शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

प्रपंच आणि परमार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 00:17 IST

प्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, त्याप्रमाणे प्रपंच नेटका करूनच परमार्थ साधता येतो. किंबहुना परमार्थ साधणे म्हणजेच प्रपंचाचा तोलबिंदू आर्थिक, सामाजिक आणि व्यावहारिक पातळीवर उत्तमरीत्या सांभाळणे होय. आर्थिक स्थिती चांगली असो की बेताची असो, त्याचा परमार्थ साधण्याशी काही संबंध नसतो.

- प्रज्ञा कुलकर्णीप्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, त्याप्रमाणे प्रपंच नेटका करूनच परमार्थ साधता येतो. किंबहुना परमार्थ साधणे म्हणजेच प्रपंचाचा तोलबिंदू आर्थिक, सामाजिक आणि व्यावहारिक पातळीवर उत्तमरीत्या सांभाळणे होय. आर्थिक स्थिती चांगली असो की बेताची असो, त्याचा परमार्थ साधण्याशी काही संबंध नसतो. प्रापंचिक स्थिती कशीही असली, तरी आपली मानसिकता जर पारमार्थिक असेल; तर तिथे प्रपंच आणि परमार्थ यांचा सुरेख संगम साधला जातो. प्रपंचाला कंटाळून परमार्थ साधता येणार नाही आणि केवळ परमार्थच करण्याने प्रपंचही नेटका होणार नाही. एखाद्याने प्रपंच सोडून जर परमार्थातच झोकून देण्याचे ठरवले तर त्यांचे उद्दिष्ट कधीच साध्य होणार नाही. त्याला हवी असलेली मन:शांती कधी लाभणार नाही. प्रपंच सोडणे, प्रपंचातील कर्तव्यांकडे पाठ फिरवणे, प्रापंचिक जबाबदाऱ्या नाकारणे म्हणजे केवळ पळपुटेपणा आणि भेकडपणाच होय. या सर्व जबाबदाºया पेलण्यास आणि पार पाडण्यास आपण असमर्थ आहोत, हे एक प्रकारे सिद्ध करणेच होय. समतोल राखण्याचे कौशल्य अंगी बाणवावे लागते. हे साध्य करणे अवघड आहे, पण ते अशक्य अजिबात नाही. प्रपंचाकडे पाठ फिरवून परमार्थसन्मुख कधीच होता येणार नाही. परमार्थ साधण्यासाठी मन स्थिर, शांत, तृप्त असावयास पाहिजे. आपल्या मनात अपराधीपणाची बोच, असमाधान, अतृप्तता असेल, मन अस्थिर, चंचल असेल तर ते मन परमार्थी कधीच रमणार नाही. काही केल्या ते स्थिर, समाधानी होणार नाही. काहीच साध्य न होता अशांत सागरात मन सतत गटांगळ्या मात्र खात राहील. त्यातून हाती काहीच लागणार नाही आणि नैराश्य, वैफल्य मात्र पदरी पडेल. या सगळ््या चक्रातून अनेक प्रश्न निर्माण होतील तसेच समस्या उभ्या ठाकतील. संपूर्ण प्रपंचाकडे, संसारी व्यापाकडे पाठ फिरवून, प्रापंचिक प्रश्नांना कंटाळून परमार्थ साधता येणार नाही आणि केवळ परमार्थ साधून प्रपंचही नीटनेटका होणार नाही, हे ज्याला कळेल आणि जो या दोन्हींचा समतोल उत्तमरीत्या सांभाळेल, त्यालाच प्रपंच आणि परमार्थातला गर्भितार्थकळेल. त्यामुळे या सगळ््या प्रक्रियेतील फरक लक्षात घेऊन याकडे पाहावयास हवे. तेव्हा त्याचे जगणे अर्थपूर्ण होईल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या