शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

सत्ता डोक्यात जाणे

By admin | Updated: March 2, 2016 02:48 IST

शरद पवारांनी केवळ महाराष्ट्रातील भाजपा-सेना युतीच्याच डोक्यात सत्ता गेल्याचे विधान का करावे हे त्यांचे त्यानाच ठाऊक. जर सत्ताधारी पक्षाच्या लोकानी पोलिसाना आणि निरपराधाना वेठीस धरुन

शरद पवारांनी केवळ महाराष्ट्रातील भाजपा-सेना युतीच्याच डोक्यात सत्ता गेल्याचे विधान का करावे हे त्यांचे त्यानाच ठाऊक. जर सत्ताधारी पक्षाच्या लोकानी पोलिसाना आणि निरपराधाना वेठीस धरुन त्यांच्यावर हल्ले करणे हे जर सत्ता डोक्यात जाण्याचे लक्षण असेल तर मग आज केन्द्रात जे काही सुरु आहे ते पाहाता केन्द्र सरकारच्या तर सत्ता डोक्याच्याही वरतून वाहू लागली आहे असेच म्हणावे लागेल. पण पवार तसे म्हणत नाहीत. पण म्हणून ते जे काही बोलले त्याचे गांभीर्य कमी होत नाही. याचे साधे कारण म्हणजे त्यांचे बोल हे अनेकांगांनी अनुभवाचे बोल आहेत! सत्ता येते आणि जाते पण जेव्हा ती येते तेव्हा सत्ताधीशांनी आपले पाय जमिनीवरच ठेवायचे असतात असा योग्य सल्ला त्यांनी युतीला दिला आहे. हाच सल्ला त्यांनी त्यांचे पुतणे अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, लक्ष्मणराव ढोबळे आदि प्रभ्रृतीना दिला होता वा नाही हे कळायला मार्ग नाही. बहुधा दिलाच असणार पण ‘घर की मुर्गी दाल बराबर’ सारखा काही प्रकार झाला असावा. त्यामुळे असेही म्हणता येईल की आज पवारांनी युतीच्या लोकांचे नाव घेतले असले तरी त्यामागील अंतस्थ हेतू ‘लेकी बोले’ असाही असू शकेल. युतीच्या याआधीच्या सत्तेला राज्यातील जनता वैतागली होती आणि म्हणूनच तिने आघाडीला अनिच्छेने का होईना वरले होते. पवार आज युतीच्या लोकाना जो सल्ला देत आहेत तो त्यांनी आघाडीला दिला असता आणि चुकून दिला असल्यास आघाडीकरांनी तो मनावर घेतला असता तर कदाचित आज त्यांच्यावर युतीला असे उपदेशामृत पाजण्याची वेळच आली नसती. आपण दोषींना पाठीशी घालणार नाही असा वज्रनिर्धारही पवारांनी पुन्हा एकदा बोलून दाखविला आहे. आघाडी सरकारमधील त्यांचे एक मंत्री भास्कर जाधव यांनी त्यांच्या घरातील मंगल कार्यात कोकणामध्ये केलेली उधळपट्टी पाहून पवारांच्या डोळ्यात म्हणे अश्रू उभे राहिले होते व त्यावर जाधवांनी म्हणे क्षमापना केली होती. त्याला फार दिवस झाले नाहीत. पण पवारांच्या डोळ्यातील अश्रू आणि आपणच मागितलेली क्षमा गुंडाळून ठेऊन याच भास्कररावांनी तोच प्रयोग नाशकात अगदी अलीकडे केला. राज्यातील दुष्काळ पाहून बहुधा त्यांनी अन्नदानाचे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी तर हा प्रयोग लावला नव्हता? असेल तसेही असेल. कारण कशालाही तात्विक मुलामा देण्यात राष्ट्रवादींचा हात कोण धरु शकतो?