शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

प्रपंच आणि परमार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 00:17 IST

प्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, त्याप्रमाणे प्रपंच नेटका करूनच परमार्थ साधता येतो. किंबहुना परमार्थ साधणे म्हणजेच प्रपंचाचा तोलबिंदू आर्थिक, सामाजिक आणि व्यावहारिक पातळीवर उत्तमरीत्या सांभाळणे होय. आर्थिक स्थिती चांगली असो की बेताची असो, त्याचा परमार्थ साधण्याशी काही संबंध नसतो.

- प्रज्ञा कुलकर्णीप्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, त्याप्रमाणे प्रपंच नेटका करूनच परमार्थ साधता येतो. किंबहुना परमार्थ साधणे म्हणजेच प्रपंचाचा तोलबिंदू आर्थिक, सामाजिक आणि व्यावहारिक पातळीवर उत्तमरीत्या सांभाळणे होय. आर्थिक स्थिती चांगली असो की बेताची असो, त्याचा परमार्थ साधण्याशी काही संबंध नसतो. प्रापंचिक स्थिती कशीही असली, तरी आपली मानसिकता जर पारमार्थिक असेल; तर तिथे प्रपंच आणि परमार्थ यांचा सुरेख संगम साधला जातो. प्रपंचाला कंटाळून परमार्थ साधता येणार नाही आणि केवळ परमार्थच करण्याने प्रपंचही नेटका होणार नाही. एखाद्याने प्रपंच सोडून जर परमार्थातच झोकून देण्याचे ठरवले तर त्यांचे उद्दिष्ट कधीच साध्य होणार नाही. त्याला हवी असलेली मन:शांती कधी लाभणार नाही. प्रपंच सोडणे, प्रपंचातील कर्तव्यांकडे पाठ फिरवणे, प्रापंचिक जबाबदाऱ्या नाकारणे म्हणजे केवळ पळपुटेपणा आणि भेकडपणाच होय. या सर्व जबाबदाºया पेलण्यास आणि पार पाडण्यास आपण असमर्थ आहोत, हे एक प्रकारे सिद्ध करणेच होय. समतोल राखण्याचे कौशल्य अंगी बाणवावे लागते. हे साध्य करणे अवघड आहे, पण ते अशक्य अजिबात नाही. प्रपंचाकडे पाठ फिरवून परमार्थसन्मुख कधीच होता येणार नाही. परमार्थ साधण्यासाठी मन स्थिर, शांत, तृप्त असावयास पाहिजे. आपल्या मनात अपराधीपणाची बोच, असमाधान, अतृप्तता असेल, मन अस्थिर, चंचल असेल तर ते मन परमार्थी कधीच रमणार नाही. काही केल्या ते स्थिर, समाधानी होणार नाही. काहीच साध्य न होता अशांत सागरात मन सतत गटांगळ्या मात्र खात राहील. त्यातून हाती काहीच लागणार नाही आणि नैराश्य, वैफल्य मात्र पदरी पडेल. या सगळ््या चक्रातून अनेक प्रश्न निर्माण होतील तसेच समस्या उभ्या ठाकतील. संपूर्ण प्रपंचाकडे, संसारी व्यापाकडे पाठ फिरवून, प्रापंचिक प्रश्नांना कंटाळून परमार्थ साधता येणार नाही आणि केवळ परमार्थ साधून प्रपंचही नीटनेटका होणार नाही, हे ज्याला कळेल आणि जो या दोन्हींचा समतोल उत्तमरीत्या सांभाळेल, त्यालाच प्रपंच आणि परमार्थातला गर्भितार्थकळेल. त्यामुळे या सगळ््या प्रक्रियेतील फरक लक्षात घेऊन याकडे पाहावयास हवे. तेव्हा त्याचे जगणे अर्थपूर्ण होईल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या