शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

गारपिटीचे पुर्वानुमान; हवामान खाते सज्ज

By admin | Updated: December 21, 2014 00:21 IST

पश्चिमेला अरबी समुद्र तर मध्य महाराष्ट्रात सह्याद्रीच्या रांगा आहेत व पूर्वेला पठारे आहेत. या भौगोलिक विविधतेमुळे येथील हवामानात बदल होत जातो.

पश्चिमेला अरबी समुद्र तर मध्य महाराष्ट्रात सह्याद्रीच्या रांगा आहेत व पूर्वेला पठारे आहेत. या भौगोलिक विविधतेमुळे येथील हवामानात बदल होत जातो. कोकण व पश्चिम विभागात खूप पाऊस पडतो. तर मध्य महाराष्ट्रात त्या अनुषंगाने कमी पाऊस पडतो तर काही ठिकाणी जास्त. मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमीच आहे. वर्षभर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात सगळेच ऋतू अनुभवास मिळतात. शिवाय नैसर्गिक आपत्तींचा देखील सामना करावा लागतो.हवामान खाते गारपिटीबाबतचा अंदाज व्यक्त करीत असते. अंदाज वर्तविण्यासाठी डॉप्लर, रडारचा आधार घेतला जातो. भारतीय हवामान खात्याने डॉप्लरचे जाळे संपूर्ण देशभरात पसरविले आहे. महाराष्ट्रातील कुलाबा येथे कार्यरत असलेल्या डॉप्लर आणि रडारद्वारे ३-४ तास आधी गारपिटीचे पूर्वानुमान देता येते. शिवाय रत्नागिरी आणि औरंगाबाद येथे देखील अशी यंत्रणा उभी करण्यावर भर दिला जात असून, या माध्यमातून नैसर्गिक आपत्तींचा अगोदरच अंदाज घेणे आणखी सोपे होईल.ज्यात पावसाळ्यात पूर, पावसाळ्यानंतर अतिउष्ण हवामान, हिवाळ्यात शीत लहरी, अवकाळी पाऊस, गारपीट आणि उन्हाळ्यात अतिउष्ण तापमान, उष्ण लाट पाहण्यास मिळते. गेल्या दोन वर्षांतील हवामान पाहिले तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी हिवाळ्यात गारपीट तर कधी अवकाळी पाऊस झाला. हवामान खात्याने नैसर्गिक आपत्तींबद्दल पूर्वानुमान दिले होते. शिवाय हवामान खात्याच्या वतीने त्या संबंधीच्या सूचना राज्याच्या नैसर्गिक आपदा निवारण विभागाला तत्काळ दिल्या जात असतात.राज्यात गेल्या २-३ वर्षांत हिवाळ्यात दरवर्षी गारपीट होत आहे. महाराष्ट्रासह उत्तर भारतात देखील गारपीट होत असते. गारपीट म्हणजे गारांचा पाऊस. जेव्हा हवामानाचे स्तर खूप खालच्या पातळीवर येतात, तेव्हा अनेक वेळा गारांचा पाऊस होते. बाष्पाचे कण अतिउच्च स्तरावरील उष्ण आणि अति शीतल स्तरांवरील झंझावातात अडकतात आणि ते गोठत जातात. जेथे असे कण अति शीत स्तराच्या अति थंड पाण्याच्या संपर्कात येतात, तेव्हा त्याच्या स्तरावर पाण्याचा बदल होतो आणि त्याचा आकार वाढतो. तेव्हा या कणांचा भार अति शीत स्तराला जड होतो. तेव्हा गारांचा पाऊस पडतो. ही परिस्थिती साधारणपणे अस्थिर वातावरणाच्या विशिष्ट परिणामामुळे तयार होते. सोबतच हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढते. किमान तापमानात सततच्या बदलामुळे हे होत असते. गारांचा आकार हा झंझावाताच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. तो १५ ते ५.१ सेंमीपर्यंत असतो. गारा पडण्याचा कालावधी हा १५ मिनिटांपासून ३० मिनिटांपर्यंत असतो. शेतकरी वर्गाने गारपिटीपासून बचाव करायचा असेल तर जाळ्यांचा वापर करायला हवा. पण जेव्हा गारपिटीचा आकार लहान असतो तेव्हाच या जाळ्या उपयोगाच्या असतात. वैज्ञानिकरीत्या वातावरणातील स्तरांमध्ये क्लाऊड सिडिंग केले तरी काही प्रमाणात गारपिटीची तीव्रता कमी करता येईल. हवामान खाते आणि पुणे यांच्या संयुक्त प्रायोगिक तत्त्वावर याबाबत अधिक सखोल अभ्यास आणि संशोधन सुरू आहे. मात्र ही प्रक्रिया फार खर्चिक आहे. गारपीट, वादळ व पाऊस हे परस्परांशी संबंधित आहेत. हवामानातील बदल, तापमानातील वाढ हे सर्व घटक गारपिटीला कारणीभूत असण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास, संशोधन सुरू असून, गारपिटीबाबत पूर्वानुमान देण्यासाठी हवामान खाते अधिक प्रत्यत्नशील आहे.(लेखिका मुंबई हवामान विभागाच्या संचालिका आहेत.)- शुभांगी भुते