शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
4
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
5
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
6
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
7
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
8
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
9
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
10
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
11
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
12
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
13
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
14
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
15
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
16
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
17
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
18
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
19
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
20
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर

प्रदूषण : पिट्सबर्ग आणि चंद्रपूर

By admin | Updated: June 6, 2017 04:20 IST

जी-२० राष्ट्रांची शिखर परिषद २००९ मध्ये अमेरिकेच्या पेनसिल्व्हानिया या राज्यातील पिट्सबर्ग येथे भरली होती.

जी-२० राष्ट्रांची शिखर परिषद २००९ मध्ये अमेरिकेच्या पेनसिल्व्हानिया या राज्यातील पिट्सबर्ग येथे भरली होती. त्या परिषदेसाठी त्या शहराची निवड करण्याचे कारण प्रदूषणाने त्याची केलेली वाताहत आणि त्या पडझडीतून त्याने घेतलेली उभारी हे होते. एक शहर वा राष्ट्र आपल्या परिश्रमाने सर्व क्षेत्रात केवढी उंची गाठू शकते याचा पिट्सबर्र्गने घालून दिलेला आदर्श तेव्हाचे अध्यक्ष बराक ओबामा यांना जगातील राष्ट्रप्रमुखांना दाखवायचा होता. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेला लागणाऱ्या पोलाद, अ‍ॅल्युमिनियम, कोळसा, मँगेनीज आणि तशाच साऱ्या खनिजांनी पिट्सबर्र्र्ग समृद्ध होते. त्या काळात त्या शहराभोवती जे प्रचंड उत्खनन होऊन त्याच्या पर्यावरणाचा जो विध्वंस झाला त्यात त्यातली हजारो माणसे मृत्युमुखी पडली. हजारोंनी ते शहर सोडले. कामगारांपाठोपाठ खाण मालकांनाही इतर शहरांचा आश्रय घ्यावा लागला. पाहता पाहता सहा लक्ष लोकसंख्या असलेल्या पिट्सबर्र्गमध्ये मग अवघे २० हजार लोक उरले. त्यांची घरे, चर्चेस, पूजास्थाने आणि स्मारके तशीच राखेच्या ढिगाऱ्यांखाली वर्षानुवर्षे राहिली. एका जिवंत शहराचे स्मशानात रूपांतर होऊन गेले. मग त्या ऐतिहासिक शहराचे देशावरील उपकार स्मरून अमेरिकेच्या राज्यकर्त्यांनी त्याच्या नव्या उभारणीची सुरुवात या शतकाच्या आरंभी केली. आज ते अमेरिकेतले एक सुंदर व देखणे शहर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. तेथील तीन नद्यांच्या पाण्याचा वापर तेथील व्यवस्थेने ज्या कल्पकतेने केला त्यामुळे शहर केवळ हिरवेगारच झाले नाही तर त्याच्या रस्त्यांच्या कडेने सशांचे थवे धावताना दिसू लागले. त्याची लोकसंख्या आता तीन लाखांवर गेली आहे. जी-२० परिषदेला आलेल्या भारताच्या डॉ. मनमोहनसिंगांसह सगळ्याच राष्ट्रप्रमुखांनी त्याच्या या कायापालटाची मनापासून प्रशंसा केली. काल झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या