शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता

By admin | Updated: January 24, 2015 00:29 IST

काँग्रेसच्या दुसऱ्या राजवटीच्या अध:पतनाची नेपथ्यरचना २०११ सालीच तयार केली गेली होती.

काँग्रेसच्या दुसऱ्या राजवटीच्या अध:पतनाची नेपथ्यरचना २०११ सालीच तयार केली गेली होती. त्या काळात एका बाजूला मनमोहन सिंग सरकार टूजी आणि कॉमन वेल्थ गेम्स यावरून होणाऱ्या आरोपांचा सामना करत होते, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्याच काही सहकाऱ्यांनी बाबा रामदेवसमोर लोटांगण घातले होते. अर्थव्यवस्थासुद्धा गोंधळलेल्या अवस्थेत होती. यात भर म्हणजे अण्णा हजारे यांना आधुनिक गांधी म्हणून पुढे करण्यात आले होते. आज चार वर्षांनंतर अण्णा राळेगण सिद्धीत अज्ञातवासात गेल्यासारखे आहेत, तर त्यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातले समर्थक नवीन अवतारात राष्ट्रीय स्तरावर परतले आहेत. त्याकाळी केजरीवाल आणि किरण बेदी एकाच बाजूला होते. दोघेही मेगॅसेसे पुरस्कार विजेते. अण्णांच्या आंदोलनातल्या त्यांच्या सहभागाने मध्यमवर्गाची सहानुभूती अण्णांना मिळाली आणि आधीपासूनच भ्रष्टाचाराविरोधातली जनसामान्यांची चीड उफाळून आली. केजरीवाल आणि बेदी दोघेही मध्यमवर्गाचे हिरो झाले. पहिल्या महिला आय.पी.एस. अधिकारी म्हणून किरण बेदी यांची ओळख होतीच; शिवाय कायदा आणि सुव्यवस्था राखताना त्यांनी दाखवलेला कणखरपणाही सगळ्यांना माहीत होता. अरविंद केजरीवालसुद्धा माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून सर्वश्रुत झाले होते. आयआयटीयन आणि आय.आर.एस. अधिकारी असूनही त्यांनी जन-सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासकीय नोकरीवर पाणी सोडले होते. रामलीला मैदानावरच्या व्यासपीठावरून डॉ. बेदींनी राजकारण्यांची उडवलेली जहाल खिल्ली आणि त्यावेळी उच्चारलेले ‘सब नेता चोर है’ हे शब्द सहज विसरण्यासारखे नाहीत. केजरीवालसुद्धा मुख्य राजकीय पक्षांवर टीका करण्यात मागे नव्हते. कॉँग्रेस आणि भाजपा या भ्रष्टाचाराच्या नाण्याच्याच दोन बाजू असल्याचे ते ठासून सांगत होते. राजकारणापासून दूर राहण्याच्या भूमिकेने आणि जनसामान्यांमध्ये राजकारण्यांविषयी असलेल्या रागामुळे त्यांना एका मर्यादेपर्यंत नैतिक सरशी मिळवून दिली होती. आज बदललेल्या परिस्थितीत केजरीवाल आणि बेदी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. एकेकाळचे सहकारी आता एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी बनले आहेत. त्यावेळी ते संसदेला घेराव घालण्यासाठी उत्सुक होते, तर आता ते स्वत:च तिथे निवडून जाण्यासाठी आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी धडपडत आहेत. भाजपात सामील होण्याची बेदींची भूमिका निवडणुकीपूर्वी खुबीने घडवून आणलेल्या संधिसाधूपणाचे उदाहरण आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी केजरीवाल विरुद्ध बेदी या संघर्षाने भारतीय राजकारणाला आता नवे वळण मिळाले आहे. प्रदीर्घ काळापासून भारतीय राजकारण पारंपरिक प्रभावाखाली होते. कॉँग्रेसमधल्या प्रस्थापित घराणेशाहीने इतरांना नेहमीच संधी नाकारली, तर भाजपातले प्रस्थापित आपापली स्थाने घट्ट धरून आहेत. केजरीवाल-बेदी व्यावसायिक राजकारणी नसले, तरी राजकारणात संधी शोधणाऱ्या मध्यमवर्गाचे ते नक्कीच प्रतिनिधी झाले आहेत. केजरीवालांचे व्यक्तिमत्त्व उत्साह आणि उत्सुकतेने भारलेले असले, तरी केवळ ४९ दिवसांत सत्ता सोडण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या पाठीराख्यांचा भ्रमनिरास करणारा ठरला होता. तरीही सध्याच्या लढतीतले ते एक प्रबळ दावेदार आहेत. दोन मोठ्या पक्षातल्या पारंपरिक राजकारणाला पर्याय शोधू पाहणाऱ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरू शकतात. या निवडणुकीत भाजपा जिंकून बेदी मुख्यमंत्री होणार असतील, तर सलग दोन पिढ्या मोठ्या पदांना चिकटून राहिलेल्या नेतृत्वाचा तो अंत असेल आणि साहजिकच पुढील काळात पक्षांतर्गत मतभेद उफाळून येतील. पण जर किरण बेदी नरेंद्र मोदींच्या दिल्लीतल्या वरकरणी का होईना, प्रतिनिधी म्हणून पुढे करण्यात आल्या, तर उफाळून येणाऱ्या पक्षांतर्गत मतभेदांना पुरेसा वाव मिळणार नाही. कारण नरेंद्र मोदींची असलेली ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमा. अभिनेत्रीपासून राजकारणी झालेल्या स्मृती इराणी हे याबाबतचे सर्वोत्तम उदाहरण आहे. केजरीवाल किंवा बेदींचे राजकारणातले यश इतर व्यवसायातून औपचारिक राजकारणात संधी शोधणाऱ्यांच्या आशा पल्लवित करणारे असू शकेल. राजकारण हा ‘डर्टी बिजनेस’ आहे आणि तिथे प्रामाणिक आणि बुद्धिवंतांना जागा नाही असाच समज टीम अण्णाकडून पसरवला गेला होता. अण्णांची क्रांती एव्हाना मृतप्राय आणि देशाला बळकट लोकपाल देण्यात अपयशी ठरली असली, तरी नवीन चेहऱ्यांना राजकारणात संधी उपलब्ध करून देण्याचे काम तिने केले आहे, हे नक्की. ताजा कलम : बेदी आणि केजरीवाल यांची राजकारणातली उपस्थिती सकारात्मकता दर्शवत असली तरी काही गोष्टी बदललेल्या नाहीत. किरण बेदींनी मोदींवर उधळलेली स्तुतिसुमने हेच दाखवून देतात की, लांगुलचालनाचे राजकारण आजदेखील जिवंत आहे आणि त्याची चलतीदेखील आहे. राजदीप सरदेसाईज्येष्ठ संपादक-स्तंभलेखक