शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
3
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
4
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
6
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
7
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
8
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
9
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
10
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
11
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
12
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
13
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
14
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
15
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
17
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
18
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
19
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:12 IST

नुकत्याच प्रसारित झालेल्या दूरदर्शनवरील बातम्यात सांगितले की डॉक्टरांनी ३० वारकरी रुग्णांना सलग दहा दिवस रोज नऊ मिनिटे शांत बसून विठ्ठलाचे नामस्मरण करायला लावले व दहा दिवसानंतर केलेल्या चाचण्यात त्यांचा रक्तदाब, हृदयाचे ठोके व इको रेशोमध्ये सुधारणा झाल्याचे आढळून आले आहे.

- प्रा. संदीप ताटेवारनुकत्याच प्रसारित झालेल्या दूरदर्शनवरील बातम्यात सांगितले की डॉक्टरांनी ३० वारकरी रुग्णांना सलग दहा दिवस रोज नऊ मिनिटे शांत बसून विठ्ठलाचे नामस्मरण करायला लावले व दहा दिवसानंतर केलेल्या चाचण्यात त्यांचा रक्तदाब, हृदयाचे ठोके व इको रेशोमध्ये सुधारणा झाल्याचे आढळून आले आहे. भगवंताच्या नामस्मरणाने हृदयावर कसे सकारात्मक परिणाम होतात याबाबत काही संशोधन लेखसुद्धा आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. मनापासून विठ्ठल शब्द उच्चारल्याने अनाहृत चक्रावर म्हणजेच हृदयावर याचा परिणाम होतो व हृदयाच्या ऊर्जेत वाढ होते असे चाचण्यात सिद्ध झाले आहे. भगवंताच्या नामस्मरणाच्या स्पंदनात शक्ती आहे व त्याच्या नामस्मरणाने विघ्न दूर होतात ही मान्यता अध्यात्मामध्ये बºयाच संत महात्म्यांनी मांडली आहे. म्हणूनंच संत कान्होपात्राने असाच अनुभव विशद केला आहे. ते म्हणतात,नामे दोष जळती । नामे प्राण उद्धरती ।।हे ते आले अनुभवा । सत्य जीवा प्रत्यया ।।म्हणजेच नामस्मरणाने मानवी जीवनातील दोष नाहीसे होतात व जीवनाचा उध्दार होतो. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा,पुण्याची गणना कोण करी।भगवंताच्या नामस्मरणाने मनाला शांती मिळते, सकारात्मक विचार वाढीस लागतात, मन सशक्त होते व दु:खावर मात करण्याची शक्ती नामस्मरणानीच येत असते. नामस्मरण हे मनापासून करणे आवश्यक आहे. त्यामागे श्रद्धा, निष्ठा, लीनता, अनन्यता, अखंडता आवश्यक असते. समर्थ रामदासस्वामी म्हणतात,प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।पुढे वैखरी राम आधी वदावा ।।म्हणजेच प्रभातसमयी रामाचे चिंतन करावे. केवळ शांत मनाने रामाचे नाव घेतल्यास संपूर्ण दिवस चांगला जातो. श्री गोंदवलेकर महाराजांनी तर भक्ती मार्गासाठी फक्त नामस्मरणाचा उपाय सांगितला आहे. आज वैद्यकीय शास्त्राने सुद्धा नामस्मरणाचे महत्त्व मान्य केले आहे. संत तुकाराम महाराजसुद्धा नामस्मरणाचे श्रेठत्व सांगतात की, मुखाने सतत नामस्मरण केल्याने मोक्ष हा मिळतोच. सर्व युगात भगवंताचे नामस्मरण करण्यात आले आहे. भक्त प्रल्हादाने विष्णूचे, हनुमंताने रामाचे केलेले नामस्मरण हे आदर्श उदाहरण आहे तेव्हा कलियुगात आपण सर्वजण मन:पूर्वक भगवंताचे नियमित नामस्मरण करू या ! 

टॅग्स :Hinduismहिंदुइझम