शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

गारपिटीचे पुर्वानुमान; हवामान खाते सज्ज

By admin | Updated: December 21, 2014 00:21 IST

पश्चिमेला अरबी समुद्र तर मध्य महाराष्ट्रात सह्याद्रीच्या रांगा आहेत व पूर्वेला पठारे आहेत. या भौगोलिक विविधतेमुळे येथील हवामानात बदल होत जातो.

पश्चिमेला अरबी समुद्र तर मध्य महाराष्ट्रात सह्याद्रीच्या रांगा आहेत व पूर्वेला पठारे आहेत. या भौगोलिक विविधतेमुळे येथील हवामानात बदल होत जातो. कोकण व पश्चिम विभागात खूप पाऊस पडतो. तर मध्य महाराष्ट्रात त्या अनुषंगाने कमी पाऊस पडतो तर काही ठिकाणी जास्त. मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमीच आहे. वर्षभर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात सगळेच ऋतू अनुभवास मिळतात. शिवाय नैसर्गिक आपत्तींचा देखील सामना करावा लागतो.हवामान खाते गारपिटीबाबतचा अंदाज व्यक्त करीत असते. अंदाज वर्तविण्यासाठी डॉप्लर, रडारचा आधार घेतला जातो. भारतीय हवामान खात्याने डॉप्लरचे जाळे संपूर्ण देशभरात पसरविले आहे. महाराष्ट्रातील कुलाबा येथे कार्यरत असलेल्या डॉप्लर आणि रडारद्वारे ३-४ तास आधी गारपिटीचे पूर्वानुमान देता येते. शिवाय रत्नागिरी आणि औरंगाबाद येथे देखील अशी यंत्रणा उभी करण्यावर भर दिला जात असून, या माध्यमातून नैसर्गिक आपत्तींचा अगोदरच अंदाज घेणे आणखी सोपे होईल.ज्यात पावसाळ्यात पूर, पावसाळ्यानंतर अतिउष्ण हवामान, हिवाळ्यात शीत लहरी, अवकाळी पाऊस, गारपीट आणि उन्हाळ्यात अतिउष्ण तापमान, उष्ण लाट पाहण्यास मिळते. गेल्या दोन वर्षांतील हवामान पाहिले तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी हिवाळ्यात गारपीट तर कधी अवकाळी पाऊस झाला. हवामान खात्याने नैसर्गिक आपत्तींबद्दल पूर्वानुमान दिले होते. शिवाय हवामान खात्याच्या वतीने त्या संबंधीच्या सूचना राज्याच्या नैसर्गिक आपदा निवारण विभागाला तत्काळ दिल्या जात असतात.राज्यात गेल्या २-३ वर्षांत हिवाळ्यात दरवर्षी गारपीट होत आहे. महाराष्ट्रासह उत्तर भारतात देखील गारपीट होत असते. गारपीट म्हणजे गारांचा पाऊस. जेव्हा हवामानाचे स्तर खूप खालच्या पातळीवर येतात, तेव्हा अनेक वेळा गारांचा पाऊस होते. बाष्पाचे कण अतिउच्च स्तरावरील उष्ण आणि अति शीतल स्तरांवरील झंझावातात अडकतात आणि ते गोठत जातात. जेथे असे कण अति शीत स्तराच्या अति थंड पाण्याच्या संपर्कात येतात, तेव्हा त्याच्या स्तरावर पाण्याचा बदल होतो आणि त्याचा आकार वाढतो. तेव्हा या कणांचा भार अति शीत स्तराला जड होतो. तेव्हा गारांचा पाऊस पडतो. ही परिस्थिती साधारणपणे अस्थिर वातावरणाच्या विशिष्ट परिणामामुळे तयार होते. सोबतच हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढते. किमान तापमानात सततच्या बदलामुळे हे होत असते. गारांचा आकार हा झंझावाताच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. तो १५ ते ५.१ सेंमीपर्यंत असतो. गारा पडण्याचा कालावधी हा १५ मिनिटांपासून ३० मिनिटांपर्यंत असतो. शेतकरी वर्गाने गारपिटीपासून बचाव करायचा असेल तर जाळ्यांचा वापर करायला हवा. पण जेव्हा गारपिटीचा आकार लहान असतो तेव्हाच या जाळ्या उपयोगाच्या असतात. वैज्ञानिकरीत्या वातावरणातील स्तरांमध्ये क्लाऊड सिडिंग केले तरी काही प्रमाणात गारपिटीची तीव्रता कमी करता येईल. हवामान खाते आणि पुणे यांच्या संयुक्त प्रायोगिक तत्त्वावर याबाबत अधिक सखोल अभ्यास आणि संशोधन सुरू आहे. मात्र ही प्रक्रिया फार खर्चिक आहे. गारपीट, वादळ व पाऊस हे परस्परांशी संबंधित आहेत. हवामानातील बदल, तापमानातील वाढ हे सर्व घटक गारपिटीला कारणीभूत असण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास, संशोधन सुरू असून, गारपिटीबाबत पूर्वानुमान देण्यासाठी हवामान खाते अधिक प्रत्यत्नशील आहे.(लेखिका मुंबई हवामान विभागाच्या संचालिका आहेत.)- शुभांगी भुते