शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत सिमेंट राेडचे राजकारण, दुबईत हिरवे गालिचे!

By अतुल कुलकर्णी | Updated: January 23, 2023 06:06 IST

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत ४०० किलोमीटर लांबीचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यावरून वाद सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत ४०० किलोमीटर लांबीचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यावरून वाद सुरू आहेत.

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुंबईचे शांघाय करण्याची घोषणा केली होती. याचा अर्थ मुंबईतील रस्ते चकाचक होतील. सोयी-सुविधा जागतिक दर्जाच्या असतील, असा होता. या गोष्टीला अनेक वर्षे उलटून गेली. मुंबईची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. चालण्यासाठी चांगले रस्ते नाहीत. कचऱ्याचे ढीग संपत नाहीत. फूटपाथवरची अतिक्रमणे कमी होत नाहीत. आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत. एखादी चांगली सुविधा निर्माण झाली म्हणून त्याचा आनंद घ्यायचा ठरवले, तर त्याचे फोलपण लगेच लक्षात येऊ लागते. पुढच्या पंचवीस वर्षांचा विचार करून या शहराचे नियोजन झालेले नाही. कोणत्या भागात किती एफएसआय द्यायचा त्याला मर्यादा आहेत. मात्र, या मर्यादांचा विचार गंभीरपणे होत नाही. महालक्ष्मी स्टेशनजवळील सात रस्ता परिसराचे उदाहरण पुरेसे आहे. या ठिकाणी मोठ-मोठे टॉवर उभे राहिले. मात्र, रस्त्यांची रुंदी आहे तेवढीच राहिली. किंबहुना त्यावरही अतिक्रमणे वाढली. त्याच रस्त्यांवरून मेट्रो जात आहे. त्याच भागात अचानक रस्ता खचून पंधरा-वीस फुटांचे खोल खड्डेही पडत आहेत. जर नियोजन करून या भागात टॉवर बांधायला परवानगी दिली असती तर ही वेळ आली नसती. मुंबईत अशी अनेक उदाहरणं देता येतील. 

मिलन सबवेच्या ठिकाणी बनविण्यात आलेला पूल हा अंधेरी, सांताक्रुझ, जुहू या भागांतील लोकांना दक्षिण मुंबईत जाता यावे यासाठी केला. मात्र, तो उड्डाणपूल मुंबईच्या दिशेने न जाताविरुद्ध दिशेने जातो. डोमेस्टिक एअरपोर्टच्याजवळ तो उतरतो. याचा अर्थ विमानतळाच्या समोरील उड्डाणपुलाच्या खालपर्यंत जायचे, आणि तेथून वळसा घालून पुन्हा दक्षिण मुंबईच्या दिशेने यायचे. जिकडे जायचे आहे, त्याच्या विरुद्ध दिशेला उतरणारा हा देशातला एकमेव पूल असेल. सांताक्रुझ ते चेंबूर उड्डाणपूल असाच एकमेव आहे. ज्या- ज्या ठिकाणी दाट लोकवस्ती सुरू होते, त्या ठिकाणी हा उड्डाणपूल उतरतो. जिथे लोकवस्ती नाही त्या ठिकाणी तो पुन्हा सुरू होतो. असा उड्डाणपूल बांधायला तेरा वर्षे लागली. दृष्टी आणि नियोजन नसले की काय होते याची ही सगळी उत्तम उदाहरणे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत ४०० किलोमीटर लांबीचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते करायचे त्यावरून वाद सुरू आहे. यासाठी ६,०७९ कोटी रुपये खर्च होणार आहेत. एक किलोमीटर लांबीचा रस्ता जवळपास १५.१९ कोटी रुपयाला पडणार आहे. या कामास विलंब झाला तर खर्चात वाढ होत जाईलच. विरोध ४०० किलोमीटरचे रस्ते सिमेंटचे करण्याला नाही. मात्र, हे रस्ते ज्या भागातून जाणार आहेत, त्या भागात असणाऱ्या इमारतींना भविष्यात किती एफएसआय दिला जाणार आहे? त्या ठिकाणी किती मोठ्या इमारती उभ्या राहतील? त्या इमारतींचा ताण या रस्त्यांवर किती वर्षात, किती प्रमाणात वाढेल? आणि तो वाढला तर या रस्त्यांची उपयुक्तता राहील का? या प्रश्नांची उत्तरे कोणीही देत नाही. उलट वरवरचे राजकीय प्रश्न उपस्थित केले जातात. त्याला उत्तरे देखील तशीच उथळपणाने दिली जातात. 

दुबईसारखे शहर आपल्या राजकारण्यांनी आणि अधिकाऱ्यांनी जाऊन बघितले पाहिजे. रस्त्याच्या दुतर्फा केलेली निसर्गाची उधळण पाहिली पाहिजे. उन्हाळ्यात दुबईमध्ये तापमान ५० अंशांपर्यंत जाते. अशावेळी रस्त्याच्या कडेला लावलेली फुलझाडे किंवा गवत वाळून जाऊ नये यासाठी ड्रिप इरिगेशनची कायमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 

रस्त्याच्या दुतर्फा अशा गवतांच्या गालिचांवर मुक्तपणे पक्ष्यांचे थवे येऊन बसतात. तुम्हा आम्हालाही तिथे जाऊन बसावे वाटेल, इतके सुंदर वातावरण रस्त्याच्या कडेला दिसते. अबुधाबीला दिवंगत राष्ट्रपती शेख जायद बिन सुलतान अल नहयान यांनी १९९४ मध्ये भव्य मशीद उभारण्याचे काम सुरू केले. ३० एकरपेक्षा मोठ्या जागेमध्ये ही मशीद आहे.

 ‘शेख जायद ग्रँड मज्जिद’, या नावाने ती ओळखली जाते. हिच्या संपूर्ण परिसरात कुठेही तुम्हाला एकही टपरी दिसणार नाही. चहाचा ठेला दिसणार नाही. सर्वत्र सुंदर पाना-फुलांची आकर्षक रचना दिसेल. त्या ठिकाणी असणारी कलादालनं समुद्रकिनारी आहेत. ती ज्या पद्धतीने बांधलेली आहेत, ते आवर्जून बघितले पाहिजे. देशात सगळ्यात जास्त आर्ट गॅलरी मुंबईत आहेत. मात्र, त्यांची अवस्था आणि तिथे असणाऱ्या सोयीसुविधा यांची तुलना जर दुबईतल्या आर्ट गॅलरींसोबत केली, तर वाईट वाटण्यापलीकडे हाती काही येत नाही. 

आज मुंबईतला एकही रस्ता बिना खड्ड्याचा नाही. बिना अतिक्रमणाचा फूटपाथ नाही. कचऱ्याचा ढीग नसलेला रस्ता नाही. चारशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची ही अवस्था होऊ नये. हे रस्ते तरी निदान एवढा प्रचंड पैसा खर्च करून होत असतील तर ते जागतिक दर्जाचे असावेत, अशी अपेक्षा केली तर ती माफक समजली जावी. ‘आमच्याकडे नियम बनवणारे, नियम मोडत नाहीत’, असे सांगणारे असंख्य लोक दुबईत सापडतील. आपल्याकडे नियम मोडण्यासाठीच असतात, असा अलिखित नियम अंमलात आणून दाखवणारे हजारो सापडतील. हे थांबवायचे की राजकीय चिखलफेक करण्यातच धन्यता मानायची हा ज्याच्या त्याच्या मानसिकतेचा प्रश्न आहे.