शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

राजकारण्यांना विनोदाचे का वावडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 03:46 IST

सार्वजनिक क्षेत्रात वावरणा-यांना लोकांच्या टीकेचा सामना करावा लागतो. किंबहुना अनेकदा राजकीय नेते खेळीमेळीत ते स्वीकारतातही. हास्य-विनोद हे राजकारण निकोप बनवीत असते आणि राजकारण्यांना अजातशत्रू.

सार्वजनिक क्षेत्रात वावरणा-यांना लोकांच्या टीकेचा सामना करावा लागतो. किंबहुना अनेकदा राजकीय नेते खेळीमेळीत ते स्वीकारतातही. हास्य-विनोद हे राजकारण निकोप बनवीत असते आणि राजकारण्यांना अजातशत्रू. पण राजकारणातील विनोदच संपला तर ते एकारलेपणाकडे जाईल.आजकाल सामाजिक आणि राजकीय स्तरावर अभद्र भाषेचा वापर प्रचंड वाढला आहे. विशेषत: राजकारण्यांकडून होणारी वक्तव्ये ऐकल्यावर तर ‘यांच्या जिभेला हाड नाही का? असेच म्हणावे लागते. त्यांच्या या अशा अमर्यादित वाचाळपणामुळे बरेचदा राष्टÑीय पदांची प्रतिष्ठाही धुळीस मिळते. पण त्याच्याशी यांना काही सोयरसुतक असण्याचे कारण नाही.वाचाळवीरांची ही फौज जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडे आहे. अलीकडच्या काळात राजकारण्यांकडून होणाºया आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे भारताचे राजकारण फार चिखलमय झाले आहे, असे म्हटल्यास ते चूक ठरू नये. दुसरीकडे या वाढत्या मानसिक प्रदूषणासोबतच लोकांची सहनशीलताही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आश्चर्य याचे वाटते की लोक दुसºयांवर टीका करताना कुठलीही मर्यादा पाळत नाहीत परंतु त्यांच्यावर जराशी कुणी टीका केली की मात्र यांच्या अंगाचा तीळपापड होतो. सत्तेसोबत आपल्याला काहीही बोलण्याचा परवानाच मिळाला असल्याच्या अविर्भावात काही नेते वावरताना दिसतात. जगप्रसिद्ध ताजमहालबद्दल भाजपाच्या काही नेत्यांनी नुकतीच केलेली वक्तव्ये हे त्याचेच उदाहरण. तर अशा या कमालीच्या गढूळ वातावरणात कुणी साधा विनोदही केला तरी तोसुद्धा सकारात्मक घेतला जाण्याची शक्यता कमीच. आता हेच बघा ना! एका विनोदवीराने दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल काय केली; त्याचा एवढा गहजब झाला की त्या बिच्चाºया कलाकाराचा तो कार्यक्रम प्रसारितच होऊ शकला नाही. विशेष म्हणजे या कलाकाराने यापूर्वी राहुल गांधींचीही नक्कल केली होती. आपल्या नेत्याची नक्कल केल्याने मोदींच्या काही तथाकथित समर्थकांच्या भावना म्हणे खूप दुखावल्या गेल्या. खरे तर एखादी बडी असामी किंवा नेत्यावर विनोद अथवा व्यंग करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. भारतात ही परंपरा फार जुनी आहे. राजेमहाराजांच्या काळातही त्यांच्या दरबारात असे विनोदवीर राहात असत. वेळप्रसंगी ते आपल्या महाराजांचीसुद्धा फिरकी घेत असत. भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयींचेच बघा ना! कलाकारांनी त्यांच्या कविता वाचनाच्या खास शैलीची नक्कल अनेकदा केली. पण त्यांनी कधी ते मनावर घेतले नाही. खुद्द मोदींनासुद्धा त्यांची नक्कल करणे आवडले नसेल असे नाही. लोकशाही व्यवस्थेत टीका करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. विशेषत: सार्वजनिक क्षेत्रात वावरणाºयांना लोकांच्या या टीकेचा सामना करावा लागतो. किंबहुना अनेकदा राजकीय नेतेसुद्धा खेळीमेळीत ते स्वीकारतातही. हास्य-विनोद हे राजकारण निकोप बनवीत असते आणि राजकारण्यांना अजातशत्रू. पण राजकारणातील विनोदच संपला तर ते एकारलेपणाकडे जाईल. त्यामुळे आमचे नेते अशा टीकांना अथवा व्यंगांना घाबरत असतील किंवा त्यावर संतापत असतील तर या लोकशाही व्यवस्थेला कुठेतरी खिंडार पडत आहे असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :Politicsराजकारण