शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

धोक्यातील पूर्वांचल

By admin | Updated: October 5, 2016 03:52 IST

पाकव्याप्त काश्मीरात जाऊन भारतीय सेनेने केलेल्या सीमोल्लंघनाला सारा देश सलाम करीत असतानाच भारताच्या पूर्व सीमेवरच्या फौजफाट्याला पुरेशी रसद मिळते आहे

पाकव्याप्त काश्मीरात जाऊन भारतीय सेनेने केलेल्या सीमोल्लंघनाला सारा देश सलाम करीत असतानाच भारताच्या पूर्व सीमेवरच्या फौजफाट्याला पुरेशी रसद मिळते आहे वा नाही याकडेही तातडीने लक्ष देण्याची आज वेळ आहे. पश्चिमेसारखीच परिस्थिती उद्या पूर्व सीमेवर उद्भवली तर बलाढ्य चीनच्या सेनेचा सामना करण्याइतपत भारतीय सैन्यदलांची ‘तयारी’ आहे का? गेली काही वर्षे त्या भागातील विकासाचे आणि अशांततेचे प्रश्न धारदार बनत चालले आहेत. पूर्व सीमेकडे किती तातडीने व डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला हवे, याचे ताजे उदाहरण म्हणजे अरुणाचल प्रदेशच्या अंजाव जिल्ह्यात, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (लाइन आॅफ अ‍ॅक्चुअल कण्ट्रोल-एलएसी) आत ४५ किलोमीटर चिनी सैन्यानं टाकलेले तंबू. भारतीय भूभागात दाखल होत हा आपलाच भाग असल्याचा दावाही चिनी सैन्याने केला. अंजाव हा अरुणाचल प्रदेशातला अत्यंत छोटा जिल्हा. फक्त २२२ गावे आणि प्रतिकिलोमीटर तीनच माणसं इतकी घनता. घनदाट अरण्य. बॉर्डरपर्यंत जायचं तर रस्ते नाहीत, सैन्याची वाहनंही काही विशिष्ट अंतरच जाऊ शकतात. तिथून पुढे सैन्याचा पायीच प्रवास. पलीकडे डोक्यावर उभा चीन. तिकडे चिनी सरकारने थेट भारतीय सीमेपर्यंत बांधलेल्या हायवेवरुन चिनी सैन्य थेट भारतीय भूभागात येऊ शकते. या भागात लोकसंख्या अत्यंत विरळ असल्याने जंगलात कुठवर चिनी सैन्य आले हे कळायलाही काही दिवस उलटावे लागतात. यावेळी जेव्हा पेट्रोलिंगवर गेलेल्या भारतीय सैन्याला चिनी सैन्य दिसले तोपर्यंत त्यांनी तात्पुरते पूल, तात्पुरत्या राहुट्या उभ्या केल्या होत्या. मागे हटायला अर्थातच मनाईही केली. शेवटी दोन्ही देशांनी ध्वजबैठक बोलावली आणि हा प्रश्न तात्पुरता सोडवला. पूर्व सीमेवर एकीकडे अशी दादागिरी सुरु असतानाच आता अरुणाचल प्रदेश फ्रण्टीअर हायवेचे कामही सुरु आहे. चीन आणि बांगलादेशला जोडत हा हायवे भारत आणि म्यानमारमधून जाणार आहे. या हायवेमुळे अरुणाचलातल्या दुर्गम भागात रोजगार आणि पर्यटन वाढेल आणि चीनच्या कारवायांना आळा बसेल असा जाणकारांचा कयास आहे. ते होईल तेव्हा होईल, मात्र पूर्व सीमेकडे सरकारचे दुर्लक्ष होते आहे म्हणताना ‘भारतीय’ म्हणवून घेणाऱ्या बहुसंख्य सामान्य जनतेलाही अरुणाचल आणि चीनची सीमा नक्की कुठे आहे, हे सहजी सांगता यायचे नाही. पूर्व सीमेचे, तिथल्या माणसांचे हे तुटलेपण आणि त्याकडे भारतीय जनतेचे होणारे अक्षम्य दुरावलेपण, दुर्लक्ष्य हे चिनी घुसखोरीपेक्षाही घातक आहे हे नक्की!