शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

धोक्यातील पूर्वांचल

By admin | Updated: October 5, 2016 03:52 IST

पाकव्याप्त काश्मीरात जाऊन भारतीय सेनेने केलेल्या सीमोल्लंघनाला सारा देश सलाम करीत असतानाच भारताच्या पूर्व सीमेवरच्या फौजफाट्याला पुरेशी रसद मिळते आहे

पाकव्याप्त काश्मीरात जाऊन भारतीय सेनेने केलेल्या सीमोल्लंघनाला सारा देश सलाम करीत असतानाच भारताच्या पूर्व सीमेवरच्या फौजफाट्याला पुरेशी रसद मिळते आहे वा नाही याकडेही तातडीने लक्ष देण्याची आज वेळ आहे. पश्चिमेसारखीच परिस्थिती उद्या पूर्व सीमेवर उद्भवली तर बलाढ्य चीनच्या सेनेचा सामना करण्याइतपत भारतीय सैन्यदलांची ‘तयारी’ आहे का? गेली काही वर्षे त्या भागातील विकासाचे आणि अशांततेचे प्रश्न धारदार बनत चालले आहेत. पूर्व सीमेकडे किती तातडीने व डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला हवे, याचे ताजे उदाहरण म्हणजे अरुणाचल प्रदेशच्या अंजाव जिल्ह्यात, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (लाइन आॅफ अ‍ॅक्चुअल कण्ट्रोल-एलएसी) आत ४५ किलोमीटर चिनी सैन्यानं टाकलेले तंबू. भारतीय भूभागात दाखल होत हा आपलाच भाग असल्याचा दावाही चिनी सैन्याने केला. अंजाव हा अरुणाचल प्रदेशातला अत्यंत छोटा जिल्हा. फक्त २२२ गावे आणि प्रतिकिलोमीटर तीनच माणसं इतकी घनता. घनदाट अरण्य. बॉर्डरपर्यंत जायचं तर रस्ते नाहीत, सैन्याची वाहनंही काही विशिष्ट अंतरच जाऊ शकतात. तिथून पुढे सैन्याचा पायीच प्रवास. पलीकडे डोक्यावर उभा चीन. तिकडे चिनी सरकारने थेट भारतीय सीमेपर्यंत बांधलेल्या हायवेवरुन चिनी सैन्य थेट भारतीय भूभागात येऊ शकते. या भागात लोकसंख्या अत्यंत विरळ असल्याने जंगलात कुठवर चिनी सैन्य आले हे कळायलाही काही दिवस उलटावे लागतात. यावेळी जेव्हा पेट्रोलिंगवर गेलेल्या भारतीय सैन्याला चिनी सैन्य दिसले तोपर्यंत त्यांनी तात्पुरते पूल, तात्पुरत्या राहुट्या उभ्या केल्या होत्या. मागे हटायला अर्थातच मनाईही केली. शेवटी दोन्ही देशांनी ध्वजबैठक बोलावली आणि हा प्रश्न तात्पुरता सोडवला. पूर्व सीमेवर एकीकडे अशी दादागिरी सुरु असतानाच आता अरुणाचल प्रदेश फ्रण्टीअर हायवेचे कामही सुरु आहे. चीन आणि बांगलादेशला जोडत हा हायवे भारत आणि म्यानमारमधून जाणार आहे. या हायवेमुळे अरुणाचलातल्या दुर्गम भागात रोजगार आणि पर्यटन वाढेल आणि चीनच्या कारवायांना आळा बसेल असा जाणकारांचा कयास आहे. ते होईल तेव्हा होईल, मात्र पूर्व सीमेकडे सरकारचे दुर्लक्ष होते आहे म्हणताना ‘भारतीय’ म्हणवून घेणाऱ्या बहुसंख्य सामान्य जनतेलाही अरुणाचल आणि चीनची सीमा नक्की कुठे आहे, हे सहजी सांगता यायचे नाही. पूर्व सीमेचे, तिथल्या माणसांचे हे तुटलेपण आणि त्याकडे भारतीय जनतेचे होणारे अक्षम्य दुरावलेपण, दुर्लक्ष्य हे चिनी घुसखोरीपेक्षाही घातक आहे हे नक्की!