शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

पराभूतांचा शिमगा; ईव्हीएमचे कवित्व!

By admin | Updated: March 6, 2017 23:49 IST

लोकशाहीतील निवडणूक प्रणालीवरील प्रश्नचिन्ह कायमस्वरूपी मिटविण्यासाठी आता आयोगानेच पुढाकार घेतला पाहिजे.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील निवडणूक प्रणालीवरील प्रश्नचिन्ह कायमस्वरूपी मिटविण्यासाठी आता आयोगानेच पुढाकार घेतला पाहिजे. इव्हीएम तज्ज्ञांना उपलब्ध करून देऊन एकदाची खातरजमा करून घ्यायला काय हरकत आहे?भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठीच्या शर्यतीतून माघार घेण्यासोबतच, महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांचा धुराळा आता पूर्णत: खाली बसला आहे. अर्थात, निवडणुकांचा धुराळा खाली बसला असला तरी, पराभूतांचा शिमगा अन् इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजेच इव्हीएमचे कवित्व मात्र अद्यापही सुरूच आहे.राज्यातील इतर नऊ महापालिका निवडणुकांसोबतच, अकोला महापालिकेची निवडणूकही पार पडली. एकूण ८० पैकी तब्बल ४८ जागा जिंकून प्रथमच एकहाती सत्ता मिळवित, भाजपाने इतिहास रचला ! तमाम प्रसारमाध्यमे, गुप्तचर वार्ता पोलीस तसेच सटोडिये भाजपाला ३५ पेक्षा जास्त द्यायला तयार नसताना, त्या पक्षाने घेतलेली अभूतपूर्व झेप विरोधकांच्या मात्र पचनी पडलेली नाही. त्यामुळे निकालाच्या दिवशी दुपारपासूनच भाजपाचे यश निर्भेळ नसल्याचा शिमगा अकोल्यात सुरू झाला अन् त्या निमित्ताने सुरू झालेले इव्हीएमचे कवित्व तर अद्यापही सुरूच आहे. अर्थात हा शिमगा अन् कवित्व काही एकट्या अकोल्यातच सुरू नाही. महापालिका निवडणूक पार पडलेल्या शहरांपैकी मुंबई व ठाणेवगळता इतर सर्वच शहरांमध्ये ते कमीअधिक फरकाने सुरूच आहे.अकोल्यात त्याची तीव्रता जरा जास्त आहे, एवढेच ! इव्हीएमच्या विरोधातील ही ओरड प्रथमच होत आहे, असे नाही. भाजपानेही पूर्वी पराभवासाठी इव्हीएमला धारेवर धरलेले आहे. त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी २००९मध्ये इव्हीएमबद्दल शंका प्रकट केल्या होत्या. भाजपाचे प्रवक्ते असलेले विचारवंत जीव्हीएल नरसिंह राव यांनी तर या विषयावर ‘डेमॉक्रसी अ‍ॅट रिस्क-कॅन वुई ट्रस्ट अवर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स?’ या शीर्षकाचे एक पुस्तकच लिहिले आहे. त्या पुस्तकाची प्रस्तावना अडवाणींनी लिहिली आहे. अडवाणींनी इव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, तेव्हा कॉँग्रेसने त्यांना उडवून लावले होते. आज तोच कॉँग्रेस पक्ष जे अडवाणींनी केले होते तेच करीत आहे.ज्याप्रमाणे २००९ मध्ये केवळ ओरडच झाली, कोणतेही निर्विवाद पुरावे समोर आले नाहीत, त्याप्रमाणेच आजही केवळ ओरडच सुरू आहे. जर सत्ताधारी या नात्याने भाजपाला इव्हीएममध्ये गडबड करण्याची सुविधा उपलब्ध होती, तर त्या पक्षाला ते मुंबई व ठाण्यातही का जमवता आले नाही? अकोल्यात एक उमेदवार अवघ्या दोन मतांच्या फरकाने निवडून आणण्याऐवजी दोनेकशे मतांच्या फरकांनी का विजयी करता आला नाही? या साध्या, सोप्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज इव्हीएमच्या विरोधात गजर करणाऱ्यांना वाटत नाही. अर्थात, इव्हीएममध्ये गडबड शक्यच नाही, असे प्रमाणपत्र देऊनही चालणार नाही; कारण राजकीय पक्षांनीच नव्हे, तर संगणक व इलेक्ट्रॉॅनिक तज्ज्ञांनीही वेळोवेळी इव्हीएमवर प्रश्नचिन्हं उपस्थित केली आहेत. हरी के. प्रसाद, जे. अ‍ॅलेक्स हॉल्डर्मन आणि रॉप खॉँख्रेप या संगणक तज्ज्ञांनी ‘इंडियाज इव्हीएमस् आर व्हल्नरेबल टू फ्रॉड’ या शीर्षकाचे संकेतस्थळ तयार करून, भारतीय इव्हीएममध्ये गडबड करणे सहज शक्य असल्याचा दावाच केला आहे. या संकेतस्थळावर लेखकांबद्दल माहिती आहे, ‘टेक्निकल पेपर’ आहेत, चित्रफिती आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने मात्र त्यांचा दावा साफ फेटाळून लावला आहे. प्रसाद, हॉॅल्डर्मन व खॉँख्रेप यांनी वापरलेले इव्हीएम आमचे नव्हते, असे सांगून आयोगाने त्यावेळी त्यांना उडवून लावले होते; पण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील निवडणूक प्रणालीवरील प्रश्नचिन्ह कायमस्वरूपी मिटविण्यासाठी आता आयोगानेच पुढाकार घेतला पाहिजे. इव्हीएम तज्ज्ञांना उपलब्ध करून देऊन एकदाची खातरजमा करून घ्यायला काय हरकत आहे?- रवि टाले