शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:12 IST

नुकत्याच प्रसारित झालेल्या दूरदर्शनवरील बातम्यात सांगितले की डॉक्टरांनी ३० वारकरी रुग्णांना सलग दहा दिवस रोज नऊ मिनिटे शांत बसून विठ्ठलाचे नामस्मरण करायला लावले व दहा दिवसानंतर केलेल्या चाचण्यात त्यांचा रक्तदाब, हृदयाचे ठोके व इको रेशोमध्ये सुधारणा झाल्याचे आढळून आले आहे.

- प्रा. संदीप ताटेवारनुकत्याच प्रसारित झालेल्या दूरदर्शनवरील बातम्यात सांगितले की डॉक्टरांनी ३० वारकरी रुग्णांना सलग दहा दिवस रोज नऊ मिनिटे शांत बसून विठ्ठलाचे नामस्मरण करायला लावले व दहा दिवसानंतर केलेल्या चाचण्यात त्यांचा रक्तदाब, हृदयाचे ठोके व इको रेशोमध्ये सुधारणा झाल्याचे आढळून आले आहे. भगवंताच्या नामस्मरणाने हृदयावर कसे सकारात्मक परिणाम होतात याबाबत काही संशोधन लेखसुद्धा आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. मनापासून विठ्ठल शब्द उच्चारल्याने अनाहृत चक्रावर म्हणजेच हृदयावर याचा परिणाम होतो व हृदयाच्या ऊर्जेत वाढ होते असे चाचण्यात सिद्ध झाले आहे. भगवंताच्या नामस्मरणाच्या स्पंदनात शक्ती आहे व त्याच्या नामस्मरणाने विघ्न दूर होतात ही मान्यता अध्यात्मामध्ये बºयाच संत महात्म्यांनी मांडली आहे. म्हणूनंच संत कान्होपात्राने असाच अनुभव विशद केला आहे. ते म्हणतात,नामे दोष जळती । नामे प्राण उद्धरती ।।हे ते आले अनुभवा । सत्य जीवा प्रत्यया ।।म्हणजेच नामस्मरणाने मानवी जीवनातील दोष नाहीसे होतात व जीवनाचा उध्दार होतो. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा,पुण्याची गणना कोण करी।भगवंताच्या नामस्मरणाने मनाला शांती मिळते, सकारात्मक विचार वाढीस लागतात, मन सशक्त होते व दु:खावर मात करण्याची शक्ती नामस्मरणानीच येत असते. नामस्मरण हे मनापासून करणे आवश्यक आहे. त्यामागे श्रद्धा, निष्ठा, लीनता, अनन्यता, अखंडता आवश्यक असते. समर्थ रामदासस्वामी म्हणतात,प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।पुढे वैखरी राम आधी वदावा ।।म्हणजेच प्रभातसमयी रामाचे चिंतन करावे. केवळ शांत मनाने रामाचे नाव घेतल्यास संपूर्ण दिवस चांगला जातो. श्री गोंदवलेकर महाराजांनी तर भक्ती मार्गासाठी फक्त नामस्मरणाचा उपाय सांगितला आहे. आज वैद्यकीय शास्त्राने सुद्धा नामस्मरणाचे महत्त्व मान्य केले आहे. संत तुकाराम महाराजसुद्धा नामस्मरणाचे श्रेठत्व सांगतात की, मुखाने सतत नामस्मरण केल्याने मोक्ष हा मिळतोच. सर्व युगात भगवंताचे नामस्मरण करण्यात आले आहे. भक्त प्रल्हादाने विष्णूचे, हनुमंताने रामाचे केलेले नामस्मरण हे आदर्श उदाहरण आहे तेव्हा कलियुगात आपण सर्वजण मन:पूर्वक भगवंताचे नियमित नामस्मरण करू या ! 

टॅग्स :Hinduismहिंदुइझम