्याचा डाव दिसतो आहे आणि उत्तर प्रदेशात धार्मिक तेढ निर्माण करायची असल्यास राम मंदिरापेक्षा जास्त चांगला मुद्दा दुसरा कोणता असू शकतो? संघ परिवाराचा हा विचार कागदावर अगदी बिनतोड वाटू शकतो, फक्त अडचण एवढीच आहे, की गंगेतून लोकसभा निवडणुकीनंतर जेवढे पाणी वाहून गेले, त्याच्या किती तरी पट पाणी १९९२ नंतर वाहून गेले आहे!