शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

यशाने हुरळून न जाता प्रॅक्टिकल असावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 06:34 IST

माध्यमांच्या, विशेषकरून सोशल मीडियाच्या या युगात खेळाडूंना एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले जाते.

भारतीय क्रिकेट संघातील दोन तरुण खेळाडू, हार्दिक पंड्या आणि के.एल. राहुल यांनी एका दूरचित्रवाणीवरील केलेल्या वक्तव्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन शिक्षेचा निर्णय होणार असल्याने त्या प्रकरणाच्या तपशिलाबाबत भाष्य करणे उचित होणार नाही. मात्र, यानिमित्ताने प्रसिद्धीच्या झोतात येणाऱ्या क्रीडापटूंनी आपली वर्तणूक सार्वजनिक आयुष्यात कशी ठेवावी, हा विषय चर्चिला जात आहे.

माध्यमांच्या, विशेषकरून सोशल मीडियाच्या या युगात खेळाडूंना एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले जाते. मात्र, एखाद्या अप्रिय घटनेने तेवढ्याच पटकन त्यांची प्रतिमा धुळीस मिळते. टिष्ट्वटरसारख्या गतिमान माध्यमाने एखाद्या बातमीचा क्षणात स्फोट होतो. खेळाडूही त्यांची प्रतिमा जोपासण्यासाठी सतत अशा माध्यमांच्या संपर्कात असतात. त्यामुळे सार्वजनिक आयुष्यात वर्तणूक योग्य राहील यासाठी अशा खेळाडूंनी सतर्क असणे आवश्यक आहे.

यापूर्वीही अनेक जागतिक कीर्तीच्या खेळाडूंना खेळाव्यतिरिक्त गैरवर्तणुकीच्या घटना सार्वजनिक आयुष्यात आल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. टायगर वुड्ससारख्या सुप्रसिद्ध गोल्फ खेळाडूचे उदाहरण जगासमोर आहे. प्रसिद्ध खेळाडूंकडे आणि भारतात विशेषकरून क्रिकेटपटूंकडे नवी पिढी ‘आयकॉन’ आदर्श म्हणून पाहते. त्यामुळे त्यांच्यावर विशेष जबाबदारी आहे. चुकीची वक्तव्ये आणि शेरेबाजी कारकिर्दीवर प्रतिकूल परिणाम करू शकतात. सन २००६ मध्ये क्रिकेट समालोेचक व माजी आॅस्ट्रेलियन टेस्ट फलंदाज डीन जोन्स याला समालोचनादरम्यान दक्षिण आफ्रिकी खेळाडू हशीम आमलाचा उल्लेख ‘अतिरेकी’ असा केल्याबद्दल सेवामुक्त करण्यात आले होते.‘नथिंग सक्सीक्ड्स लाइक सक्सेस...’ असे म्हटले जाते. एकदा यश मिळाले की संपत्तीची दारे खुली होतात, प्रसिद्घी मिळते आणि त्यापाठोपाठ कंपन्याही पुरस्कृत करतात. सध्याच्या वेगवान युगात मिळणारी झटपट प्रसिद्घी आणि संपत्ती काही जणांना अतिरिक्त आत्मविश्वास देऊन जातात. मग एका क्षेत्रातील यश हे सर्वत्र वापरता येते, असा ठाम समज होतो. बहुतेक खेळाडू हे उत्तम वक्ते नसतात; किंबहुना तसे असणे अपेक्षितही नाही. मात्र, यामुळेच सार्वजनिक आयुष्यात बोलताना खूप काळजी घेणे गरजेचे आहे.

यामुळेच यशाकडे आणि प्रसिद्घीकडे वाटचाल करणाºया खेळाडूंना सार्वजनिक आयुष्यात वागण्याचे प्रशिक्षण दिले जावे, असा विचार आता मांडला जात आहे. आपल्या जाहीर वर्तणुकीचे कसे आणि कोणते परिणाम आणि दुष्परिणाम होतात, हे त्यांनी लक्षात घ्यावयास हवे. अशा प्रकारची संवेदनशीलता यावी, यासाठी योग्य वेळी समुपदेशन मिळाले तर अनेक अनावश्यक कटू प्रसंग टाळता येतील. अर्थात यासाठी खेळाडूची इच्छाशक्तीही तितकीच महत्त्वाची. या प्रक्रियेत त्याचाच सहभाग आणि इच्छाशक्ती महत्त्वाची.सार्वजनिक जीवनातील योग्य वर्तणुकीची देणगी काही खेळाडूंना जन्मजात असते, तर काही ती प्रयत्नपूर्वक मिळवतात. मात्र, काही आपल्या अनुभवातूनच शिकतात. एखादा अनुभव पचवून पुढे जाता येते; मात्र एखादा कारकीर्दच संपवू शकतो. विचार ज्याचा त्याने करायचा आहे.- अ‍ॅड. अभय आपटेमहाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष

टॅग्स :BCCIबीसीसीआय