शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

प्रांजळ राज्यपाल

By admin | Updated: October 26, 2016 05:11 IST

केरळ विधानसभेच्या निवडणूक प्रचारातील एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी त्या राज्यातील कुपोषणाच्या गंभीर स्थितीची चर्चा उपस्थित केली आणि केरळची

केरळ विधानसभेच्या निवडणूक प्रचारातील एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी त्या राज्यातील कुपोषणाच्या गंभीर स्थितीची चर्चा उपस्थित केली आणि केरळची तुलना सोमालियाशी केली. कुपोषण आणि उपोषणाचे सर्वाधिक बळी ठरणाऱ्या सोमालियाशी आपली तुलना करण्यात आल्याने केरळात तीव्र संतापाची लाट उसळली आणि केरळाभिमानी लोकानी, पंतप्रधानांच्या गुजरात राज्याची तुलना थेट इथिओपिया या दैन्याने ग्रासलेल्या कुपोषित आफ्रिकी राष्ट्राशी करुन एकप्रकारे परतफेड केली. भारतातील बहुतेक मोठ्या शहरांना कधी शांघाय, कधी सिंगापूर तर कधी हाँगकाँग करण्याची भाषा एकीकडे होत असताना देशातील तुलनेने प्रगत अशा दोन राज्यांची तुलना जगातील अत्यंत मागास राष्ट्रांशी केली जात होती. यातील क्रूर विनोद घटकाभर बाजूला ठेवला तरी जेव्हां महाराष्ट्रासारख्या बड्या राज्याचा राज्यपाल जेव्हां याच राज्यातील एका आदिवासी विभागाची पुन्हा इथिओपियाशी तुलना करतो तेव्हां थक्क व्हावे की राज्यपालांच्या प्रांजळपणास दाद द्यावी असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. नाशकातील एका जाहीर समारंभात बोलताना राज्यपाल चेन्नमणेनी विद्यासागर राव यांनी पालघर जिल्ह्यातील कुपोषण आणि उपोषणाच्या बळींची संख्या बघितल्यानंतर पालघर म्हणजे इथिओपिया तर नाही ना, अशी शंका बोलून दाखविली. वास्तविक पाहाता मुळात पालघर हा आदिवासी तालुका-जिल्हा असला तरी तो नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा-अक्राणी किंवा अमरावती जिल्ह्यातील धारणीसमान दुर्गम नाही. उलट कोणे एकेकाळी गोरेगाव-मालाडपर्यंत सीमित असलेली बृहन्मुंबई एव्हाना विरार-वसई पार करुन डहाणू-पालघरपर्यंत पसरत चालली आहे. कदाचित मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघरमध्येही आदिवासी बालकांचे अपमृत्यु होत असल्याचे ऐकून राज्यपाल व्यथित झाले असावेत. अर्थात त्यांनी राज्यातील अन्य कोणत्याही आदिवासी इलाख्याचे नाव न घेता थेट पालघरचेच नाव घ्यावे आणि केवळ तेवढेच नव्हे तर पालघरची तुलना इथिओपियाशी करावी यामागे आणखीही एक कारण संभवते. मध्यंतरी पालघर विभागातील बालमृत्युंचे प्रकार उजेडात आले तेव्हां स्वाभाविकच राज्याचे विद्यमान आदिवासी कल्याण मंत्री विष्णू सावरा (याच विभागातील वाडा मतदारसंघाचे विधानसभेतील प्रतिनिधी) यांना छेडण्यात आले. पण त्यावर सावरा यांनी अगदी सहजतेने ‘मग काय झाले’ असा प्रतिप्रश्न करुन व्यक्तिश: त्यांना अशा मृत्युंशी काहीही सोयरसुतक नसल्याचेच दाखवून दिले. त्यावर सावरांना अनेकांनी तोफेच्या तोंडीही ठेवले. कदाचित हे सारे राज्यपालांच्या वाचण्यात वा ऐकण्यात आले असावे. म्हणूनच त्यांनी पालघरचा उल्लेख केला. पण यातील खरा मुद्दा तो नाही. राज्यपाल विद्यासागर राव घटनात्मकदृष्ट्या ज्या राज्याचे प्रमुख आहेत त्याच राज्यातील एका विभागाची अवस्था इथिओपियाशी करणे जर त्यांना स्वत:लाच भाग पडत असेल तर ते आता या विभागातील कुपोषण आणि उपोषण दूर करण्यासाठी सरकारला कोणते आदेश देणार आहेत, हा यातील खरा मुद्दा आहे.