शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

प्रपंच आणि परमार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 00:17 IST

प्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, त्याप्रमाणे प्रपंच नेटका करूनच परमार्थ साधता येतो. किंबहुना परमार्थ साधणे म्हणजेच प्रपंचाचा तोलबिंदू आर्थिक, सामाजिक आणि व्यावहारिक पातळीवर उत्तमरीत्या सांभाळणे होय. आर्थिक स्थिती चांगली असो की बेताची असो, त्याचा परमार्थ साधण्याशी काही संबंध नसतो.

- प्रज्ञा कुलकर्णीप्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, त्याप्रमाणे प्रपंच नेटका करूनच परमार्थ साधता येतो. किंबहुना परमार्थ साधणे म्हणजेच प्रपंचाचा तोलबिंदू आर्थिक, सामाजिक आणि व्यावहारिक पातळीवर उत्तमरीत्या सांभाळणे होय. आर्थिक स्थिती चांगली असो की बेताची असो, त्याचा परमार्थ साधण्याशी काही संबंध नसतो. प्रापंचिक स्थिती कशीही असली, तरी आपली मानसिकता जर पारमार्थिक असेल; तर तिथे प्रपंच आणि परमार्थ यांचा सुरेख संगम साधला जातो. प्रपंचाला कंटाळून परमार्थ साधता येणार नाही आणि केवळ परमार्थच करण्याने प्रपंचही नेटका होणार नाही. एखाद्याने प्रपंच सोडून जर परमार्थातच झोकून देण्याचे ठरवले तर त्यांचे उद्दिष्ट कधीच साध्य होणार नाही. त्याला हवी असलेली मन:शांती कधी लाभणार नाही. प्रपंच सोडणे, प्रपंचातील कर्तव्यांकडे पाठ फिरवणे, प्रापंचिक जबाबदाऱ्या नाकारणे म्हणजे केवळ पळपुटेपणा आणि भेकडपणाच होय. या सर्व जबाबदाºया पेलण्यास आणि पार पाडण्यास आपण असमर्थ आहोत, हे एक प्रकारे सिद्ध करणेच होय. समतोल राखण्याचे कौशल्य अंगी बाणवावे लागते. हे साध्य करणे अवघड आहे, पण ते अशक्य अजिबात नाही. प्रपंचाकडे पाठ फिरवून परमार्थसन्मुख कधीच होता येणार नाही. परमार्थ साधण्यासाठी मन स्थिर, शांत, तृप्त असावयास पाहिजे. आपल्या मनात अपराधीपणाची बोच, असमाधान, अतृप्तता असेल, मन अस्थिर, चंचल असेल तर ते मन परमार्थी कधीच रमणार नाही. काही केल्या ते स्थिर, समाधानी होणार नाही. काहीच साध्य न होता अशांत सागरात मन सतत गटांगळ्या मात्र खात राहील. त्यातून हाती काहीच लागणार नाही आणि नैराश्य, वैफल्य मात्र पदरी पडेल. या सगळ््या चक्रातून अनेक प्रश्न निर्माण होतील तसेच समस्या उभ्या ठाकतील. संपूर्ण प्रपंचाकडे, संसारी व्यापाकडे पाठ फिरवून, प्रापंचिक प्रश्नांना कंटाळून परमार्थ साधता येणार नाही आणि केवळ परमार्थ साधून प्रपंचही नीटनेटका होणार नाही, हे ज्याला कळेल आणि जो या दोन्हींचा समतोल उत्तमरीत्या सांभाळेल, त्यालाच प्रपंच आणि परमार्थातला गर्भितार्थकळेल. त्यामुळे या सगळ््या प्रक्रियेतील फरक लक्षात घेऊन याकडे पाहावयास हवे. तेव्हा त्याचे जगणे अर्थपूर्ण होईल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या