शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

उत्तरप्रदेशची तयारी

By admin | Updated: December 23, 2015 23:26 IST

बाबरी मशिदीच्या जागेवर भव्य राम मंदिर बनविण्याच्या उद्देशाने, राजस्थानातून दोन ट्रक भरून दगड अयोध्येत पोहचल्याच्या बातमीने, गेल्या अनेक दिवसांपासून थंड बस्त्यात पडलेला राम मंदिर निर्माणाचा मुद्दा

बाबरी मशिदीच्या जागेवर भव्य राम मंदिर बनविण्याच्या उद्देशाने, राजस्थानातून दोन ट्रक भरून दगड अयोध्येत पोहचल्याच्या बातमीने, गेल्या अनेक दिवसांपासून थंड बस्त्यात पडलेला राम मंदिर निर्माणाचा मुद्दा, पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या मुद्याच्या साहाय्याने राष्ट्रीय राजकारणातील एक ध्रुव म्हणून पुढे आलेल्या भारतीय जनता पक्षाने, लोकसभा निवडणुकीदरम्यान हा मुद्दा संपूर्णपणे गुंडाळून ठेवला होता. त्यानंतर पार पडलेल्या विविध विधानसभांच्या निवडणुकांदरम्यानही कुठेही या मुद्याची अजिबात चर्चा झाली नाही. असे असताना आता अचानक अयोध्येत दोन ट्रक भरून दगड पोहचल्याची बातमी येते, हे वरकरणी दिसते तेवढे साधे नक्कीच नाही. या बातमीचा थेट संबंध, तोंडावर आलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीशी, निश्चितपणे आहे. दिल्ली आणि बिहारमधील विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे सपाटून मार खाल्लेल्या भाजपासाठी उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक म्हणजे अक्षरश: जीवनमरणाचा प्रश्न आहे. भाजपाला कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकावीच लागेल. या निवडणुकीतील पराभव म्हणजे केंद्रातील भाजपा सरकारच्या पतनाची नांदी ठरण्याची दाट शक्यता आहे. भाजपा नेतृत्वाला आणि त्या पक्षाचा शक्तीस्त्रोत असलेल्या संघ परिवारालाही याची पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जिंकण्याचा चंग परिवार बांधणार आहे आणि त्यासाठीच घासून गुळगुळीत झालेले राम मंदिराचे नाणे पुन्हा एकदा चलनात आणण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील एकूण ७५ पैकी तब्बल ७१ जागा जिंकलेल्या पक्षाने असे घायकुतीला येणे, खरे म्हटले तर खूप आश्चर्यकारक आहे; पण लोकसभा निवडणुकीनंतर गंगेतून भरपूर पाणी वाहून गेल्याची भाजपा व संघ नेतृत्वाला जाणीव आहे. दिल्ली आणि बिहारप्रमाणेच उत्तर प्रदेशमध्येही भाजपासमोर दमदार स्थानिक नेतृत्वाच्या व संघटनात्मक बांधणीच्या अभावाचा गंभीर प्रश्न आ वासून उभा आहे. नरेंद्र मोदींच्या नावाचा व करिश्म्याचा वापर करून लोकसभा निवडणुकीत विजय मिळविणे वेगळे आणि विधानसभा निवडणूक वेगळी, याची दिल्ली व बिहारमधील निकालांमुळे भाजपा व संघ परिवाराला पुरेपूर कल्पना आली आहे. त्यामुळेच यावेळी केवळ नरेंद्र मोदींवर विसंबून न राहता, धार्मिक तेढ निर्माण करून त्यावर आपली पोळी शेकून घेण्याचा डाव दिसतो आहे आणि उत्तर प्रदेशात धार्मिक तेढ निर्माण करायची असल्यास राम मंदिरापेक्षा जास्त चांगला मुद्दा दुसरा कोणता असू शकतो? संघ परिवाराचा हा विचार कागदावर अगदी बिनतोड वाटू शकतो, फक्त अडचण एवढीच आहे, की गंगेतून लोकसभा निवडणुकीनंतर जेवढे पाणी वाहून गेले, त्याच्या किती तरी पट पाणी १९९२ नंतर वाहून गेले आहे!