शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

सत्ता, शनि आणि साडेसाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 03:24 IST

हल्ली दिवस भुर्रकन जातात. आजचा दिवसही कसा गेला, हे कळलंच नाही. श्वास घ्यायलाही उसंत नव्हती. सकाळपासून नुस्ती धावपळ...खंडीभर भूमिपूजनं आणि तोंडभर भाषणं!

डायरी: नोंद क्रमांक १७६०स्थळ: वर्षा, वेळ: अपरात्रहल्ली दिवस भुर्रकन जातात. आजचा दिवसही कसा गेला, हे कळलंच नाही. श्वास घ्यायलाही उसंत नव्हती. सकाळपासून नुस्ती धावपळ...खंडीभर भूमिपूजनं आणि तोंडभर भाषणं! आजकाल गडकरी मुंबईत आले की, अशीच दमछाक होते. सकाळी महामार्ग तर दुपारी जलवाहतूक, सायंकाळी जलसंधारण तर रात्री सेमिनार! दमायला होतं नुसतं. बरं हे सगळं फुकटात असतं तर एकवेळ समजू शकलो असतो. पण प्रत्येक कोनशिला लाखभर कोटींची. कुठून आणायचे एवढे पैसे? गडकरींचं बरं आहे. त्यांची वाणी म्हणजे साक्षात कुबेराची टांकसाळ! उचलली जीभ की पाडली नाणी. आपलं काय? तिजोरीच्या नावावर भिक्षुकाची झोळी! तीही फाटकी. एकीकडे ठिगळ लावले की दुसरीकडे फाटते. अकबराचा रांजण जसा शेवटी रिकामाच राहातो. तशी आपली गत. उघडपणे बोलायची सोय नाही, म्हणून डायरीत लिहून ठेवतो. जीएसटीमुळं अक्षरश: कंगाल झालोय. कर्मचाºयांच्या पगाराला देखील पैसे पुरेनात. आशाळभूतपणे केंद्राकडे डोळे लावून बसतो. ते देतील तो तुकडा गोड मानून घेतो. छे! सीएम होण्याऐवजी महापौर झालो असतो तर बरं झालं असतं. असो. निवडणुकीत भलतीसलती आश्वासनं देऊन बसलो. आता ती पुरी करता-करता नाकीनऊ आलेत. तरी गडकरी सांगत होते, टोल बंद करू नका. टोलचा पैसा वर खर्चाला कामी येतो. पण आपणंच त्यांचं ऐकलं नाही. आश्वासनपूर्तीचा उत्साह नडला, दुसरं काय? बरं काहीतरी नवं करून दाखवावं म्हणून ‘समृद्धी’चा घाट घातला, पण तिथेही सतराशेसाठ विघ्न! कसातरी तो मार्ग रेटून नेत असताना मध्येच शेतकºयांचा संप आडवा आला...सोळावं वरीस धोक्याचं म्हणतात. पण माझ्यासाठी तर सतरावंही धोकादायक गेलं! किती संकटं आली? कोपर्डीची घटना, मराठा समाजाचे महामोर्चे, डॉक्टरांचा संप, मुंबई विद्यापीठातील सावळा गोंधळ, कर्जमाफीतील आॅनलाईन घोळ...एकामागून एक संकटांची डेलीसोप मालिकाच सुरू होती. दैव बलवत्तर म्हणून निभावलं. समजा, गुजरातेत दगाफटका झाला असता तर सगळं खापर मुंबईवर फोडलं गेलं असतं!गुजरातवरून आठवलं. आपल्याकडेही कमी दिवस उरलेत. उणेपुरे एकवीस महिने! परवा नाथाभाऊ म्हणाले, दिवस बदलायला वेळ लागत नाही. तर गिरीशभाऊ म्हणे, पुढचं काही खरं नाही! आपलीच माणसं अशी का घाबरवून सोडतात? तरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आपण शनिशिंगणापूरला जाऊन आलो आणि संकल्पही केला. ‘हे शनिदेवा, मावळत्या वर्षात खूप संकटं झेलली. आता तरी इडापीडा टळू दे. नवीन वर्ष सुखसमृद्धीचं जाऊ दे. नव्या वर्षात अरबी समुद्रातील छत्रपतीं शिवरायाचं आणि इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकारचं काम मार्गी लागलं की सफोला कंपनीच्या तेलानं (महाग असलं तरी) तुम्हाला अभिषेक घालिन!’शनिशिंगणापूरला जाऊन आल्यापासून निर्धास्त होतो. झोपही चांगली लागली. पण नव्या वर्षाची पहाट कोरेगाव-भीमा घेऊन उजाडली. आई म्हणते तेच खरं. सत्ता हीच खरी साडेसाती असते. विरोधात बसून कुणाचाही ‘शनि’ वक्री करता येतो!इति.- नंदकिशोर पाटील