शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

श्रेष्ठ दानाला वंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 02:47 IST

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरुद्ध लढत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी केलेला मरणोपरांत देहदानाचा संकल्प साऱ्या समाजाने प्रेरणा घ्यावा असाच आहे.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरुद्ध लढत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी केलेला मरणोपरांत देहदानाचा संकल्प साऱ्या समाजाने प्रेरणा घ्यावा असाच आहे. हे जवान आपले घरदार सोडून, स्वत:चा जीव धोक्यात घालून नक्षलवाद्यांशी लढत आहेत. या देशसेवेची ते परतफेड मागत नाहीत. आपल्या कर्तव्यापोटी मिळणाºया पगारात ते आनंदी आहेत. पगार वाढावा किंवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी ते संप करीत नाहीत किंवा रस्त्यावरही उतरत नाहीत. कल्पना करा, हे जवान उद्या संपावर गेले तर आपण सुरक्षित राहू का? केवळ या कल्पनेने अंगावर शहारे येतात. पण ते तसे करणार नाहीत. कारण वैयक्तिक सुखापेक्षा त्यांना देशाचे, समाजाचे हित महत्त्वाचे वाटते. यासाठी देशासाठी प्राण पणाला लावण्याची त्यांची तयारी आहे. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी देशाच्या हवाली केले असले तरी, आपण गेल्यानंतरही आपला देह देशातील सामान्य माणसाच्या सत्कारणी लागावा, ही त्यांची भावना लाखमोलाची आहे. या जवानांच्या त्यागाचे मूल्य समाजाला कुठल्याही मापात मोजता येणार नाही. त्यांची ती अपेक्षाही नाही. नक्षलविरोधी अभियानासाठी गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पाच बटालियन कार्यरत आहेत. अभिमानाची गोष्ट अशी की, या पाचही बटालियनमधील जवानांनी हा संकल्प केला आहे. आम्ही जिवंतपणी देशाच्या आणि समाजाच्या कामी येत असतो. पण मृत्यूनंतरही आमच्या शरीराचा उपयोग गरजवंतांना व्हावा, ही या जवानांच्या मनातील भावना आहे. जवानांच्या संकल्पाकडे बघितल्यानंतर आपल्या साºयांच्याच मनाचे तोकडेपण ठसठशीतपणे समोर येते. आपण खुप सुरक्षित आयुष्य जगत असतो. देशाच्या सीमेवर लढत असलेल्या सैनिकांच्या तुलनेत आपले जीवन तसे बरेचसे सुखवस्तू आहे. आपण स्वत:चा, स्वत:च्या नातेवाईकांचा आणि फार झाले तर जातीचा विचार करीत असतो. त्यापलीकडे आपले दुसरे विश्व नसते. आपण रक्ताच्या नात्यांमध्ये एवढे गुरफटलो असतो की, आपण समाजाचे काही देणे लागतो, हा विचारही कधी मनाला स्पर्शून जात नाही. त्यामुळे दुसºयाच्या उपयोगात यावे, दुसºयांची मदत करावी, इतरांच्या वेदनेशी आपले नाते जोडावे, असे कधीही वाटत नाही. आपल्यासाठी दान अथवा दातृत्व हा विषय मंदिरातील दानपेटी किंवा अभिषेकापुरता मर्यादित असतो. अशी मतलबी आणि चौकटीतील मानसिकता घेऊन आपण जगत आहोत. त्यामुळे नेत्रदान, अवयवदान, देहदान या दानाच्या श्रेष्ठतम मूल्यांचा विचार आपल्याला कधीही येत नाही. याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बराचसा अज्ञानी व संकुचित आहे. समाजाच्या, देशाच्या शत्रूंशी लढत असलेल्या जवानांनी असा संकल्प सोडल्यानंतर त्यांना वंदन करण्यासाठी आपले हात, म्हणूनच आपसूक जोडले जातात...