शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

सत्ता डोक्यात जाणे

By admin | Updated: March 2, 2016 02:48 IST

शरद पवारांनी केवळ महाराष्ट्रातील भाजपा-सेना युतीच्याच डोक्यात सत्ता गेल्याचे विधान का करावे हे त्यांचे त्यानाच ठाऊक. जर सत्ताधारी पक्षाच्या लोकानी पोलिसाना आणि निरपराधाना वेठीस धरुन

शरद पवारांनी केवळ महाराष्ट्रातील भाजपा-सेना युतीच्याच डोक्यात सत्ता गेल्याचे विधान का करावे हे त्यांचे त्यानाच ठाऊक. जर सत्ताधारी पक्षाच्या लोकानी पोलिसाना आणि निरपराधाना वेठीस धरुन त्यांच्यावर हल्ले करणे हे जर सत्ता डोक्यात जाण्याचे लक्षण असेल तर मग आज केन्द्रात जे काही सुरु आहे ते पाहाता केन्द्र सरकारच्या तर सत्ता डोक्याच्याही वरतून वाहू लागली आहे असेच म्हणावे लागेल. पण पवार तसे म्हणत नाहीत. पण म्हणून ते जे काही बोलले त्याचे गांभीर्य कमी होत नाही. याचे साधे कारण म्हणजे त्यांचे बोल हे अनेकांगांनी अनुभवाचे बोल आहेत! सत्ता येते आणि जाते पण जेव्हा ती येते तेव्हा सत्ताधीशांनी आपले पाय जमिनीवरच ठेवायचे असतात असा योग्य सल्ला त्यांनी युतीला दिला आहे. हाच सल्ला त्यांनी त्यांचे पुतणे अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, लक्ष्मणराव ढोबळे आदि प्रभ्रृतीना दिला होता वा नाही हे कळायला मार्ग नाही. बहुधा दिलाच असणार पण ‘घर की मुर्गी दाल बराबर’ सारखा काही प्रकार झाला असावा. त्यामुळे असेही म्हणता येईल की आज पवारांनी युतीच्या लोकांचे नाव घेतले असले तरी त्यामागील अंतस्थ हेतू ‘लेकी बोले’ असाही असू शकेल. युतीच्या याआधीच्या सत्तेला राज्यातील जनता वैतागली होती आणि म्हणूनच तिने आघाडीला अनिच्छेने का होईना वरले होते. पवार आज युतीच्या लोकाना जो सल्ला देत आहेत तो त्यांनी आघाडीला दिला असता आणि चुकून दिला असल्यास आघाडीकरांनी तो मनावर घेतला असता तर कदाचित आज त्यांच्यावर युतीला असे उपदेशामृत पाजण्याची वेळच आली नसती. आपण दोषींना पाठीशी घालणार नाही असा वज्रनिर्धारही पवारांनी पुन्हा एकदा बोलून दाखविला आहे. आघाडी सरकारमधील त्यांचे एक मंत्री भास्कर जाधव यांनी त्यांच्या घरातील मंगल कार्यात कोकणामध्ये केलेली उधळपट्टी पाहून पवारांच्या डोळ्यात म्हणे अश्रू उभे राहिले होते व त्यावर जाधवांनी म्हणे क्षमापना केली होती. त्याला फार दिवस झाले नाहीत. पण पवारांच्या डोळ्यातील अश्रू आणि आपणच मागितलेली क्षमा गुंडाळून ठेऊन याच भास्कररावांनी तोच प्रयोग नाशकात अगदी अलीकडे केला. राज्यातील दुष्काळ पाहून बहुधा त्यांनी अन्नदानाचे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी तर हा प्रयोग लावला नव्हता? असेल तसेही असेल. कारण कशालाही तात्विक मुलामा देण्यात राष्ट्रवादींचा हात कोण धरु शकतो?