शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
2
दिल्लीतील दोन रुग्णालये आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी, तपास सुरू
3
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
4
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
5
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
6
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
7
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
8
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
9
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
10
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
11
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
12
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
13
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
14
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
15
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
16
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
17
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
18
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
19
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
20
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 

श्रेष्ठ दानाला वंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 2:47 AM

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरुद्ध लढत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी केलेला मरणोपरांत देहदानाचा संकल्प साऱ्या समाजाने प्रेरणा घ्यावा असाच आहे.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरुद्ध लढत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी केलेला मरणोपरांत देहदानाचा संकल्प साऱ्या समाजाने प्रेरणा घ्यावा असाच आहे. हे जवान आपले घरदार सोडून, स्वत:चा जीव धोक्यात घालून नक्षलवाद्यांशी लढत आहेत. या देशसेवेची ते परतफेड मागत नाहीत. आपल्या कर्तव्यापोटी मिळणाºया पगारात ते आनंदी आहेत. पगार वाढावा किंवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी ते संप करीत नाहीत किंवा रस्त्यावरही उतरत नाहीत. कल्पना करा, हे जवान उद्या संपावर गेले तर आपण सुरक्षित राहू का? केवळ या कल्पनेने अंगावर शहारे येतात. पण ते तसे करणार नाहीत. कारण वैयक्तिक सुखापेक्षा त्यांना देशाचे, समाजाचे हित महत्त्वाचे वाटते. यासाठी देशासाठी प्राण पणाला लावण्याची त्यांची तयारी आहे. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी देशाच्या हवाली केले असले तरी, आपण गेल्यानंतरही आपला देह देशातील सामान्य माणसाच्या सत्कारणी लागावा, ही त्यांची भावना लाखमोलाची आहे. या जवानांच्या त्यागाचे मूल्य समाजाला कुठल्याही मापात मोजता येणार नाही. त्यांची ती अपेक्षाही नाही. नक्षलविरोधी अभियानासाठी गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पाच बटालियन कार्यरत आहेत. अभिमानाची गोष्ट अशी की, या पाचही बटालियनमधील जवानांनी हा संकल्प केला आहे. आम्ही जिवंतपणी देशाच्या आणि समाजाच्या कामी येत असतो. पण मृत्यूनंतरही आमच्या शरीराचा उपयोग गरजवंतांना व्हावा, ही या जवानांच्या मनातील भावना आहे. जवानांच्या संकल्पाकडे बघितल्यानंतर आपल्या साºयांच्याच मनाचे तोकडेपण ठसठशीतपणे समोर येते. आपण खुप सुरक्षित आयुष्य जगत असतो. देशाच्या सीमेवर लढत असलेल्या सैनिकांच्या तुलनेत आपले जीवन तसे बरेचसे सुखवस्तू आहे. आपण स्वत:चा, स्वत:च्या नातेवाईकांचा आणि फार झाले तर जातीचा विचार करीत असतो. त्यापलीकडे आपले दुसरे विश्व नसते. आपण रक्ताच्या नात्यांमध्ये एवढे गुरफटलो असतो की, आपण समाजाचे काही देणे लागतो, हा विचारही कधी मनाला स्पर्शून जात नाही. त्यामुळे दुसºयाच्या उपयोगात यावे, दुसºयांची मदत करावी, इतरांच्या वेदनेशी आपले नाते जोडावे, असे कधीही वाटत नाही. आपल्यासाठी दान अथवा दातृत्व हा विषय मंदिरातील दानपेटी किंवा अभिषेकापुरता मर्यादित असतो. अशी मतलबी आणि चौकटीतील मानसिकता घेऊन आपण जगत आहोत. त्यामुळे नेत्रदान, अवयवदान, देहदान या दानाच्या श्रेष्ठतम मूल्यांचा विचार आपल्याला कधीही येत नाही. याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बराचसा अज्ञानी व संकुचित आहे. समाजाच्या, देशाच्या शत्रूंशी लढत असलेल्या जवानांनी असा संकल्प सोडल्यानंतर त्यांना वंदन करण्यासाठी आपले हात, म्हणूनच आपसूक जोडले जातात...