शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

सत्ता, शनि आणि साडेसाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 03:24 IST

हल्ली दिवस भुर्रकन जातात. आजचा दिवसही कसा गेला, हे कळलंच नाही. श्वास घ्यायलाही उसंत नव्हती. सकाळपासून नुस्ती धावपळ...खंडीभर भूमिपूजनं आणि तोंडभर भाषणं!

डायरी: नोंद क्रमांक १७६०स्थळ: वर्षा, वेळ: अपरात्रहल्ली दिवस भुर्रकन जातात. आजचा दिवसही कसा गेला, हे कळलंच नाही. श्वास घ्यायलाही उसंत नव्हती. सकाळपासून नुस्ती धावपळ...खंडीभर भूमिपूजनं आणि तोंडभर भाषणं! आजकाल गडकरी मुंबईत आले की, अशीच दमछाक होते. सकाळी महामार्ग तर दुपारी जलवाहतूक, सायंकाळी जलसंधारण तर रात्री सेमिनार! दमायला होतं नुसतं. बरं हे सगळं फुकटात असतं तर एकवेळ समजू शकलो असतो. पण प्रत्येक कोनशिला लाखभर कोटींची. कुठून आणायचे एवढे पैसे? गडकरींचं बरं आहे. त्यांची वाणी म्हणजे साक्षात कुबेराची टांकसाळ! उचलली जीभ की पाडली नाणी. आपलं काय? तिजोरीच्या नावावर भिक्षुकाची झोळी! तीही फाटकी. एकीकडे ठिगळ लावले की दुसरीकडे फाटते. अकबराचा रांजण जसा शेवटी रिकामाच राहातो. तशी आपली गत. उघडपणे बोलायची सोय नाही, म्हणून डायरीत लिहून ठेवतो. जीएसटीमुळं अक्षरश: कंगाल झालोय. कर्मचाºयांच्या पगाराला देखील पैसे पुरेनात. आशाळभूतपणे केंद्राकडे डोळे लावून बसतो. ते देतील तो तुकडा गोड मानून घेतो. छे! सीएम होण्याऐवजी महापौर झालो असतो तर बरं झालं असतं. असो. निवडणुकीत भलतीसलती आश्वासनं देऊन बसलो. आता ती पुरी करता-करता नाकीनऊ आलेत. तरी गडकरी सांगत होते, टोल बंद करू नका. टोलचा पैसा वर खर्चाला कामी येतो. पण आपणंच त्यांचं ऐकलं नाही. आश्वासनपूर्तीचा उत्साह नडला, दुसरं काय? बरं काहीतरी नवं करून दाखवावं म्हणून ‘समृद्धी’चा घाट घातला, पण तिथेही सतराशेसाठ विघ्न! कसातरी तो मार्ग रेटून नेत असताना मध्येच शेतकºयांचा संप आडवा आला...सोळावं वरीस धोक्याचं म्हणतात. पण माझ्यासाठी तर सतरावंही धोकादायक गेलं! किती संकटं आली? कोपर्डीची घटना, मराठा समाजाचे महामोर्चे, डॉक्टरांचा संप, मुंबई विद्यापीठातील सावळा गोंधळ, कर्जमाफीतील आॅनलाईन घोळ...एकामागून एक संकटांची डेलीसोप मालिकाच सुरू होती. दैव बलवत्तर म्हणून निभावलं. समजा, गुजरातेत दगाफटका झाला असता तर सगळं खापर मुंबईवर फोडलं गेलं असतं!गुजरातवरून आठवलं. आपल्याकडेही कमी दिवस उरलेत. उणेपुरे एकवीस महिने! परवा नाथाभाऊ म्हणाले, दिवस बदलायला वेळ लागत नाही. तर गिरीशभाऊ म्हणे, पुढचं काही खरं नाही! आपलीच माणसं अशी का घाबरवून सोडतात? तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आपण शनिशिंगणापूरला जाऊन आलो आणि संकल्पही केला. ‘हे शनिदेवा, मावळत्या वर्षात खूप संकटं झेलली. आता तरी इडापीडा टळू दे. नवीन वर्ष सुखसमृद्धीचं जाऊ दे. नव्या वर्षात अरबी समुद्रातील छत्रपतीं शिवरायाचं आणि इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकारचं काम मार्गी लागलं की सफोला कंपनीच्या तेलानं (महाग असलं तरी) तुम्हाला अभिषेक घालिन!’शनिशिंगणापूरला जाऊन आल्यापासून निर्धास्त होतो. झोपही चांगली लागली. पण नव्या वर्षाची पहाट कोरेगाव-भीमा घेऊन उजाडली. आई म्हणते तेच खरं. सत्ता हीच खरी साडेसाती असते. विरोधात बसून कुणाचाही ‘शनि’ वक्री करता येतो!इति.- नंदकिशोर पाटील