शहराची स्फूर्तिदायी आठवण साऱ्यांना होणे स्वाभाविक आहे. त्याचवेळी आपल्या महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशात असलेले चंद्रपूर शहर हे जगातील प्रदूषणाचे सर्वात मोठे केंद्र बनले असल्याच्या दुसऱ्या दुर्दैवी बाबीचा उल्लेखही येथे करणे भाग आहे. दीड डझनांहून अधिक कोळसा खाणी आणि तेवढ्याच संख्येने त्या शहराभोवती उभ्या झालेल्या सिमेंटच्या कारखान्यांनी त्याचे पर्यावरण पार काळेकुट्ट करून टाकले आहे. इंटरनेटच्या पडद्यावर हे शहर दिसेनासे करणारा काळ्या ढगांचा डाग त्यावर पाहता येणारा आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सगळ्या पर्यावरणप्रेमींच्या आक्रोशाचा विषय व्हावा असे हे प्रकरण आहे. त्यातून त्या शहरात कोळशावर वीजनिर्मिती करणारे अजस्र प्रकल्प आहेत. शहरातून कोळसा वाहून नेणाऱ्या हजारो मालमोटारी तेथे आहेत. या साऱ्या भीषण परिस्थितीची वेळीच काळजी न घेतल्याने त्या शहरातील व त्याच्या सभोवतीच्या गावांतील ७० टक्क्यांएवढी अल्पवयीन मुले श्वसनाच्या व फुफ्फुसाच्या आजाराने बाधित झाली आहेत. शहरात मोठे रोग साथीच्या आजारासारखे पसरू लागले आहेत. वैद्यकीय व्यवसाय जोरात आणि शहरातली औषधांची दुकाने ग्राहकांनी भरली आहेत. एक केंद्रीय मंत्री, एक राज्यस्तरावरील कॅबिनेट मंत्री, सत्ताधारी पक्षाचा आमदार, त्याच पक्षाची महापालिका आणि जिल्हा परिषद असे सारे असताना आणि अतिशय कार्यक्षम अधिकाऱ्यांचा वर्ग तेथे एकवटला असतानाही चंद्रपूर शहरावरचे हे काळे संकट त्यांना दूर करता येत नसेल तर त्यांच्या प्रयत्नात केवळ अपुरेपणाच नव्हे तर खोट आहे असेच म्हणणे भाग आहे. पर्यावरण रक्षकांच्या अनेक संघटना व चळवळी तेथे कार्यरत आहेत. मात्र त्यांच्या प्रयत्नांची व स्थानिक अल्पवयीन मुलांच्या आजारांची दखल गंभीरपणे घ्यावी असे सरकारला अजून वाटत नाही. राजकारण्यांना त्याचे घेणे-देणे नाही. मात्र ज्यांच्या घरातली मुले या प्रदूषणाने बाधित झाली आहेत त्यांच्या व्यथा मोठ्या आहेत. शहरात प्रवेश करतानाच ते काळ्या धुराने वेढले आहे याची जाणीव तेथे येणाऱ्या प्रत्येकाला होते. सायंकाळी तर हा धूर अधिक गडद होतो आणि कोळशाचे बारीक कण जमिनीवर अंथरल्यासारखे पडलेले दिसतात. पिट्सबर्गची आरंभीची दुर्दैवी कहाणी कोणत्याही जाणकाराला आता चंद्रपूर किंवा वणीसारख्या शहरांत अनुभवता येणारी आहे. या प्रकाराला आळा घालणे वा त्यासाठी प्रयत्न करणे अजूनही कोणाला गरजेचे व तातडीचे न वाटणे हा यातील सर्वात गंभीर प्रकार आहे. अमेरिकेसारखे जगातील सर्वात मोठे प्रदूषक राष्ट्र आता पर्यावरणाच्या रक्षणासाठी १९५ देशांनी केलेल्या पॅरिस करारातून बाहेर पडले आहे. त्यावर होणाऱ्या टीकेची त्याला पर्वा नाही. त्याचे अध्यक्ष ट्रम्प याबाबत जेवढे निर्ढावले आहेत तेवढीच चंद्रपूर शहरातील राजकारणी माणसे त्यातल्या प्रदूषणाच्या जीवघेण्या संकटाबाबत बेपर्वा व बेजबाबदार राहिली आहे. लोक चर्चा करतात; पण त्याची कर्त्या माणसांना दखल घ्यावीशी वाटत नाही. पीटर हॉकिंग्ज हा जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ म्हणतो, प्रदूषणाच्या जागतिक संकटाने पृथ्वीवरील माणसांचे आयुष्य आणखी केवळ १०० वर्षे टिकेल. या हिशेबात देशातील व महाराष्ट्रातील चंद्रपूर या सर्वाधिक प्रदूषित शहराचे आयुष्य कितीसे आहे याचे गणित मांडण्याची व त्याचे उचित उत्तर शोधण्याची त्या शहराच्या व राज्याच्या नेत्यांची जबाबदारी आहे.