शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

स्तुतीपाठक, नको रे बाबा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 11:49 IST

मिलिंद कुलकर्णी जयभगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन महाराष्टÑभर क्षोभ उसळला आहे. शिवप्रेमींनी तीव्र निषेध व्यक्त ...

मिलिंद कुलकर्णीजयभगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन महाराष्टÑभर क्षोभ उसळला आहे. शिवप्रेमींनी तीव्र निषेध व्यक्त केल्यानंतर हे पुस्तक मागे घेण्यात आले. स्तुतीपाठकांनी गोची केल्याचे हे नवे उदाहरण म्हणावे लागेल.समाजाच्या सर्वच क्षेत्रात स्तुतीपाठकांची जमात असते. त्यांची ओळख पटविणे नितांत आवश्यक आहे. अन्यथा फसगत झालीच म्हणून समजा.तुम्हाला मिळत असलेले यश, पद आणि प्रतिष्ठा ही तुमच्या मेहनतीचे फळ असतेच असते, परंतु, त्यासोबतच अनुकूल परिस्थिती, अनेकांनी तुम्हाला कळत नकळत केलेली मदत किंवा सहाय्यकारी भूमिका याचाही वाटा असतो. त्याची कायम जाणीव ठेवणे आवश्यक आहे. गफलत याचठिकाणी होते. यशाचे श्रेय घ्यायला सगळे तयार असतात, पण अपयशाला बाप नसतो, असे म्हटले जाते, ते याचसंदर्भात.नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. सलग दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पूर्ण बहुमत मिळविले आहे. त्यांच्या कामगिरीविषयी सहमती आणि आक्षेप असे दोन्ही विचारप्रवाह असू शकतात. परंतु, त्यांची तुलना महापुरुषांशी करुन लेखक गोयल हे मोदी यांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यांच्या या उपद्व्यापामुळे मोदी आणि भाजपविषयी खप्पामर्जी होण्याची शक्यता दाट आहे. भाजप कार्यालयात आणि पदाधिकारी श्याम जाजू यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन झाल्याने भाजपविषयी शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. स्तुतीपाठकांना वेळीच ओळखणे आणि त्यांच्या कारवायांपासून पक्ष व नेत्याला दूर ठेवण्याचे कार्य खरे तर व्हायला हवे, पण तसे होत नाही.नरेंद्र मोदी यांचे सहकारी अमित शहा यांना ‘चाणक्य’ म्हणून उपाधी दिली जाते. हे स्तुतीपाठकांचेच काम आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा यश मिळण्यात तसेच इशान्येतील काही राज्यांमध्ये मिळालेल्या यशात मोदींसोबत शहा यांचाही वाटा असेल. त्यामुळे त्यांच्याकडे पक्षाचे राष्टÑीय अध्यक्षपद आणि नंतर केंद्रीय गृहमंत्रीपद देण्यात आले. पण, ‘चाणक्य’ संबोधणे अतिशयोक्ती ठरु शकते. त्यांच्या स्वत:च्या गुजराथ राज्यात भाजपला बहुमतासाठी धडपडावे लागले. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्टÑ, छत्तीसगड या राज्यात पराभव पत्करावा लागला. कर्नाटक आणि हरियाणात तडजोडीमुळे सत्ता आली. सीएए, एनआरसी संबंधी देशभर आंदोलनांचा उडालेला भडका हा शहा यांच्या गृहमंत्रालयाच्या अंदाजापेक्षा मोठा आहे. गुप्तचर यंत्रणांना याची पूर्वकल्पना नाही. हे कथित ‘चाणक्यांं’चे अपयश नाही का?महाराष्टÑाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना मोदींबरोबर करणारे स्तुतीपाठक आहेत. ‘मी पुन्हा येईन’ हे अशा स्तुतीपाठकांचे कृत्य आहे. ‘महाजनादेश यात्रे’च्या निमित्ताने स्वत:वर प्रकाशझोत ठेवण्याची फडणवीस व त्यांच्या गटाची खेळी उलटली आणि संपूर्ण अपयशाचे धनी ते एकटे ठरले. सामूहिक निर्णय प्रक्रिया ही भाजपमधील नैसर्गिक संस्कृती असताना फडणवीस यांनी मोजक्या मंडळींना सोबत घेऊन सरकार आणि पक्ष चालवला आणि सरकार घालवण्यास या गोष्टी कारणीभूत ठरल्या.फडणवीस यांच्या निकटवर्तीयांनाही मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले, ते स्तुतीपाठकांनी त्यांना फुलविल्यामुळेच. एक किस्सा जळगाव जिल्ह्यात घडलेला. फडणवीस हे परदेशी गेले असताना त्यांनी कामकाज पाहण्यासाठी काही मंत्र्यांची एक समिती गठित केली होती. त्यातील एक मंत्री अमळनेरला आले होते. कंत्राटी शिक्षकांनी त्यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. मी मुख्यमंत्री आहे, तुमची समस्या २४ तासात सोडवेन असे त्यांनी राणा भीमदेवी थाटात सांगितले. अर्थात ही समस्या अद्यापही सुटलेली नाही. पण त्या मंत्र्यांना स्वत:च्या जिल्ह्यातून भाजपचा एक आमदारदेखील निवडून आणता आला नाही. एवढेच काय त्यांना स्वत:साठी दुसºया जिल्ह्यात सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला.असेच एक दुसरे मंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय होते. स्तुतीपाठकांना या मंत्र्यांच्या कार्याचा मोठा अभिमान होता. मुख्यमंत्र्यांचे ‘यांच्याशिवाय’ पान हलत नाही, हे ते ज्याला त्याला सांगत असत. काहींनी तर मतदारसंघात ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून फलक झळकवले. मात्र या मंत्र्यांना पक्षाने सोपविलेली जबाबदारी विधानसभेत पार पाडता आली नाही. स्वत:च्या जिल्ह्यात पक्षाचे बळ खालावले.म्हणून म्हणावेसे वाटते, एकवेळ निंदकाचे घर शेजारी असलेले परवडते,पण आजूबाजूला स्तुतीपाठक नको रे बाबा...

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव